शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

करडई क्षेत्र नामशेष होण्याच्या मार्गावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 13:53 IST

अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत ४१ हजार तर नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत सर्वात कमी हे क्षेत्र उरले आहे.

अकोला : करडई तेलबिया पिकाचे क्षेत्र कमी होत असून, राज्यात तीन लाख हेक्टरच्यावर असलेले करडईचे क्षेत्र आता केवळ अठरा हजार हेक्टरपर्यंत उरले आहे. हे पीक नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने करडई पिकाचे क्षेत्र वाढविण्यावर भर दिला आहे. यावर्षी पाऊस चांगला असल्याने शेतकऱ्यांना करडई पिकाबाबात मार्गदर्शन केले जात आहे; परंतु याहीवर्षी शेतकऱ्यांनी करडई पेरणीकडे पाठ फिरविली आहे.१९९९-२००० पर्यंत राज्यात करडईचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात होते; परंतु या पिकाला मिळणारे दर अत्यंत कमी आहेत. गतवर्षी तर प्रतिक्ंिवटल दोन ते दोन हजार पाचशे रुपयेच दर होते. हे पीक काटेरी असल्याने काढण्यासाठी या पिकाला मजूर मिळत नाहीत.परिणामी, या पिकाचे क्षेत्र कमी होत गेले. २०११-१२ पर्यंत राज्यात १ लाख २३ हजार हेक्टर क्षेत्र होते. विदर्भात तर दोन लाख हेक्टर असलेले हे क्षेत्र याच कारणामुळे कमी झाले. २०११-१२ मध्ये अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत ४१ हजार तर नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत सर्वात कमी हे क्षेत्र उरले आहे.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तेलबियांचे अनेक नवे वाण विकसित केले आहे; पण यावर्षीदेखील शेतकºयांनी या पिकाकडे पाठ फिरविली आहे. मागणी घटल्याने महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाने तर करडई बियाण्याचे यावर्षी अल्प नियोजन केले. २०११ पर्यंत राज्यात ४० लाख हेक्टरवर भुईमूग, जवस, सूर्यफूल, करडई व सोयाबीन या तेलबिया पिकांचे उत्पादन घेतले जात होते. यात आता ४ लाख हेक्टरची घट झाली असून, ३६ लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली उरले आहे. विशेष म्हणजे, अलीकडच्या काही वर्षांत सोयाबीनचे क्षेत्र वाढल्याने या ३६ लाख हेक्टर क्षेत्रामध्ये सोयबीनचा वाटा ३२ लाख हेक्टर आहे.करडईचे पीक आरोग्यवर्धक आहे. विदर्भातील शेतकºयांनी हे पीक घ्यावे, यासाठीचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. चांगले दर मिळाल्यास शेतकरी या पिकाकडे वळतील, असा विश्वास आहे.- डॉ. एस. बी. साखरे, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी