शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
3
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
4
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
5
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
6
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
7
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
8
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
9
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
10
जातगणना : मॅजिक की मंडल?
11
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
12
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
13
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
14
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
15
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
16
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
17
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
18
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
19
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
20
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक

रोजगार मेळाव्यांतून युवकांना मिळाला रोजगार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2016 02:08 IST

वर्षभरात १५ हजार हातांना काम; ८0 हजार युवकांना रोजगार प्रशिक्षण.

बुलडाणा: कुशल कामगारांना रोजगाराची संधी व उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यांमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यास सुरुवात केली. २0१५-१६ या वर्षात राज्यभरात १३१ मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. यातून जवळपास १५,२४८ युवकांना रोजगार पुरविण्यात आला असल्याची माहिती शासनाच्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आली आहे.रोजगार व स्वयंरोजगारासाठी समुपदेशन, मार्गदर्शन व मदत करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. राज्यात अशी ५0 केंद्रे कार्यरत असून, त्यापैकी ३५ जिल्हा स्तरावर, सहा विद्यापीठ स्तरावर, आठ आदिवासी विभागाकरिता तर एक विशेष केंद्र शारीरिकदृष्ट्या विकलांग असणार्‍या व्यक्तीसाठी आहे.या केंद्रांच्या माध्यमातून रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमांतर्गत राज्यभरात २0१५-१६ मध्ये केवळ १३१ मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राज्यभरातील लहान-मोठय़ा ७३३ उद्योजकांनी आपला सहभाग नोंदविला. या मेळव्यांचा ५४ हजार ९७५ बेरोजगारांनी लाभ घेतला. यापैकी १५२४८ युवकांना रोजगार पुरविण्यात आला. राज्य शासनामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम राबविण्यात येते. या कार्यक्रमांतर्गत वर्षभरात ८0६४६ युवकांना रोजगार व स्वयंरोजगार उभारण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. यात १३८५८ बेरोजगारांना प्रोत्साहित करण्यात आले. शिवाय शिकाऊ उमेदवार म्हणून ५४ हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात आले. तर १२७३९ जणांना उद्योजकता विकास प्रशिक्षण देण्यात आल्याचे अहवालात नमूद आहे.