शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार मेळाव्यांतून युवकांना मिळाला रोजगार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2016 02:08 IST

वर्षभरात १५ हजार हातांना काम; ८0 हजार युवकांना रोजगार प्रशिक्षण.

बुलडाणा: कुशल कामगारांना रोजगाराची संधी व उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यांमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यास सुरुवात केली. २0१५-१६ या वर्षात राज्यभरात १३१ मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. यातून जवळपास १५,२४८ युवकांना रोजगार पुरविण्यात आला असल्याची माहिती शासनाच्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आली आहे.रोजगार व स्वयंरोजगारासाठी समुपदेशन, मार्गदर्शन व मदत करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. राज्यात अशी ५0 केंद्रे कार्यरत असून, त्यापैकी ३५ जिल्हा स्तरावर, सहा विद्यापीठ स्तरावर, आठ आदिवासी विभागाकरिता तर एक विशेष केंद्र शारीरिकदृष्ट्या विकलांग असणार्‍या व्यक्तीसाठी आहे.या केंद्रांच्या माध्यमातून रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमांतर्गत राज्यभरात २0१५-१६ मध्ये केवळ १३१ मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राज्यभरातील लहान-मोठय़ा ७३३ उद्योजकांनी आपला सहभाग नोंदविला. या मेळव्यांचा ५४ हजार ९७५ बेरोजगारांनी लाभ घेतला. यापैकी १५२४८ युवकांना रोजगार पुरविण्यात आला. राज्य शासनामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम राबविण्यात येते. या कार्यक्रमांतर्गत वर्षभरात ८0६४६ युवकांना रोजगार व स्वयंरोजगार उभारण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. यात १३८५८ बेरोजगारांना प्रोत्साहित करण्यात आले. शिवाय शिकाऊ उमेदवार म्हणून ५४ हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात आले. तर १२७३९ जणांना उद्योजकता विकास प्रशिक्षण देण्यात आल्याचे अहवालात नमूद आहे.