शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

अकोल्यातून नवीन रेल्वे गाड्या धावणे अशक्य ; भुसावळ रेल्वे विभागाने दिला अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 01:14 IST

रेल्वे मार्गाची निश्‍चित वाहतूक क्षमता संपुष्टात आल्याने अकोल्यातून नवीन रेल्वे गाड्या धावणे अशक्य आहे, असा अहवाल भुसावळ रेल्वे विभागाने दिला आहे. त्यामुळे भविष्यात अकोलेकरांना नवीन रेल्वे गाड्या मिळण्याची शक्यता मावळली आहे.

ठळक मुद्देरेल्वे मार्गाची वाहतूक क्षमता पडतेय कमीभविष्यात अकोलेकरांना नवीन रेल्वे गाड्या मिळण्याची शक्यता मावळली

संजय खांडेकर । लोकमत न्यूज नेटवर्करेल्वे मार्गाची निश्‍चित वाहतूक क्षमता संपुष्टात आल्याने अकोल्यातून नवीन रेल्वे गाड्या धावणे अशक्य आहे, असा अहवाल भुसावळ रेल्वे विभागाने दिला आहे. त्यामुळे भविष्यात अकोलेकरांना नवीन रेल्वे गाड्या मिळण्याची शक्यता मावळली आहे.मुंबई-कोलकाता लोहमार्गावरील  अकोला रेल्वेस्थानकावरील गाड्यांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी सातत्याने केली जाते. विदर्भातून मुंबईकडे आणि मुंबईतून विदर्भाकडे येणार्‍यांची प्रवासी संख्या जास्त असल्याने रेल्वे तिकीट आरक्षणाची प्रतीक्षा यादी कायम मोठी असते. सकाळी साडेअकरा वाजता गीतांजली एक्स्प्रेसनंतर आणि सायंकाळच्या  ६ वाजताच्या मेलपर्यंत थेट मुंबईकडे जाणारी रेल्वे गाडी अकोल्यातून नाही. पाच-सहा तासांच्या या काळात काही रेल्वे गाड्या अकोला मार्गे वळविल्या तर अकोलेकरांसाठी सुविधा उपलब्ध होईल. अशा आशयाची मागणी अकोल्यातून सातत्याने होत असते. त्यामुळे प्रत्येक रेल्वे बजेटमध्ये अकोलेकरांना रेल्वेगाड्या वाढण्याची अपेक्षा असते. तांत्रिक कारणांमुळे अकोल्यातून रेल्वे गाड्या धावू शकत नाही, ही बाब मात्र अनेकांना ठाऊक नाही. याबाबतचा गोपनीय अहवाल रेल्वे प्रशासनाने पाठविला आहे. क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त रेल्वेगाड्या अकोला रेल्वे ट्रॅकवरून धावताहेत का, अशी विचारणा स्थानक प्रबंधक जी.बी. मीणा यांना केली असता, त्यांनी दुजोरा दिला. मात्र, याबाबत मला काही बोलण्यास नकार दिला.

क्षमता १३0 गाड्यांची धावताहेत १८६.अकोला रेल्वेस्थानकाच्या ट्रॅकची क्षमता दररोज १३0 गाड्यांची आहे. मात्र, अकोल्याच्या रेल्वे ट्रॅकवरून अप-डाऊन बाजूच्या पकडून दररोज १६0 ते १८६ गाड्या धावतात. दररोजची ही वाहतूक ट्रॅकच्या क्षमतेपेक्षा  जास्त झाली आहे. प्रवासी गाड्यापेक्षा कोळसा आणि सिमेंटची वाहतूक करणार्‍या मालगाड्यांची संख्या या मार्गावर जास्त आहे. त्यामुळे या अकोला ट्रॅकवर ओव्हर लोड होत आहे.

ट्रॅकची क्षमता नसल्याने नवीन रेल्वे गाड्या या मार्गे वाढविता येणार नाही. मुंबईकडे जाणार्‍या प्रवाशांना थेट अकोल्यातून आरक्षण मिळत नसले, तरी भुसावळहून अनेक रेल्वे गाड्या मुंबईकडे धावणार्‍या आहेत. दोन टप्प्यात प्रवास केला, तर ही समस्या दूर होऊ शकते.-वसंत बाछुका, रेल्वे समिती सदस्य.

टॅग्स :Akola Railway Stationअकोला रेल्वे स्थानक