शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

अमेरिकेकडे पायघड्या घालण्याऐवजी मंदिरातील सोने बाहेर काढा!

By admin | Updated: November 13, 2014 01:10 IST

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे परखड मत.

विवेक चांदूरकर/ अकोलाअमेरिकेसह इतर देशांकडे पायघड्या घालण्याऐवजी, भीक मागण्याऐवजी, देशातील मंदिरांमध्ये असलेले सोने बाहेर काढा व त्याचा देशाला उपयोग होऊ द्या, असे परखड मत ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी ह्यलोकमतह्णशी बातचित करताना व्यक्त केले.प्रश्न: केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार खासगीकरणावर भर देत आहे, रेल्वेच्याही खासगीकरणाचे सुतोवाच करण्यात आले आहे. याबाबत तुमचे मत काय?उत्तर: सरकारने खासगीकरण करून आरक्षण संपविण्याचा घाट घातला आहे, तसेच विदेशातील कंपन्यांना वारंवार निमंत्रण देण्यात येत आहे, कर्ज मागण्यात येत आहे. विदेशाकडे कर्ज मागण्याऐवजी, अमेरिकेपुढे पायघड्या घालण्याऐवजी, देशातील मंदिरांमध्ये जी किती तरी संपत्ती आहे, सोने आहे, ते बाहेर काढायला हवे व त्या संपत्तीतून देशाचा विकास करायला हवा. यामुळे देशावर कर्जही होणार नाही व विकासही होईल.

प्रश्न: पंधरा वर्षांनंतर राज्यातही सरकार बदलले आहे, नव्या केंद्र व राज्य सरकारकडून तुम्हाला अपेक्षा आहेत काय? उत्तर: आमचा लढा अधिक तीव्र होणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातआमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. आता सरकार बदलले आहे. त्यामुळे नव्या सरकारच्या कार्यकाळात मागण्या मान्य करून घेण्यासाठी आम्ही जोरदार लढा देऊ. आमच्या मागण्या मान्य होतील, अशी आम्हाला आशा आहे.

प्रश्न: चळवळीचे स्वरूप आगामी काळात कशा प्रकारचे राहील?उत्तर: असंघटित क्षेत्रात काम करणार्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही काम करतो. या क्षेत्रात केवळ आर्थिकच नव्हे, तर सामाजिक प्रश्नही महत्त्वाचे आहेत. हमाल, माथाडी हे सामाजिकदृष्ट्या शोषित आहेत. या क्षेत्रात स्त्री-पुरुष भेदही महत्त्वाचा आहे. स्त्रियांना पुरुषापेक्षा कमी मजुरी मिळते. त्यांनाही समान मजुरी मिळायला हवी. त्याही पुरुषांएवढेच काम करतात.

प्रश्न: तुमच्या मागण्या जुन्याच आहेत की नवीन? सरकारकडून काही नवे कायदे अपेक्षित आहेत? उत्तर: हमाल, माथाडींच्या हक्काचे जे कायदे झालेले आहेत, त्यांची अंमलबजावणी होत नाही आहे, ती व्हायला हवी. सामाजिक सुरक्षा कायदा मान्य झाला आहे. दारिद्रय़ रेषेखालीलची अट ही शासनाच्या बाजूची आहे. त्यामुळे गरिबांवर अन्याय होत आहे.

प्रश्न: भ्रष्टाचारी मंत्र्यांना काढून टाका, अशी तुमची मागणी आहे काय? उत्तर: ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, किंवा आरोप सिद्ध झाले आहेत, अशांना मंत्रिमंडळात घेऊ नका, अशी मागणी मी केली आहे. त्याचप्रमाणे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असतानाही त्यांचा मंत्रिमंडळात समोवश करण्यात आला आहे, अशा मंत्र्यांना काढून टाकायला हवे.

प्रश्न: आपण अंधश्रद्धा निर्मुलन समितीमध्येही सक्रिय सहभाग घेतला होता. डॉ. नरेंद्र दाभोलकर गेल्यानंतर आता चळवळीचे स्वरूप काय असेल?उत्तर: दाभोलकर गेल्यानंतर चळवळ संपणार नाही, तर त्याच गतीने सुरू राहणार आहे. आता भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यामुळे हिंदुत्ववादी शक्ती डोके वर काढत आहे. त्यामुळे पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना अधिक जोमाने काम करण्याची गरज आहे.

प्रश्न: भाजपच्या कार्यकाळात पुरोगामी चळवळ कशी असेल? उत्तर: भाजपची सत्ता हा पुरोगामी चळवळीसाठी संकटकाळ आहे. आम्ही उघड्या डोळ्यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. कोणत्याही परिस्थितीत आम्ही राज्यघटनेला धक्का लावू देणार नाही.