शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

शहरांची तपासणी; ‘क्यूसीआय’च्या प्रक्रियेला खीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 14:08 IST

ठिकठिकाणी तुंबलेला कचरा तसेच उघड्यावर शौचास बसणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे.

अकोला: राज्यात स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०१९’ आणि आता ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२०’ अंतर्गत महापालिका, नगर परिषद, नगरपालिकांमधील स्वच्छतेच्या कामांचे मूल्यमापन केले जाणार असल्याचा गवगवा केला जात होता. सदर मूल्यमापन हे प्रत्यक्ष स्थळभेटीच्या आधारावर अपेक्षित आहे. याकरिता केंद्र शासनाच्या ‘क्यूसीआय’(क्वॉलिटी कौन्सिल आॅफ इंडिया)मार्फत शहरांच्या तपासणीला खीळ बसल्याचे चित्र असून, सर्वत्र घाणीचे साम्राज्य, ठिकठिकाणी तुंबलेला कचरा तसेच उघड्यावर शौचास बसणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे.केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानची अंमलबजावणी केली जात आहे. राज्यात स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्वच्छ सर्वेक्षण-२०१९ तसेच स्वच्छ सर्वेक्षण-२०२० अंतर्गत महापालिका, नगर परिषद, नगरपालिकांमधील स्वच्छतेच्या कामांच्या मूल्यमापनाला सुरुवात करण्यात आली. सदर मूल्यमापन हे प्रत्यक्ष स्थळभेटीच्या आधारावर अपेक्षित आहे. संबंधित स्वायत्त संस्थांचे ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०१८’ अंतर्गत मूल्यमापन करण्यात आले होते. राज्यातील सर्व शहरांची कामगिरी उच्चतम होण्यासाठी शहरांना प्रोत्साहन मिळावे म्हणून शासनाने बक्षीस योजना जाहीर केली. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ मध्ये राज्याची कामगिरी सर्वोत्कृष्ट ठरली होती. अभियानच्या पहिल्या टप्प्यात उघड्यावर शौचास बसणाºयांना मनाई करून त्यांच्या घरी वैयक्तिक शौचालय बांधून देण्यात आले. त्यानंतर स्वच्छ सर्वेक्षण-२०२० अंतर्गत वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालयांची तपासणी करणे, मोकळ्चा मैदानांची पाहणी करण्यासह सार्वजनिक स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘क्यूसीआय’ (क्वॉलिटी कौन्सिल आॅफ इंडिया)मार्फत तपासणी केली जात असल्याचा दावा महापालिकांच्या स्तरावर करण्यात येत असला तरी, प्रत्यक्षात वस्तुस्थिती निराळी असल्याचे चित्र आहे.सर्वत्र घाणीचे साम्राज्य‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२०’नुसार राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार स्वायत्त संस्थांच्या स्तरावर स्वच्छतेची कामे सुरू झाल्याचे चित्र दिसत असले तरी प्रत्यक्षात शहरांमध्ये साचलेला कचरा, उघड्यावर शौच करणाºयांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते.‘कोरोना’चे निमित्त; प्रक्रिया ठप्पबहुतांश नागरी स्वायत्त संस्थांनी ‘ओडीएफ’चा दर्जा मिळविल्यानंतर आता ‘ओडीएफ प्लस प्लस’चा दर्जा मिळविण्यासाठी स्वच्छतेच्या कामांची कागदोपत्री पूर्तता करण्याचे धोरण अवलंबिले आहे. कोरोनाचे निमित्त साधत शहरांनी स्वच्छता अभियानकडे साफ दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान