शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

३ वर्षांपासून पडून असलेल्या शिधापत्रिकांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 01:45 IST

अकोला : शहर अन्न धान्य वितरण अधिकारी कार्यालयाने लाभार्थींच्या नावे तयार केलेल्या शेकडो शिधापत्रिका गेल्या तीन वर्षांपासून कार्यालयातच पडून असल्याचा प्रकार उघड होत आहे. त्या शिधापत्रिकांचे वाटप संबंधित लाभार्थींना झालेच नाही.

ठळक मुद्देअहवाल दोन दिवसांत वरिष्ठांकडे होणार सादर

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहर अन्न धान्य वितरण अधिकारी कार्यालयाने लाभार्थींच्या नावे तयार केलेल्या शेकडो शिधापत्रिका गेल्या तीन वर्षांपासून कार्यालयातच पडून असल्याचा प्रकार उघड होत आहे. त्या शिधापत्रिकांचे वाटप संबंधित लाभार्थींना झालेच नाही. त्यामुळे सहायक जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांकडून या प्रकाराची चौकशी सुरू आहे. दोन दिवसांत त्यांचा अहवाल वरिष्ठांना सादर केला जाणार असल्याची माहिती आहे.अकोला शहरातील लाभार्थींना नवीन शिधापत्रिका, दुय्यम शिधापत्रिका, शिधापत्रिकेतून नाव कमी करणे, वाढ करणे यासह महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेच्या लाभासाठी प्रमाणपत्र देण्याचे काम शहर अन्न धान्य वितरण अधिकारी कार्यालयातून केले जाते. त्यासाठी या कार्यालयाने एक स्वतंत्र कक्षच तयार केला. तसेच या कामांसाठी स्वतंत्र कर्मचारीही दिले. या कक्षावर निरीक्षण अधिकारी, अन्न धान्य वितरण अधिकारी यांचे नियंत्रण असते. शिधापत्रिकेसाठी अर्ज घेणे, त्यासोबत कागदपत्रांची पूर्तता करून घेणे, गृहभेट अहवाल घेतल्यानंतर ठरलेल्या कालावधीत शिधापत्रिकेचे वाटप करण्याची जबाबदारी या कक्षातील कर्मचार्‍याची आहे. त्या कक्षात २0१४ पासून आतापर्यंत नवीन आणि दुय्यमसाठी अर्ज केलेल्यांच्या शिधापत्रिका तयार आहेत. त्यांची संख्या तब्बल ७00 पेक्षाही अधिक आहे. त्या शिधापत्रिकांचे वाटपच झाले नसल्याचा मुद्दा काही दिवसांपूर्वी पुढे आला. या गंभीर प्रकाराची चौकशी करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे यांनी सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी औदुंबर पाटील यांना निर्देश दिले. त्यानुसार शहर अन्न धान्य वितरण अधिकारी कार्यालयात पडून असलेल्या शेकडो शिधापत्रिका ताब्यात घेत गेल्या काही दिवसांपासून चौकशी सुरू करण्यात आली. ती आता आटोपली आहे. अंतिम अहवाल तयार झाल्यानंतर वरिष्ठांना सादर केला जाणार आहे. 

दुकानदारांना हाताशी धरून धान्य वाटपात घोळनव्या आणि दुय्यम शिधापत्रिका तयार झाल्यानंतर त्याची नोंद घेऊन धान्य वाटपासाठी पात्र ठरवण्यात आलेल्या शिधापत्रिकाही त्यामध्ये आहेत. लाभार्थींकडे शिधापत्रिका नसल्याने दुकानदाराने त्यांच्या नावे उचल केलेले धान्य त्यांना न देण्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे शेकडो शिधापत्रिकांपैकी ज्या धान्य लाभार्थींच्या आहेत, त्यांच्या नावे दुकानदारांनी धान्याची उचल केली का, ते धान्य लाभार्थींंना वाटप झाले का, याचीही चौकशी झाल्यास मोठा घोळ उघड होण्याची शक्यता आहे. 

महिला कर्मचार्‍याचा कार्यभार बदलला!या प्रकाराची तक्रार प्राप्त होताच शहर अन्न धान्य वितरण अधिकारी कार्यालयात दुय्यम शिधापत्रिका देणे, नाव कमी करणे, वाढवणे, जीवनदायी योजनेचे प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी असलेल्या महिला कर्मचार्‍याला तेथून हटवण्यात आले. त्या ठिकाणी नव्या कर्मचार्‍याला जबाबदारी देण्यात आली आहे. 

अंतिम चौकशी अहवाल तयार आहे. दरम्यानच्या काळात सुटीवर असल्याने तो सादर करता आला नाही. बुधवारपर्यंत वरिष्ठांना अहवाल सादर केला जाईल. - औदुंबर पाटील,  सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी