शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

भाजपा सरकार व्यापाऱ्यांच्या हिताचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 19:30 IST

भाजपा सरकारचा प्रत्येक निर्णय हा व्यापाºयांच्याच हिताचा असल्याचा घणाघात माजी मंत्री व राष्टÑवादीचे प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे यांनी केला.

ठळक मुद्देगुलाबराव गावंडे यांचा आरोप ३१ आॅक्टोबरपासून शेतकºयांच्या प्रश्नावर बेमुदत धरणे आंदोलन

अकोला : राज्य व केंद्रातील भाजपा सरकार हे शेतकरी हिताचे नसून केवळ व्यापाºयांच्या हिताचे आहे. अपुरा पाऊस व उत्पादनात घट असतानाही सोयाबीनसारख्या महत्त्वाच्या वाणाचे भाव या सरकारने पाडले, कापूस खरेदीला आॅनलाइन करून शेतकºयांची अडवणूक करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या सरकारचा प्रत्येक निर्णय हा व्यापाºयांच्याच हिताचा असल्याचा घणाघात माजी मंत्री व राष्टÑवादीचे प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे यांनी केला. शेतकºयांच्या व्यथांकडे लक्ष वेधण्यासाठी आता राष्टÑवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून संघर्ष करणार असून, येत्या ३१ आॅक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करीत असल्याची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली. स्थानिक विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेला माजी आमदार तुकाराम बिडकर, राष्टÑवादीचे महानगर अध्यक्ष राजू मुलचंदाणी, अनिल मालगे आदी उपस्थित होते. गावंडे यांनी शेतकºयांच्या प्रश्नांकडे होणाºया सरकारच्या दुर्लक्षावर रोष व्यक्त केला. शेतकरी संकटात असताना त्याला आधार देण्याऐवजी हे सरकार कोंडी निर्माण करीत आहे. तूर, उडीद, मुगाच्या खरेदीत हाच प्रकार अनुभवला व आता सोयाबीनच्या भावातही मोठी घसरण सुरू झाली आहे. सोयाबीनला प्रती एकर ६ हजार भाव देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. शेतकºयांची होणारी ससेहोलपट थांबावी, त्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, यासाठी सरकारचे लक्ष वेधण्याकरिता राष्टÑवादी काँग्रेसच्यावतीने आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामधील पहिला टप्पा म्हणून येत्या ३१ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल. या आंदोलनात जिल्हाभरातील शेतकरी सहभागी होणार असून, हे आंदोलन बेमुदत केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.अवैध सावकारी विरोधातही रणशिंगअवैध सावकारी पुन्हा एकदा डोके वर काढत असून, मोठ-मोठी नावे समोर येत आहेत. या सावकाराच्या जाचातून सामान्य शेतकºयाची सोडवणूक करण्यासाठीही याच आंदोलनातून रणशिंग फुंकले जाणार असल्याचे गुलाबराव गावंडे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Politicsराजकारण