शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

अकोल्यातून नवीन रेल्वे गाड्या धावणे अशक्य ; भुसावळ रेल्वे विभागाने दिला अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 01:14 IST

रेल्वे मार्गाची निश्‍चित वाहतूक क्षमता संपुष्टात आल्याने अकोल्यातून नवीन रेल्वे गाड्या धावणे अशक्य आहे, असा अहवाल भुसावळ रेल्वे विभागाने दिला आहे. त्यामुळे भविष्यात अकोलेकरांना नवीन रेल्वे गाड्या मिळण्याची शक्यता मावळली आहे.

ठळक मुद्देरेल्वे मार्गाची वाहतूक क्षमता पडतेय कमीभविष्यात अकोलेकरांना नवीन रेल्वे गाड्या मिळण्याची शक्यता मावळली

संजय खांडेकर । लोकमत न्यूज नेटवर्करेल्वे मार्गाची निश्‍चित वाहतूक क्षमता संपुष्टात आल्याने अकोल्यातून नवीन रेल्वे गाड्या धावणे अशक्य आहे, असा अहवाल भुसावळ रेल्वे विभागाने दिला आहे. त्यामुळे भविष्यात अकोलेकरांना नवीन रेल्वे गाड्या मिळण्याची शक्यता मावळली आहे.मुंबई-कोलकाता लोहमार्गावरील  अकोला रेल्वेस्थानकावरील गाड्यांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी सातत्याने केली जाते. विदर्भातून मुंबईकडे आणि मुंबईतून विदर्भाकडे येणार्‍यांची प्रवासी संख्या जास्त असल्याने रेल्वे तिकीट आरक्षणाची प्रतीक्षा यादी कायम मोठी असते. सकाळी साडेअकरा वाजता गीतांजली एक्स्प्रेसनंतर आणि सायंकाळच्या  ६ वाजताच्या मेलपर्यंत थेट मुंबईकडे जाणारी रेल्वे गाडी अकोल्यातून नाही. पाच-सहा तासांच्या या काळात काही रेल्वे गाड्या अकोला मार्गे वळविल्या तर अकोलेकरांसाठी सुविधा उपलब्ध होईल. अशा आशयाची मागणी अकोल्यातून सातत्याने होत असते. त्यामुळे प्रत्येक रेल्वे बजेटमध्ये अकोलेकरांना रेल्वेगाड्या वाढण्याची अपेक्षा असते. तांत्रिक कारणांमुळे अकोल्यातून रेल्वे गाड्या धावू शकत नाही, ही बाब मात्र अनेकांना ठाऊक नाही. याबाबतचा गोपनीय अहवाल रेल्वे प्रशासनाने पाठविला आहे. क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त रेल्वेगाड्या अकोला रेल्वे ट्रॅकवरून धावताहेत का, अशी विचारणा स्थानक प्रबंधक जी.बी. मीणा यांना केली असता, त्यांनी दुजोरा दिला. मात्र, याबाबत मला काही बोलण्यास नकार दिला.

क्षमता १३0 गाड्यांची धावताहेत १८६.अकोला रेल्वेस्थानकाच्या ट्रॅकची क्षमता दररोज १३0 गाड्यांची आहे. मात्र, अकोल्याच्या रेल्वे ट्रॅकवरून अप-डाऊन बाजूच्या पकडून दररोज १६0 ते १८६ गाड्या धावतात. दररोजची ही वाहतूक ट्रॅकच्या क्षमतेपेक्षा  जास्त झाली आहे. प्रवासी गाड्यापेक्षा कोळसा आणि सिमेंटची वाहतूक करणार्‍या मालगाड्यांची संख्या या मार्गावर जास्त आहे. त्यामुळे या अकोला ट्रॅकवर ओव्हर लोड होत आहे.

ट्रॅकची क्षमता नसल्याने नवीन रेल्वे गाड्या या मार्गे वाढविता येणार नाही. मुंबईकडे जाणार्‍या प्रवाशांना थेट अकोल्यातून आरक्षण मिळत नसले, तरी भुसावळहून अनेक रेल्वे गाड्या मुंबईकडे धावणार्‍या आहेत. दोन टप्प्यात प्रवास केला, तर ही समस्या दूर होऊ शकते.-वसंत बाछुका, रेल्वे समिती सदस्य.

टॅग्स :Akola Railway Stationअकोला रेल्वे स्थानक