शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाख शेतकऱ्यांना देणार विम्याचे ‘कवच’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 15:49 IST

अकोला : मिशन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत यावर्षी जिल्ह्यातील ३ लाख १६ हजार शेतकºयांना विम्याचे कवच देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गुरुवारी दिली.

ठळक मुद्देअकोला जिल्ह्यातील ३ लाख १६ खातेदार शेतकºयांना विमा योजनेत सहभागी करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात आले आहे. जिल्ह्यात १८ ते ३१ मे या कालावधीत जिल्ह्यातील शेतकºयांचा विमा काढण्यात येणार आहे.विमा काढलेल्या शेतकºयांच्या नावे प्रत्येकी २२० रुपये मुदत ठेव (एफडी) संबंधित बँकेत जमा करण्यात येणार आहे.

अकोला : मिशन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत यावर्षी जिल्ह्यातील ३ लाख १६ हजार शेतकºयांना विम्याचे कवच देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गुरुवारी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मिशन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत पात्र गरीब,गरजू व वंचित लाभार्थ्यांना लाभ देण्यात येतो. वार्षिक १२ रुपये हप्ता (प्रीमियम )असलेल्या मिशन पंतप्रधान सुरक्षा विमा योजना अंमलबजावणीच्या पहिल्या टप्प्यात सन २०१८-१९ या वर्षात अकोला जिल्ह्यातील ३ लाख १६ खातेदार शेतकºयांना विमा योजनेत सहभागी करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात १८ ते ३१ मे या कालावधीत जिल्ह्यातील शेतकºयांचा विमा काढण्यात येणार आहे. विमा काढलेल्या शेतकºयांच्या नावे प्रत्येकी २२० रुपये मुदत ठेव (एफडी) संबंधित बँकेत जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावांत शेतकºयांचे अर्ज भरुन घेण्यात येणार आहे. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांना गाव व बँकनिहाय अर्ज देण्यात येणार असून, संबंधित कर्मचारी विमा काढणाºया शेतकºयांचे अर्ज भरुन घेतील. १८ ते ७० वर्षे वयोगटातील शेतकरी या विमा योजनेत सहभागी होऊ शकतील. जिल्ह्यातील शेतकºयांचा विमा काढण्याच्या या योजनेत शेतकºयांच्या विमा हप्त्याची (प्रीमियम )रक्कम भरण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले. यावेळी जिल्हा उपनिबंधक जी.जी.मावळे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ.अतुल दोड, उपजिल्हाधिकारी अभयसिंह मोहिते उपस्थित होते.आठ कोटींचा निधी खर्च करणार!मिशन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व खातेदार ३ लाख १६ हजार शेतकºयांचा विमा काढण्याच्या कामासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत आठ कोटींचा निधी खर्च करण्यात येणार, तसेच शेतकºयांचा विमा काढण्याच्या कामात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले.विमा काढलेल्या शेतकºयांना असा मिळणार लाभ!मिशन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत विमा काढलेल्या शेतकरी कुटुंबांना अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये, अपघातामुळे अंशत: अपंगत्व आल्यास एक लाख आणि पूर्णत: अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये असा लाभ मिळणार आहे, अशी माहितीही जिल्हाधिकाºयांनी दिली.

 

टॅग्स :AkolaअकोलाAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय