अकोला : जिल्ह्यातील तीन सिंचन प्रकल्पांपैकी प्रत्यक्षात एकाच प्रकल्पाची घडभरणी झाली असून, इतर सर्वच सिंचन प्रकल्पाची कामे अर्धवट स्वरू पात रखडली आहेत. कवठा बॅरेज व सुकळी सिंचन प्रकल्पाचे कामही थंडबस्त्यात पडले आहे. पश्चिम विदर्भातील ३३ प्रकल्पाची घडभरणी यावर्षी होणे अपेक्षित होते; परंतु यातील सर्वच प्रकल्पाची कामे रखडली आहेत.विभागातील १0२ प्रकल्पांची कामे व्हावी, यासाठी राज्यपालांनी या प्रकल्पाचा समावेश अनुशेष यादीत केलेला आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील १0 प्रकल्पांपैकी बाळापूर तालुक्यातील कवठा बॅरेज, सुकळी अकोला, पोपटखेड टप्पा दोन आकोट, कवठा शेलू व पातूर तालुक्यातील प्रकल्पांची घडभरणी यावर्षी जूनमध्येच होणे अपेक्षित होती. तथापि यातील हिवरा या एकाच प्रकल्पाची घळभरणी झाली आहे. या प्रकल्पाची सुधारित किंमत मात्र वाढली आहे. तथापि, सुकळी प्रकल्प अजून भूसंपादनाच्या गर्तेत अडकला आहे. सुधारित प्रशासकीय मान्यतेकरिता जानेवारीमध्ये पाटबंधारे विभागाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. कवठा बॅरेज बाळापूर तालुक्यातील गावांना वरदान ठरणार आहे. तथापि, या बॅरेजची अवस्था इतर प्रकल्पासारखी अधांतरी आहे. पोपटखेड टप्पा २ या प्रकल्पाला तर या यादीतूनच वगळले आहे. नेरधामणाचे काम सुरू झाले आहे. या कामाला गती देण्याची गरज आहे. हा प्रकल्प झाल्यास खारपाणपट्टय़ातील शेती व शेतकर्यांना लाभ होईल. अनेक प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासकीय मान्यता दिल्यास या कामांना सुरुवात होईल; परंतु पावसाळा लागल्याने या प्रकल्पाची कामे आता दिवाळीनंतरच सुरू होण्याची शक्यता आहे. प्रशासकीय मान्यतेअभावी अनेक प्रकल्प रखडलेसुकळी व अन्य प्रकल्पाचे सुधारित प्रशासकीय प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत. त्यांना मान्यता मिळेल. हिवरा प्रकल्पासह इतर प्रकल्पांची घडभरणी झाली आहे. उर्वरित कामे मार्गी लागतील असे पाटबंधारे अधीक्षक अभियंता जलतारे,यांनी सांगीतले.
वर्हाडातील सिंचन प्रकल्पांची कामे अर्धवट!
By admin | Updated: June 21, 2014 01:27 IST