शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा सरकार व्यापाऱ्यांच्या हिताचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 19:30 IST

भाजपा सरकारचा प्रत्येक निर्णय हा व्यापाºयांच्याच हिताचा असल्याचा घणाघात माजी मंत्री व राष्टÑवादीचे प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे यांनी केला.

ठळक मुद्देगुलाबराव गावंडे यांचा आरोप ३१ आॅक्टोबरपासून शेतकºयांच्या प्रश्नावर बेमुदत धरणे आंदोलन

अकोला : राज्य व केंद्रातील भाजपा सरकार हे शेतकरी हिताचे नसून केवळ व्यापाºयांच्या हिताचे आहे. अपुरा पाऊस व उत्पादनात घट असतानाही सोयाबीनसारख्या महत्त्वाच्या वाणाचे भाव या सरकारने पाडले, कापूस खरेदीला आॅनलाइन करून शेतकºयांची अडवणूक करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या सरकारचा प्रत्येक निर्णय हा व्यापाºयांच्याच हिताचा असल्याचा घणाघात माजी मंत्री व राष्टÑवादीचे प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे यांनी केला. शेतकºयांच्या व्यथांकडे लक्ष वेधण्यासाठी आता राष्टÑवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून संघर्ष करणार असून, येत्या ३१ आॅक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करीत असल्याची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली. स्थानिक विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेला माजी आमदार तुकाराम बिडकर, राष्टÑवादीचे महानगर अध्यक्ष राजू मुलचंदाणी, अनिल मालगे आदी उपस्थित होते. गावंडे यांनी शेतकºयांच्या प्रश्नांकडे होणाºया सरकारच्या दुर्लक्षावर रोष व्यक्त केला. शेतकरी संकटात असताना त्याला आधार देण्याऐवजी हे सरकार कोंडी निर्माण करीत आहे. तूर, उडीद, मुगाच्या खरेदीत हाच प्रकार अनुभवला व आता सोयाबीनच्या भावातही मोठी घसरण सुरू झाली आहे. सोयाबीनला प्रती एकर ६ हजार भाव देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. शेतकºयांची होणारी ससेहोलपट थांबावी, त्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, यासाठी सरकारचे लक्ष वेधण्याकरिता राष्टÑवादी काँग्रेसच्यावतीने आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामधील पहिला टप्पा म्हणून येत्या ३१ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल. या आंदोलनात जिल्हाभरातील शेतकरी सहभागी होणार असून, हे आंदोलन बेमुदत केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.अवैध सावकारी विरोधातही रणशिंगअवैध सावकारी पुन्हा एकदा डोके वर काढत असून, मोठ-मोठी नावे समोर येत आहेत. या सावकाराच्या जाचातून सामान्य शेतकºयाची सोडवणूक करण्यासाठीही याच आंदोलनातून रणशिंग फुंकले जाणार असल्याचे गुलाबराव गावंडे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Politicsराजकारण