शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
3
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
4
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
5
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
6
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
7
"नवोदित कलाकारांनीही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
8
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
9
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
10
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
11
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
12
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
13
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
14
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी
15
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
16
चिंताजनक! तासाला १०० मृत्यू, कोरोनानंतर 'ही' समस्या घेतेय सायलेंट महामारीचं रुप, WHO चा अलर्ट
17
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
18
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
19
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
20
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...

विदर्भात प्रथमच सोलर पॅनलद्वारे शेतावर सिंचन!

By admin | Updated: March 2, 2015 01:18 IST

पारंपरिक विजेपासून मुक्तता, अपारंपरिक विजेवर पाच एकरावर ओलित.

अकोला : भारनियमनामुळे होणार्‍या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी,विदर्भातील शेतकरी अपारंपरिक ऊर्जा स्रोत वापरण्यावर भर देत आहेत. विदर्भातील पहिल्या सोलर पॅनलचा उपयोग करू न यवतमाळ जिल्हय़ातील लासिना गावच्या शेतकरी महिलेने पाच एकर शेतावर यशस्वी सिंचन केले आहे.विदर्भातील कृषिपंपाचा अनुशेष प्रचंड वाढला आहे. वीज उपलब्ध असूनही ग्रामीण भागात सातत्याने १६ ते १८ तासांचे भारनियमन होत असल्याने शेतकर्‍यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचा निर्णय विदर्भातील शेतकर्‍यांनी घेतला असून, कृषी क्षेत्रात सोलर पॅनलची सुरुवात यवतमाळ जिल्हय़ातून झाली आहे. या जिल्हय़ातील नीना हरीश त्रिवेदी या शेतकरी महिलेने पाच एकर शेतात साडेतीन अश्‍वशक्तीचे १४ सोलर पॅनल लावले आहेत. या पॅनलपासून त्यांना ३३६0 मेगावॅट वीज उपलब्ध होत आहे. यावर्षी त्यांनी पाच एकरावर सेंद्रिय पद्धतीने डाळिंब फळ पिकाची लागवड केली आहे. हे सोलर पॅनल सूर्याच्या कलाप्रमाणे वळत (ऑटो सिस्टीम) सकाळी ७ ते सायंकाळी ५.३0 वाजेपर्यंत शेतकर्‍यांना या सोलरपासून वीजपुरवठा होत असल्याने या शेतकरी महिलेची भारनियमनातून कायमची सुटका झाली आहे. या १४ सोलर पॅनलचा खर्च नीना त्रिवेदी यांना जवळपास ९ लाख रुपये आला आहे. खर्च सुरुवातीला मोठा वाटत असला तरी या सोलरपासून येणारी २0 वर्ष कुठलाही व्यत्यय न येता वीज उपलब्ध होणार आहे. या एका सोलरपासून २.१४ मेगावॅट वीज उपलब्ध होत आहे. असे १४ पॅनल येथे असून, यामध्ये वाढ करता येते म्हणजे ७.५ अश्‍वशक्तीपर्यंत या सोलरची क्षमता वाढवता येते. सतत होणारे भारनियम आणि परिणामी सोसावे लागणारे पिकांचे नुकसान, यावर उपाय म्हणून कृषी सोलर पॅनल यशस्वी ठरले असल्याची प्रतिक्रिया यवतमाळ जिल्ह्यातील महिला शेतकरी लीना त्रिवेदी यांनी दिली. राज्याचे सोलर पॅनल तज्ज्ञ अशोक अग्रवाल यांनी विदर्भात आता सोलर पॅनलची मागणी वाढत असून, विजेवर शेतकर्‍यांना चांगला पर्याय उपलब्ध झाला असल्याचे सांगीतले.