शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अहंम् बाजूला ठेवून जीवनात सेवा, सर्मपण अंगिकारा - डॉ. स्मिता कोल्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 20:46 IST

सेवा है यज्ञकुंड..समिधासम हम जले..या वृत्तीने जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत मेळघाट येथील ज्येष्ठ समाजसेविका डॉ. स्मिता कोल्हे यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ४९ वा पुण्यतिथी-पुण्यस्मरण महोत्सवानिमित्त आयोजित महिला संमेलनात त्यांनी आपले विचार प्रकट केले.

ठळक मुद्देमहिला संमेलनात झाले कौटुंबिक व सामाजिक जबाबदारीवर विचारमंथन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जन्माला आल्यावर कोणीच सोबत खिसा घेऊन येत नाही आणि जातानासुद्धा कोणी खिशात काहीच घेऊन जाऊ शकत नाही. अवतीभवती फिरताना, निराशेचे वातावरण, दु:ख, दारिद्रय़ दृष्टीस पडतं. त्यामुळे स्वत:तील अहंम् बाजूला ठेवून जीवनामध्ये सेवा, सर्मपणाचा भाव अंगिकारावा. सेवा है यज्ञकुंड..समिधासम हम जले..या वृत्तीने जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत मेळघाट येथील ज्येष्ठ समाजसेविका डॉ. स्मिता कोल्हे यांनी व्यक्त केले. अ.भा. श्री गुरुदेव सेवा मंडळांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीच्यावतीने स्वराज्य भवन प्रांगणात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ४९ वा पुण्यतिथी-पुण्यस्मरण महोत्सवास शनिवारपासून सुरुवात झाली. रविवारी या महोत्सवामध्ये दुपारी महिला संमेलन पार पडले. महिला संमेलनामध्ये महिलांची कौटुंबिक व सामाजिक जबाबदारी विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी विचारपीठावर अध्यक्षस्थानी डॉ. स्मिता कोल्हे होत्या. प्रमुख वक्त्या म्हणून यावली शहिद येथील भाग्यश्री देशमुख, सुधा जवंजाळ, अँड. श्रद्धा आखरे, शैलजा गावंडे, साक्षी पवार, ग्रामगिताचार्य मंगला पांडे, माजी नगरसेविका पुष्पा गुलवाडे आदी होत्या. डॉ. स्मिता कोल्हे म्हणाल्या की, माझं शिक्षण नागपुरात झालं. एक मुलगी. अनेक अडचणी आल्या; परंतु जिद्दीने अभ्यास केला. वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर वकीलीचं शिक्षण घेतलं. नागपुरात दवाखाना थाटला. चांगला जम बसला. पैसाही मिळत होता. सुखसंपन्नता नांदत होती; परंतु समाधान नव्हते. अशातच प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र कोल्हे यांच्याशी परिचय झाला. त्यांनी लग्न करायचे असेल तर  चारशे रुपये महिन्याने घर चालविता आले पाहिजे, दररोज ४0 किमी पायी चालावे लागेल, ५ रुपयांमध्ये लग्न लावावे लागेल आणि वेळप्रसंगी भीक मागावी लागेल. या चार माझ्यासमोर अटी  ठेवल्या. या अटी मी मान्य केल्या आणि मेळघाटमधील जगाशी संपर्क नसलेले बैरागड गावी गेले. पतीसोबत आदिवासींची सेवा करण्यास सुरुवात केली. असं सांगत, डॉ. कोल्हे यांनी, सुखाचा त्याग करून मी अंधारात, जात्यावर दळणं, चूल पेटवणं, सारं काही शिकले.  डॉक्टर होण्यापेक्षा आदिवासी बनून आम्ही जीवन जगलो. स्वत:तला अहंम् बाजूला ठेवला, असे सांगत, त्यांनी जीवनातील अनेक अनुभव यावेळी मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. ममता इंगोले यांनी केले. 

महिला संमेलनात महिलांच्या कौटुंबिक व सामाजिक जबाबदारीवर विचारमंथनमहिला संमेलनामध्ये अँड. श्रद्धा आखरे हिने, देशात हुंडा प्रतिबंधक कायदे आहेत; परंतु कायद्याची अंमलबजावणी होत नाही. हुंडा देणे व घेण्याचे प्रकार समाजात सर्रास घडत आहेत.  त्यामुळे महिला व युवतींनी हुंडा न देण्याचे धाडस दाखवावे, असे मत व्यक्त केले. साक्षी पवार हिने ग्रामगितेमध्ये राष्ट्रसंतानी महिलोन्नतीचा अध्याय आहे, त्यामुळे ग्रामगितेचा विचार महिलांनी घरामध्ये रूजविण्याची गरज आहे, असे मत मांडले. भाग्यश्री देशमुख, सुधा जवंजाळ, शैलजा गावंडे यांनी महिलांची कौटुंबिक व सामाजिक जबाबदारी विषयावर मत व्यक्त केले. 

टॅग्स :Rashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराजAkola cityअकोला शहर