शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

पत्रकारांनी नोंदविला अकोला जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 13:27 IST

अकोला: अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ डिसेंबर रोजी संपादक व पत्रकारांना निवासस्थानी बोलावून केलेल्या उद्दाम वर्तनानंतर माध्यम क्षेत्रात संतप्त पडसाद उमटले. जिल्हाभरात पत्रकारांनी निषेध नोंदविल्यावर गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते.

अकोला: अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ डिसेंबर रोजी संपादक व पत्रकारांना निवासस्थानी बोलावून केलेल्या उद्दाम वर्तनानंतर माध्यम क्षेत्रात संतप्त पडसाद उमटले. जिल्हाभरात पत्रकारांनी निषेध नोंदविल्यावर गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये पत्रकारांनी अतिशय परखड शब्दात जिल्हाधिकाऱ्यांच्या उद्दामपणाचा समाचार घेतला. या सभेला सुमारे ३०० पत्रकारांनी उपस्थिती लावली.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तब्बल १६ पत्रकार संघटनांच्यावतीने निषेध सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत पत्रकारांनी आपली परखड, नि:पक्ष मते मांडली. मोर्णा नदी स्वच्छ करणाºया जिल्हाधिकाºयांच्या उपक्रमाला प्रसारमाध्यमांनी भरपूर प्रसिद्धी दिली होती; मात्र मोर्णा स्वच्छतेच्या नावाखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी समाजातील अनेक घटकांना वेठीस धरण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने या कार्यक्रमासाठी खंडणी गोळा करण्यात आली. अशा कार्यक्रमाकडे लोकांनीच दुर्लक्ष केले, तेव्हा प्रसारमाध्यमांना दोष देण्यात काहीही अर्थ नव्हता, असा सूर या बैठकीत व्यक्त करण्यात आला. या सभेत संपादक रवी टाले, संदीप भारंबे, अरुणकुमार सिन्हा, गजानन सोमानी यांच्यासह पत्रकार राजेश शेगोकार, पद्माकर आखरे तसेच पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे नेते सिद्धार्थ शर्मा, पुरुषोत्तम आवारे, शौकतअली मीरसाहेब, प्रमोद लाजुरकर, अनिल माहोरे, सुधाकर खुमकर, पी. एन. बोळे, विलास नसले, शैलेश अलोने व चंदा शिरसाट यांनी आपली परखड मते सभेत मांडली.

जिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हेच दाखल व्हावे - देशमुखअकोला जिल्हाधिकाºयांनी पत्रकारांना ठरवून दूषित पाणी पाजण्याचा प्रयत्न केला, धूर दिला तर दुसरीकडे जिल्हा परिषदेचा निधीही पळविण्याचा प्रयत्न केला, हे सारे प्रताप म्हणजे गुन्हे आहेत. पत्रकारांच्या जीविताला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करणाºया या जिल्हाधिकाºयांवर गुन्हेच दाखल झाले पाहिजे, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी केली.

पत्रकारांच्या लेखन स्वातंत्र्यावर गदा - चौधरीएखाद्या चांगल्या कामाची दखल घेत त्याबाबत प्रसिद्धी देणे हे पत्रकारांचे कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे चुका व त्रुटीही लक्षात आणून देणे महत्त्वाचे काम आहे. चांगले प्रकाशित केल्यावर आनंद होणे साहजिकच आहे; मात्र टीका होत असेल, दखल घेतली जात नसेल, तर अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. त्यासाठी पत्रकारांच्या लेखन स्वातंत्र्यावर आक्षेप घेण्याची गरज नाही. जिल्हाधिकाºयांचे वर्तन हे पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे असल्याने निषेधार्ह आहे, असे मत काँग्रेसचे महानगराध्यक्ष माजी आ. बबनराव चौधरी यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय