शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

शेकापूर येथे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:19 IST

कृषी संजीवनी योजनेतून अर्थसाहाय्य बाळापूर: नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत बाळापूर तालुक्यातील ५७ गावांचा समावेश करण्यात आला. तीन टप्प्यात ...

कृषी संजीवनी योजनेतून अर्थसाहाय्य

बाळापूर: नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत बाळापूर तालुक्यातील ५७ गावांचा समावेश करण्यात आला. तीन टप्प्यात योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातर्गंत शेतकऱ्यांना ठिंबक सिंचन, तुषार सिंचन, शेटनेट हाऊस, पॉली हाऊस, फळबाग लागवड, ट्रॅक्टर, शेती अवजारे, शेततळे देण्यात येतात. तालुक्यातील रिधोरा येथील शेतकरी देवेंद्र करणकार यांना सरपंच संजय अघडते यांच्या हस्ते ट्रॅक्टर व पेरणी यंत्राचे वितरण करण्यात आले.

सिरसोली येथे शहिद दिन साजरा

सिरसोली: सिरसोली ग्रामपंचायत कार्यालयात शहिद दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला सरपंच सारिका वानरे, उपसरपंच उषा नागमते, संजय खोटरे, चेतन गुहे, नंदकिशोर गेबड, रमेश मुयांडे, मोहन कोल्हे, दीपक मालठाणकर, संदीप अंबुसकर, प्रवीण वानरे, दीपक वानखडे, नागसेन भारसाकळे, शंकर अनासाने, विकास वानखडे आदी उपस्थित होते.

मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

बाळापूर: कोळासा येथील एका १६ वर्षीय मुलीने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. वैष्णवी राजेश वानखडे असे मृतक मुलीचे नाव आहे. तिच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. धम्मदीप वानखडे यांच्या तक्रारीनुसार बाळापूर आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

पातूर नंदापूर येथे वरली जुगारावर छापा

पातूर नंदापूर: येथील सायंकाळी सुरू असलेल्या वरली जुगार अड्ड्यावर विशेष पथकाने छापा घालून सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख १० हजार, २० हजार रूपये किंमतीचे मोबाइल जप्त केले. पोलिसांनी अफसर खा गुलशेर खा, सीताराम काटोले, सुनील श्यामराव मनवर, वसीम अफसर, राजु खान पठाणण, राहुल भगत यांच्याविरूद्ध जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

कानडी परिसरात अवकाळी पावसाने नुकसान

मूर्तिजापूर: तालुक्यातील कानडी बाजार परिसरात सतत तीन-चार दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे गहू, हरभरा, कांदा व आंबा पिकाचे अतोनात नुकसान झाले. पीक नुकसानाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. लॉकडाऊन व कोरोनामुळे शेतकरी आधीच हवालदील झाला आहे. त्यात अवकाळी पावसामुळे तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. शासनाने शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.