शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

शंभर टक्के पुनर्वसनासाठी जांभावासीयांचे अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 19:16 IST

Murtijapur News : २५ सप्टेंबर रोजी गावकऱ्यांनी मारोतीच्या पारावर तीसरे अन्नत्याग आंदोलन केले.

मूर्तिजापूर : काटेपूर्णा नदीवरीर मंगरूळकांबे येथे झालेल्या बॅरेज मुळे बाधित झालेल्या जांभा गावचा पुनर्वसनाचा प्रश्न रखडला आहे. विविध आंदोलने करुन हे गावकरी आपली मागणी पुढे रेटत असताना २५ सप्टेंबर रोजी गावकऱ्यांनी मारोतीच्या पारावर तीसरे अन्नत्याग आंदोलन केले.               तालुक्यातील मंगरूळ कांबे बॅरेजची कामे मात्र रखडलेली आहेत. मंजूर झालेल्या बॅरेजेस मुळे बाधित झालेले गावांमध्ये जांबा बुद्रुक गावाचा समावेश असून या गावच्या पुनर्वसनाचा प्रश्न रखडला असल्याने गावाचे १०० टक्के पुनर्वसन करावे अशी मागणी आहे. मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत विविध आंदोलनास आत्मदहनाचा इशाराही गावकऱ्यांनी दिला. गाव १०० टक्के बाधित असल्याने तसा अहवाल कार्यकारी अभियंता अकोला पाटबंधारे विभाग यांच्या वतीने २ डिसेंबर २०१० रोजी सदर केला व गाव शंभर टक्के पुनर्वसन होत असल्याबाबतचे पत्र देण्यात आले होते. त्यातच पुनर्वसन कलम (११) जाहीर झालेले असल्याने जांभाा बुद्रुक गावांमध्ये विकासाची कामे करणेबाबत पूर्ण मनाई करण्यात आलेली आहे. शासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतरही पुनर्वसनासाठी टाळाटाळ करण्यात येऊन गावकऱ्यांना झुलवत ठेवण्यात आले आहे. त्यानंतर २०१६ मध्ये सदर गाव अंंशःता बाधित असल्याबाबतचा जावई शोध लावण्यात आला. परंतु शासन जोपर्यंत जाभां बु. गावाचे १०० टक्के पुनर्वसन करीत नाही तोपर्यंत विविध आंदोलने छेडण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे. याच पाश्र्वभूमीवर शनिवारी जाभा येथील हनुमानाच्या पारावर एक दिवसाचे लाक्षणिक अन्नत्याग आंदोलन केले.             प्रकल्पामुळे गावातील घरे मोडकळीस आलेली असून ती कधीही कोसळू शकतात. त्यामुळे जिवितहानी होण्याचा धोका निर्माण झालेला आहे.गेल्या ११ वर्षापासून गावकऱ्यांना ताटकळत ठेवण्यात येत असल्याने आता गावकरी सहनशीलतेच्या पलीकडे गेले आहे. सद्यस्थितीत प्रकल्प अधिकाऱ्यांनी गाव १३ टक्के बाधित क्षेत्रात येत आहे असे सांगून ३५० घरांपैकी ७० घरांंची पुनर्वसन यादी तयार केली आहे. या अन्नत्याग आंदोलनात यावेळी मोठ्या प्रमाणात गावकरी सहभागी झाले होते.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोला