शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाला उत्पादन खर्चानुसार दर देणे शक्य होणार - पाशा पटेल

By admin | Updated: November 14, 2015 02:26 IST

शेतक-यांना मिळणार दिलासा : हमी भाव अभ्यासण्यासाठी नेमलेल्या समितीद्वारा केंद्राकडे अहवाल सादर.

चिखली (जि. बुलडाणा): आजघडीला कृषिव्यवसायाचे संदर्भ पूर्णपणे बदलले आहेत. त्यामुळे शेती आणि शेतकर्‍यांपुढील समस्या गंभीर झाल्या आहेत. ही बाब ध्यानी घेऊन शेतमालाचा हमी भाव जाहीर करण्यासाठीची पद्धत अभ्यासण्यासाठी नेमलेल्या समितीने आपला अंतिम अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुपूर्द केला असून, या अहवालात शेतमालाचे हमी भाव जाहीर करण्यासाठी अनेक आमूलाग्र व शेतकरीहिताचे बदल सुचविण्यात आलेले आहेत. समितीने सुचविलेले बदल व शिफारशी केंद्र शासन व नीती आयोगामार्फत स्वीकारण्यात येणार असल्याने हमी भाव ठरविण्याच्या पद्धतीमध्ये बदल होऊन शेतकर्‍यांचे अर्थशास्त्र सुधारण्याची योग्य वेळ नजरेच्या टप्प्यात आली असल्याची माहिती शेतकरी नेते तथा माजी आमदार पाशा पटेल यांनी दिली. शेतकरी नेते पाशा पटेल हे १३ नोव्हेंबर रोजी चिखली येथे आले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्थानिक संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी उपरोक्त माहिती विशद केली. यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, भाजपचे युवा नेते संजय चेके पाटील, भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष दादासाहेब मुंडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, भारत वाघमारे, नितीन राजपूत, हरी शेळके, सचिन पडघान, रमेश बाहेकर, पांडुरंग सवडदकर यांची उपस्थिती होती. यावेळी पटेल म्हणाले की, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वात तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांनी दिल्लीतील पुसा या संस्थेचे अध्यक्ष डॉ. रमेश चंद्र यांच्या अध्यक्षतेत स्थापन केलेल्या हमी भाव जाहीर करण्यासाठीची पद्धत अभ्यासण्यासाठी नेमलेल्या समितीने नुकताच आपला अंतिम अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुपुर्द केला. या अहवालामध्ये शेतमालाचे हमी भाव जाहीर करण्यासाठी अनेक आमूलाग्र बदल सुचविण्यात आलेले आहेत. सोबतच या समितीचे अध्यक्ष डॉ. रमेश चंद्र यांची नीती आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याने या समितीच्या शिफारशी केंद्र शासन आणि नीती आयोगाकडून स्वीकारल्या जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतमालाचा हमी भाव वास्तव उत्पादनखर्चाशी सुसंगत होऊन सुधारणा होऊन शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. सोबतच उत्पादन खर्चानुसार हमी भाव जाहीर होणार असल्याने शेतकर्‍यांच्या पदरात दोन पैसे अधिक पडतील व त्यांचा आर्थिक स्तर आपसूकच उंचावणार आहे. आजपर्यंंंत शेतमालाचा उत्पादनखर्च आकारताना भूस्वामी असलेला शेतकरी आणि शेतमजूर यांना अकुशल कामगार म्हणून त्यांची मजुरी गृहित धरली जात असे. ते यापुढे कुशल कामगार म्हणून गृहित धरावेत. बैलांचे काम करण्याचे दिवस केवळ १३ गृहित धरले जात होते. ते यापुढे ३६५ गृहित धरण्यात यावेत. महत्त्वाची बाब म्हणजे, जमिनीचे भूभाडे हे वास्तवावर आधारित आकारण्यात यावे. राज्यात ज्याप्रमाणे वास्तवात भूभाडे आकारण्यात येते, त्याप्रमाणे ते हेक्टरी पाच हजारऐवजी २५ हजार रुपये आकारण्यात यावे. यांसारख्या महत्त्वपूर्ण शिफारशी या समितीने केल्या आहेत. समितीने केलेल्या शिफारशींपैकी अध्र्याअधिक शिफारशी स्वत: पाशा पटेल यांनी केल्या असून, त्यांचा वेळोवळी पाठपुरावादेखील केला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.