शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आयोगाबाबत अल्पसंख्यांनाच माहिती नसणे ही बाब दुर्दैवी - ज.मो. अभ्यंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 18:27 IST

अकोला : अल्पसंख्याकांच्या अडीअडचणी व विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीवर नियंत्रणासाठी अल्पसंख्याक आयोगाची निर्मिती करण्यात आली असली, तरी या आयोगाबाबतची माहिती अल्पसंख्याकानाच नसणे ही दुर्देवी बाब असल्याची खंत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ज.मो.अभ्यंकर यांनी व्यक्त केली.

- सदानंद सिरसाटअकोला : अल्पसंख्याकांच्या अडीअडचणी व विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीवर नियंत्रणासाठी अल्पसंख्याक आयोगाची निर्मिती करण्यात आली असली, तरी या आयोगाबाबतची माहिती अल्पसंख्याकानाच नसणे ही दुर्देवी बाब असल्याची खंत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ज.मो.अभ्यंकर यांनी व्यक्त केली. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्याक समाजाच्या अडचणी, विविध योजनांची अंमलबजावणी, अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेडसावणाºयाअडचणींचा आढावा घेण्यासाठी दौरा सुरू केला आहे. अकोला जिल्ह्यातून त्यांच्या दौºयाला सुरूवात झाली. त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद.

दौऱ्याचा हेतू आणि अल्पसंख्याक समाजाच्या कोणत्या अडचणी आहेत?उत्तर : शासनाने अल्पसंख्याक आयोगाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर अल्पसंख्याक समाजाच्या विकास योजना, विविध शासकीय कार्यालयामध्ये असलेले अल्पसंख्याक अधिकारी-कर्मचाºयांना असलेल्या अडचणी, त्याबाबत संबंधित यंत्रणेशी संपर्क करून उपाययोजनेसाठी चर्चा करणे, व्यवस्थेत बदलासाठी विधिमंडळाला अहवाल सादर केला जाणार आहे.

अल्पसंख्याक आयोगाच्या स्थापनेपासून आतापर्यत कोणते लक्ष साध्य झाले ?उत्तर : आयोगाच्या स्थापनेला आता दहा वर्ष लोटली आहेत. मात्र, शासन स्तरावर किंवा सर्व सामान्यांना आयोगाबाबत फारशी माहिती दिल्या गेली नाही. त्यामुळे आयोगाकडे अडचणी घेऊन येणाºयांचे प्रमाण अद्यापही कमीच आहे. ते वाढवण्यासाठी आयोगाची उपयुक्तता पटवून देण्याचे कामही व्हायला हवे.

सद्यस्थितीत आयोगाची व्यवस्था कशी आहे ?उत्तर : गेल्या दहा वर्षात आयोगाच्या रचनेनुसार कधीच पदे भरण्यात आलेली नाहीत. आयोगातील ११ पदे नियमित भरल्याचे एकदाही घडले नाही. त्यामुळे आहे त्या मनुष्यबळात कार्यभार उरकणे, एवढेच काम संबंधितांना करावे लागते. त्यातही पदावर नियुक्ती मिळणाºयांच्या स्वारस्याचे मुद्देही वेगळेच असतात.

केवळ लाभासाठी पदाचा वापर होतो का ?उत्तर : आयोगाचे अध्यक्ष, उपाध्यक्षपदावर ज्यांची नियुक्ती होते. त्यांचा वैयक्तिक कल असला तरच त्यांना पद द्यावे, अन्यथा काहींची इच्छा नसताना पद दिले जाते. त्यातून पदाला किंवा संबंधित समाजालाही न्याय मिळणे दूरच राहून जाते. राजकीय सोयीऐवजी समाजाच्या अडचणी समजून घेणारांनी ही पदे मिळायला हवी.

अल्पसंख्याक योजनांबद्दल काय सांगता येईल ?अल्पसंख्याक समाजाच्या विकास योजना राबवण्याची जबाबदारी आयोगाची नाही. त्यामुळे आयोगाकडे योजना राबवण्यासाठी निधीची तरतूद करण्याचीही गरज नाही, असे सुरूवातीलाच शासनाला सांगितले. समाजाच्या विकास योजना राबवण्याची जबाबदारी ज्या विभाग, संस्थांकडे आहे, त्यांचा लेखाजोखा घेणे, त्यांचा आढावा घेणे, त्यामध्ये बदल करण्यासाठी शासनाला अहवाल देणे, ही कामे आयोगाची आहेत. त्यामुळे आयोगाला योजनांमध्ये अडकून ठेवण्यात काही हशिल नाही.

 

टॅग्स :AkolaअकोलाSocialसामाजिक