शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

बालवाड्यांच्या मुद्यावरून महापालिका द्विधा मन:स्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 12:44 IST

अकोला: महापालिका शाळेतील बालवाड्या बंद करून त्याऐवजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाच्या अखत्यारित असलेल्या अंगणवाड्यांचे मनपा शाळांमध्ये स्थानांतरण करण्याचा बाल विकास विभागाच्या आयुक्तांचा प्रस्ताव कधीचाच हवेत विरला.

अकोला: महापालिका शाळेतील बालवाड्या बंद करून त्याऐवजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाच्या अखत्यारित असलेल्या अंगणवाड्यांचे मनपा शाळांमध्ये स्थानांतरण करण्याचा बाल विकास विभागाच्या आयुक्तांचा प्रस्ताव कधीचाच हवेत विरला. बाल विकास विभाग व मनपाच्या संयुक्तिक सर्व्हेनंतर मनपाच्या ३३ पैकी फक्त पाच शाळांमध्ये अंगणवाडी सुरू करता येणार होती. यामुळे मनपा प्रशासनाने बंद केलेले बालवाडीचे वर्ग यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून पुन्हा सुरू करण्याची गरज असताना या मुद्यावरून मनपा उपायुक्त विजयकुमार म्हसाळ द्विधा मन:स्थितीत सापडल्याची माहिती आहे.महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ होत नसल्याने मनपा शाळांवर समायोजनाची परिस्थिती ओढवली. गोरगरीब कुटुंबांना महागड्या कॉन्व्हेंटचा खर्च परवडणारा नसल्यामुळे मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी २०१७ मध्ये मनपाच्या ३३ शाळांमध्ये बालवाडीचे वर्ग सुरू केले. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी मानधन तत्त्वावर ३३ स्वयंसेविका व ३३ मदतनीस यांची पदभरतीद्वारे नियुक्ती केली. सेविकांना तीन हजार रुपये, तर मदतनीस यांना एक हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला होता. बालवाडीचे वर्ग सुरू होऊन एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत नाही तोच एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या आयुक्तांनी मनपाने सुरू केलेली बालवाडी व शहरातील अंगणवाडीच्या संदर्भात भूमिका स्पष्ट केली. मनपाने शहरातील १७९ अंगणवाड्यांसाठी वर्गखोल्या उपलब्ध करून दिल्यास अंगणवाडीतील विद्यार्थी पुढील पहिल्या वर्गासाठी मनपा शाळेत प्रवेश घेऊ शकतील. यामुळे मनपा शाळांची पटसंख्या कायम राहण्यासोबतच शासनाचा उद्देश सफल होणार असल्याचे सुचवित एकात्मिक बाल विकास विभागाच्या आयुक्तांनी बालवाडीचे वर्ग बंद करून अंगणवाड्यांचे मनपा शाळांमध्ये स्थानांतरण करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले होते.पुढे काहीच झाले नाही!शहरातील एकूण १७९ अंगणवाड्या मनपाच्या शाळेत स्थानांतरण करण्यापूर्वी बाल विकास विभाग व मनपाने शाळांची संयुक्तिक पाहणी केली असता मनपाच्या ३३ शाळांपैकी केवळ पाच शाळांमध्ये अंगणवाडीचे वर्ग सुरू करता येणार होते. २०१८ मध्ये ही प्रक्रिया ठप्प पडल्यानंतर पुढे काहीच झाले नाही.

बालवाडी बंद; विद्यार्थी वाऱ्यावरमनपा शाळेत अंगणवाडी सुरू करण्याच्या लगबगीत मोठ्या उत्साहाने सुरू केलेले बालवाडीचे वर्ग बंद करण्याची वेळ प्रशासनावर ओढवली.मनपा शाळेत बालवाडीचे वर्ग सुुरू झाल्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडे खुली झाली होती. बालवाडी बंद झाल्याने गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी वाºयावर आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका