शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

नदीपात्रात जाळली जलकुंभी

By admin | Updated: May 23, 2016 01:50 IST

पर्यावरणाकडे मनपाचेच दुर्लक्ष

अकोला: मोर्णा नदीच्या पात्रात उगवलेली जलकुंभी काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने तब्बल चौदा लाख रुपयांची तरतूद करत दोन टप्प्यांत निविदा काढली. संबंधित कंत्राटदाराने नदी पात्रातून जमा केलेल्या जलकुंभीची दुसर्‍या ठिकाणी विल्हेवाट लावण्याची गरज असताना चक्क नदी पात्रातच जलकुंभी जाळण्याचे प्रकार होत आहेत. अकोलेकरांना वृक्ष संवर्धनाचे आवाहन करणार्‍या मनपाकडून पर्यावरणाची ऐशीतैशी केली जात असल्याची टीका होत आहे.मोर्णा नदीच्या पात्रात दरवर्षीप्रमाणे यंदाही जलकुंभी उगवली. हिंगणा परिसरापासून ते मुख्य गणेश घाट, ते दगडी पूल ते रेल्वे पुलापर्यंत उगवलेल्या जलकुंभीमुळे नदीकाठच्या रहिवाशांची झोप उडाली. जलकुंभीमुळे नदीतील घाण पाण्याचा निचरा होत नसल्याने डासांची पैदास वाढली. परिणामी नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले. यावर उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने जलकुंभी काढण्याची निविदा प्रकाशित केली. याकरिता चौदा लाख रुपये किंमत निश्‍चित करण्यात आली. पहिल्या टप्प्यात सिटी कोतवाली ते दगडी पूल ते रेल्वे पुलापर्यंंतची जलकुंभी काढण्यात आली. आता दुसर्‍या टप्प्यात अनिकट परिसर ते हिंगणा परिसरापर्यंत जलकुंभी काढण्याच्या कामाला सुरुवात झाली. निमवाडी परिसरात नदीपात्रातून जमा केलेल्या जलकुंभीची इतर ठिकाणी विल्हेवाट लावणे सहज शक्य असताना नदीच्या काठावर जलकुंभीचे ढीग जमा करण्यात आले. उन्हामुळे वाळल्यानंतर जलकुंभीच्या ढिगार्‍याला पेटवून देण्याचे काम होत आहे. या प्रकारामुळे पर्यावरणाचा र्‍हास होण्यासोबतच प्रदूषणाला हातभार लागत असल्याने मनपाच्या धोरणावर अकोलेकर तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.