शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

करडई क्षेत्र नामशेष होण्याच्या मार्गावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 13:53 IST

अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत ४१ हजार तर नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत सर्वात कमी हे क्षेत्र उरले आहे.

अकोला : करडई तेलबिया पिकाचे क्षेत्र कमी होत असून, राज्यात तीन लाख हेक्टरच्यावर असलेले करडईचे क्षेत्र आता केवळ अठरा हजार हेक्टरपर्यंत उरले आहे. हे पीक नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने करडई पिकाचे क्षेत्र वाढविण्यावर भर दिला आहे. यावर्षी पाऊस चांगला असल्याने शेतकऱ्यांना करडई पिकाबाबात मार्गदर्शन केले जात आहे; परंतु याहीवर्षी शेतकऱ्यांनी करडई पेरणीकडे पाठ फिरविली आहे.१९९९-२००० पर्यंत राज्यात करडईचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात होते; परंतु या पिकाला मिळणारे दर अत्यंत कमी आहेत. गतवर्षी तर प्रतिक्ंिवटल दोन ते दोन हजार पाचशे रुपयेच दर होते. हे पीक काटेरी असल्याने काढण्यासाठी या पिकाला मजूर मिळत नाहीत.परिणामी, या पिकाचे क्षेत्र कमी होत गेले. २०११-१२ पर्यंत राज्यात १ लाख २३ हजार हेक्टर क्षेत्र होते. विदर्भात तर दोन लाख हेक्टर असलेले हे क्षेत्र याच कारणामुळे कमी झाले. २०११-१२ मध्ये अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत ४१ हजार तर नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत सर्वात कमी हे क्षेत्र उरले आहे.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तेलबियांचे अनेक नवे वाण विकसित केले आहे; पण यावर्षीदेखील शेतकºयांनी या पिकाकडे पाठ फिरविली आहे. मागणी घटल्याने महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाने तर करडई बियाण्याचे यावर्षी अल्प नियोजन केले. २०११ पर्यंत राज्यात ४० लाख हेक्टरवर भुईमूग, जवस, सूर्यफूल, करडई व सोयाबीन या तेलबिया पिकांचे उत्पादन घेतले जात होते. यात आता ४ लाख हेक्टरची घट झाली असून, ३६ लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली उरले आहे. विशेष म्हणजे, अलीकडच्या काही वर्षांत सोयाबीनचे क्षेत्र वाढल्याने या ३६ लाख हेक्टर क्षेत्रामध्ये सोयबीनचा वाटा ३२ लाख हेक्टर आहे.करडईचे पीक आरोग्यवर्धक आहे. विदर्भातील शेतकºयांनी हे पीक घ्यावे, यासाठीचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. चांगले दर मिळाल्यास शेतकरी या पिकाकडे वळतील, असा विश्वास आहे.- डॉ. एस. बी. साखरे, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी