शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

शेकापूर येथे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:19 IST

कृषी संजीवनी योजनेतून अर्थसाहाय्य बाळापूर: नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत बाळापूर तालुक्यातील ५७ गावांचा समावेश करण्यात आला. तीन टप्प्यात ...

कृषी संजीवनी योजनेतून अर्थसाहाय्य

बाळापूर: नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत बाळापूर तालुक्यातील ५७ गावांचा समावेश करण्यात आला. तीन टप्प्यात योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातर्गंत शेतकऱ्यांना ठिंबक सिंचन, तुषार सिंचन, शेटनेट हाऊस, पॉली हाऊस, फळबाग लागवड, ट्रॅक्टर, शेती अवजारे, शेततळे देण्यात येतात. तालुक्यातील रिधोरा येथील शेतकरी देवेंद्र करणकार यांना सरपंच संजय अघडते यांच्या हस्ते ट्रॅक्टर व पेरणी यंत्राचे वितरण करण्यात आले.

सिरसोली येथे शहिद दिन साजरा

सिरसोली: सिरसोली ग्रामपंचायत कार्यालयात शहिद दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला सरपंच सारिका वानरे, उपसरपंच उषा नागमते, संजय खोटरे, चेतन गुहे, नंदकिशोर गेबड, रमेश मुयांडे, मोहन कोल्हे, दीपक मालठाणकर, संदीप अंबुसकर, प्रवीण वानरे, दीपक वानखडे, नागसेन भारसाकळे, शंकर अनासाने, विकास वानखडे आदी उपस्थित होते.

मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

बाळापूर: कोळासा येथील एका १६ वर्षीय मुलीने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. वैष्णवी राजेश वानखडे असे मृतक मुलीचे नाव आहे. तिच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. धम्मदीप वानखडे यांच्या तक्रारीनुसार बाळापूर आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

पातूर नंदापूर येथे वरली जुगारावर छापा

पातूर नंदापूर: येथील सायंकाळी सुरू असलेल्या वरली जुगार अड्ड्यावर विशेष पथकाने छापा घालून सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख १० हजार, २० हजार रूपये किंमतीचे मोबाइल जप्त केले. पोलिसांनी अफसर खा गुलशेर खा, सीताराम काटोले, सुनील श्यामराव मनवर, वसीम अफसर, राजु खान पठाणण, राहुल भगत यांच्याविरूद्ध जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

कानडी परिसरात अवकाळी पावसाने नुकसान

मूर्तिजापूर: तालुक्यातील कानडी बाजार परिसरात सतत तीन-चार दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे गहू, हरभरा, कांदा व आंबा पिकाचे अतोनात नुकसान झाले. पीक नुकसानाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. लॉकडाऊन व कोरोनामुळे शेतकरी आधीच हवालदील झाला आहे. त्यात अवकाळी पावसामुळे तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. शासनाने शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.