शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

शंभर टक्के पुनर्वसनासाठी जांभावासीयांचे अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 19:16 IST

Murtijapur News : २५ सप्टेंबर रोजी गावकऱ्यांनी मारोतीच्या पारावर तीसरे अन्नत्याग आंदोलन केले.

मूर्तिजापूर : काटेपूर्णा नदीवरीर मंगरूळकांबे येथे झालेल्या बॅरेज मुळे बाधित झालेल्या जांभा गावचा पुनर्वसनाचा प्रश्न रखडला आहे. विविध आंदोलने करुन हे गावकरी आपली मागणी पुढे रेटत असताना २५ सप्टेंबर रोजी गावकऱ्यांनी मारोतीच्या पारावर तीसरे अन्नत्याग आंदोलन केले.               तालुक्यातील मंगरूळ कांबे बॅरेजची कामे मात्र रखडलेली आहेत. मंजूर झालेल्या बॅरेजेस मुळे बाधित झालेले गावांमध्ये जांबा बुद्रुक गावाचा समावेश असून या गावच्या पुनर्वसनाचा प्रश्न रखडला असल्याने गावाचे १०० टक्के पुनर्वसन करावे अशी मागणी आहे. मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत विविध आंदोलनास आत्मदहनाचा इशाराही गावकऱ्यांनी दिला. गाव १०० टक्के बाधित असल्याने तसा अहवाल कार्यकारी अभियंता अकोला पाटबंधारे विभाग यांच्या वतीने २ डिसेंबर २०१० रोजी सदर केला व गाव शंभर टक्के पुनर्वसन होत असल्याबाबतचे पत्र देण्यात आले होते. त्यातच पुनर्वसन कलम (११) जाहीर झालेले असल्याने जांभाा बुद्रुक गावांमध्ये विकासाची कामे करणेबाबत पूर्ण मनाई करण्यात आलेली आहे. शासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतरही पुनर्वसनासाठी टाळाटाळ करण्यात येऊन गावकऱ्यांना झुलवत ठेवण्यात आले आहे. त्यानंतर २०१६ मध्ये सदर गाव अंंशःता बाधित असल्याबाबतचा जावई शोध लावण्यात आला. परंतु शासन जोपर्यंत जाभां बु. गावाचे १०० टक्के पुनर्वसन करीत नाही तोपर्यंत विविध आंदोलने छेडण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे. याच पाश्र्वभूमीवर शनिवारी जाभा येथील हनुमानाच्या पारावर एक दिवसाचे लाक्षणिक अन्नत्याग आंदोलन केले.             प्रकल्पामुळे गावातील घरे मोडकळीस आलेली असून ती कधीही कोसळू शकतात. त्यामुळे जिवितहानी होण्याचा धोका निर्माण झालेला आहे.गेल्या ११ वर्षापासून गावकऱ्यांना ताटकळत ठेवण्यात येत असल्याने आता गावकरी सहनशीलतेच्या पलीकडे गेले आहे. सद्यस्थितीत प्रकल्प अधिकाऱ्यांनी गाव १३ टक्के बाधित क्षेत्रात येत आहे असे सांगून ३५० घरांपैकी ७० घरांंची पुनर्वसन यादी तयार केली आहे. या अन्नत्याग आंदोलनात यावेळी मोठ्या प्रमाणात गावकरी सहभागी झाले होते.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोला