शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

कृषी विभागाचे निविष्ठा तपासणी पथक गठित

By admin | Updated: May 19, 2014 20:21 IST

आकोट तालुक्यात निविष्ठांच्या गुणवत्ता तपासणीसाठी पथक गठीत; कार्यवाहीस मात्र अद्याप प्रारंभ नाही.

आकोट : खरीप व रब्बी हंगामामध्ये तालुक्यातील कृषी सेवा केंद्राद्वारे शेतकर्‍यांना विक्री करण्यात येणार्‍या निविष्ठांच्या गुणवत्ता तपासणीसाठी शासकीय स्तरावर पथकाचे गठन करण्यात आले आहे. या पथकाच्या प्रत्यक्ष कार्यवाहीस मात्र अद्याप प्रारंभ झालेला नाही.तालुक्यातील कृषी सेवा केंद्रामार्फ त शेतकर्‍यांना निविष्ठा, खते, बियाणे, कीटकनाशके यांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा व विक्री होते; परंतु अनेकदा या निविष्ठा, बियाणे अथवा कीटकनाशके दर्जेदार नसल्याच्या असंख्य तक्रारी येतात; मात्र त्यावर काहीही कार्यवाही होत नसल्याने आणि शेतकरी एकटाच आपली लढाई लढत असल्याने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान होते. हंगामही निघून जातो आणि पैसाही निघून जातो. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडतो. त्याचबरोबर अनेक कृषी सेवा केंद्र चालक खतांची साठेबाजी करून चोरट्या मार्गाने व चढ्या दराने खताची विक्री करतात. त्यामुळेही शेतकर्‍यांची नाडवणूक होते. बरेच कृषी सेवा केंद्रचालक शासनाने बंदी घातलेल्या फवारणीच्या औषधांची सर्रास विक्री करतात. त्यामुळे उत्पादित मालाचा दर्जा घसरतो. अनेकदा कृषी सेवा केंद्रातून नेलेले बियाणे उगवतच नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडतो. या सार्‍या बाबींवर वेळेपूर्वीच उपाययोजना करून शेतकर्‍यांना दिलासा मिळावा यासाठी बियाणे, खते, कीटकनाशके तथा अन्य निविष्ठांचा दर्जा तपासण्यासाठी कृषी संचालक पुणे यांनी प्रत्येक तालुकास्तरावर निविष्ठा गुणवत्ता तपासणी पथक गठित करून त्याद्वारे अनुचित प्रकारांवर अंकुश बसविण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार आकोट तालुक्यात असे पथक गठित करण्यात आले असून, या पथकाचे प्रमुख तालुका कृषी अधिकारी अशोक साठी, सदस्य सचिव कृषी अधिकारी पंचायत समिती बी. टी. राठोड, सदस्य वजनमापे निरीक्षक तथा कृषी अधिकारी ए. आर. पांडे हे राहणार आहेत. बाजारात शेतकर्‍यांची बी-बियाणे खरेदीची लगबग सुरू झालेली आहे. सोयाबीन बियाण्यांचा मोठा तुटवडा भासणार आहे, अशा स्थितीत कृषी सेवा केंद्राद्वारे कोणतीही चलाखी होऊ न देण्यासाठी या पथकाने कार्यान्वित व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.