शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

राज्यात एचटीबीटी कपाशी बियाणांची ४० टक्के विक्री झाल्याचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 17:45 IST

HTBT cotton seed : वैध मार्गाने हे वाण मिळवून शेतकरी पेरणी करीत असल्याचे समाेर येत आहे.

- राजरत्न सिरसाट

अकोला : एचटीबीटी बियाणे पेरणीवर सरकारची बंदी असताना राज्यात जवळपास ३५ ते ४० टक्के एचटीबीटी कपाशीचे बियाणे अवैधरीत्या विकले गेल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. हे तंत्रज्ञान उत्तम असल्यानेच या बियाणांची विक्री झाल्याचा सूर शेतकरी संघटनांचा आहे. दुसरीकडे मानवी आराेग्यासह जैवविविधतेला धाेका असल्याचा दावा पर्यावरणवाद्यांनी केल्याने याचा सरकारने विचार करणे क्रमप्राप्त आहे. याबाबतीत प्रख्यात कापूस संशाेधक डाॅ. संताेष तावरे यांच्याकडून जाणून घेतले असता त्यांनी शेतकऱ्यांचा एचटीबीटीकडे वाढलेला कल बघता आता सरकारनेही ठाेस निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

 

सन २००९मध्ये जनुकीय स्थानांतरीय ((एचटीबीटी) तंत्रज्ञान आलं. २०१२ व १३मध्ये भारतीय कृषी संशाेधन परिषदेने यावर चाचण्या घेतल्या. परंतु एचटीबीटीमुळे ग्लायफाेसेटचा वापर वाढेल. मानवी आराेग्यासह या बियाणातील तणनाशक प्रतिराेधक जनुकांच्या परागीकरणामुळे इतर वनस्पतींमध्ये याचा प्रसार हाेऊन इतर पिकांच्या जैवविविधतेला धाेका पाेहाेचेल. यामुळे याला पर्यावरणवाद्यांचा विराेध हाेत आहे. परंतु कापूसवगळता साेयाबीन व इतर पिकांवर या ना त्या पद्धतीने ग्लायफाेसेटचा वापर हाेतच आहे. तणनाशकांचा वापर वाढला आहे. दुसरीकडे एचटीबीटी कपाशी बियाणे पेरणी केल्याने शेतातील तण नियंत्रण हाेऊन शेतकऱ्यांची माेठी आर्थिक बचत हाेत असल्याचे समाेर येत आहे. सध्या मजुरांची वानवा बघता कमी खर्चात चांगले उत्पन्न देणारे हे तंत्रज्ञान असल्याने शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरल्याचे दिसत आहे. म्हणूनच अवैध मार्गाने हे वाण मिळवून शेतकरी पेरणी करीत असल्याचे समाेर येत आहे, असे डाॅ. तावरे यांनी सांगितले.

 

राज्यातील कापसाचे क्षेत्र जवळपास ४२ ते ४३ लाख हेक्टर आहे. यासाठी दरवर्षी एक काेटी ८० लाख बीटी कपाशीची पाकिटे लागतात. यात आता एचटीबीटी कपाशीची मागणी वाढू लागल्याने यावर्षी जवळपास ७० ते ७५ लाख एचटीबीटी कपाशीची पाकिटे अवैध मार्गाने विकली गेली. यामुळे सरकारने उर्वरित चाचण्या घेऊन एकदाचा हा गुंता निकाली काढणे गरजेचे असल्याचे डाॅ. तावरे यांनी आपले मत ‘लाेकमत’शी बाेलताना व्यक्त केले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रAkolaअकोला