शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठाला प्रलंबित खटल्यांची संख्या वाढविण्यात रस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:15 IST

कुलगुरू डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांच्या विरोधात २०१६ मध्ये दाखल केलेली रीट याचिकेवर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या ...

कुलगुरू डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांच्या विरोधात २०१६ मध्ये दाखल केलेली रीट याचिकेवर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कृषी विद्यापीठाबरोबरच कर्मचारीहित न जपणाऱ्या सर्व संस्थांवर परखड टिपण्णी केली आहे.

कुलगुरू डॉ. पंदेकृविसारख्या संस्थांची कर्मचाऱ्यांच्या दयनीय परिस्थितीबाबत असलेली औदासीन्यता आणि उदासीनता आणि त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या न्यायालयात याचिका दाखल करण्यास भाग पाडणारी प्रवृत्ती दर्शवण्यासाठी न्यायालयाने आपले परखड मत नोंदवले. कायद्यानुसार निर्णय घेण्याची जाणवीपूर्वक कृती केल्यास विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असता आणि त्याचबरोबर खर्च आणि खर्चच नव्हे तर अश खटल्यासाठी लागणारा वेळ, प्रयत्न आणि मनुष्यबळ याचेही जतन झाले असते. जाणीवपूर्वक कृती केल्यास वेळ आणि प्रयत्नांची बचत होऊन संस्थांचादेखील त्याचा फायदा झाला असता, असे मत न्यायालयाने नोंदविले.

आत्मपरीक्षण करण्याची गरज

कृषी विद्यापीठासारख्या संस्थांनी आता आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता असून, अनावश्यक खटले टाळण्याकरिता योग्य ते पावले उचलली पाहिजेत. कायदा आणि न्यायालय निर्णयाची साधी भाषा समजून ते पक्ष आहे त्या प्रकरणात समोर जायचे की नाही, याबाबत जाणीवपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे, असे मत न्यायालयाने आपल्या निर्णयात नोंदवले.

काय आहे प्रकरण?

सय्यद अब्बास सय्यद उस्मान यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांनी निर्णय देताना परखड मत नोंदवले आहे. सय्यद अब्बास हे १९७१ पासून कृषी विद्यापीठात रोजंदारीवर चौकीदार होते, १९९६ मध्ये त्यांना विद्यापीठाने नियमित केले. दोन वर्षांचा परीक्षा परिवीक्षाधीन कालावधी पूर्ण केल्यानंतर १९९८ मध्ये ते नियमित झाले व २००३ मध्ये सेवानिवृत्त झाले. दरम्यान, त्यांनी सेवानिवृत्तीचे लाभ व सेवानिवृत्ती वेतनासाठी त्यांनी केलेला अर्ज विद्यापीठाने फेटाळला. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने नोंदवले की, अशा प्रकरणांमध्ये उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे अनेक आदेश यापूर्वी आले असूनदेखील या प्रकरणी कृषी विद्यापीठ आपल्या स्तरावर हे प्रकरण निकाली न काढता न्यायालयात खटला चालवण्यात उत्साह दाखवत आहे, ही बाब योग्य नाही. सय्यद अब्बास यांचे निवृत्तिवेतनाचे दस्तावेज तयार करून त्यांना सहा महिन्यांत वेतन व इतर लाभ देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.