शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

शेकापूर येथे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:19 IST

कृषी संजीवनी योजनेतून अर्थसाहाय्य बाळापूर: नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत बाळापूर तालुक्यातील ५७ गावांचा समावेश करण्यात आला. तीन टप्प्यात ...

कृषी संजीवनी योजनेतून अर्थसाहाय्य

बाळापूर: नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत बाळापूर तालुक्यातील ५७ गावांचा समावेश करण्यात आला. तीन टप्प्यात योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातर्गंत शेतकऱ्यांना ठिंबक सिंचन, तुषार सिंचन, शेटनेट हाऊस, पॉली हाऊस, फळबाग लागवड, ट्रॅक्टर, शेती अवजारे, शेततळे देण्यात येतात. तालुक्यातील रिधोरा येथील शेतकरी देवेंद्र करणकार यांना सरपंच संजय अघडते यांच्या हस्ते ट्रॅक्टर व पेरणी यंत्राचे वितरण करण्यात आले.

सिरसोली येथे शहिद दिन साजरा

सिरसोली: सिरसोली ग्रामपंचायत कार्यालयात शहिद दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला सरपंच सारिका वानरे, उपसरपंच उषा नागमते, संजय खोटरे, चेतन गुहे, नंदकिशोर गेबड, रमेश मुयांडे, मोहन कोल्हे, दीपक मालठाणकर, संदीप अंबुसकर, प्रवीण वानरे, दीपक वानखडे, नागसेन भारसाकळे, शंकर अनासाने, विकास वानखडे आदी उपस्थित होते.

मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

बाळापूर: कोळासा येथील एका १६ वर्षीय मुलीने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. वैष्णवी राजेश वानखडे असे मृतक मुलीचे नाव आहे. तिच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. धम्मदीप वानखडे यांच्या तक्रारीनुसार बाळापूर आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

पातूर नंदापूर येथे वरली जुगारावर छापा

पातूर नंदापूर: येथील सायंकाळी सुरू असलेल्या वरली जुगार अड्ड्यावर विशेष पथकाने छापा घालून सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख १० हजार, २० हजार रूपये किंमतीचे मोबाइल जप्त केले. पोलिसांनी अफसर खा गुलशेर खा, सीताराम काटोले, सुनील श्यामराव मनवर, वसीम अफसर, राजु खान पठाणण, राहुल भगत यांच्याविरूद्ध जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

कानडी परिसरात अवकाळी पावसाने नुकसान

मूर्तिजापूर: तालुक्यातील कानडी बाजार परिसरात सतत तीन-चार दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे गहू, हरभरा, कांदा व आंबा पिकाचे अतोनात नुकसान झाले. पीक नुकसानाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. लॉकडाऊन व कोरोनामुळे शेतकरी आधीच हवालदील झाला आहे. त्यात अवकाळी पावसामुळे तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. शासनाने शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.