शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

जयंत पाटील म्हणतात, श्रेय राष्ट्रवादीलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:18 IST

संजय उमक मूर्तिजापूर : तालुक्यातील २००७ ला रखडलेल्या काटेपूर्णा बॅरेज प्रकल्पास अलीकडेच सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. ही मान्यता केवळ ...

संजय उमक

मूर्तिजापूर : तालुक्यातील २००७ ला रखडलेल्या काटेपूर्णा बॅरेज प्रकल्पास अलीकडेच सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. ही मान्यता केवळ सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या प्रयत्नामुळेच मिळाली असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. या संदर्भात त्यांची एक व्हिडिओ चित्रफीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्हायरल केली असून, त्यामध्ये मंत्री पाटील यांनी काटेपूर्णा बॅरेजच्या मान्यतेवरून सुरू असलेल्या श्रेयवादावर पडदा टाकला आहे. तालुक्यातील मंगरुळ कांबे प्रकल्प उभारणीसाठी ३१ ऑगस्ट २००७ ला प्रस्ताव पाठविण्यात आला होता. तो मंजूर होऊन त्यासाठी ९६ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला होता. तेव्हापासून हा प्रकल्प अर्धवट अवस्थेत असून, आता पुन्हा २४ मार्च रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ५३३ कोटी ८१ लाख रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास १३ गावांमधील चार हजार २८१ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील ६ फेब्रुवारी रोजी आले असता या प्रकल्पाबाबत त्यांनी त्यावेळी प्रकल्प पूर्ण करून घेण्यासाठी आपण जातीने लक्ष घालणार असल्याचे आश्वासन दिले होते. तेच आश्वासन पाळले गेल्याची चर्चा आहे. मंत्री पाटील यांच्या म्हणण्यानुसार तालुक्यातील व जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी, संग्राम गावंडे, रवी राठी यांनी व जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलेला पाठपुराव्याने ५३३ कोटींची मान्यता आम्ही दिलेली आहे. ही बाब अनेक वर्षे प्रलंबित होती. मागच्या सरकारने गती देणे आवश्यक होते; परंतु तसे झाले नाही. दरम्यान, सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी सोशल मीडियावर प्रचंड पत्रकबाजी सुरू होती. मंत्री पाटील यांच्या वक्तव्याने या श्रेयवादावर तूर्तास पडदा पडला आहे.