शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

अकोला जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींच्या कारभाराची तपासणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 10:18 IST

या तपासणीत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या कारभाराची तपासणी केली जाणार आहे.

- संतोष येलकर  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व ५३५ ग्रामपंचायतींच्या मागील पाच वर्षातील अभिलेख्यांची (रेकॉर्ड) तपासणी करून, अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सौरभ कटियार यांनी जिल्ह्यातील सातही पंचायतींच्या गटविकास अधिकाऱ्यांना (बीडीओ) १२ आॅगस्ट रोजी दिला. त्यानुसार या तपासणीत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या कारभाराची तपासणी केली जाणार आहे.ग्रामपंचायत स्तरावर असलेली सर्व प्रकारची अभिलेखे अद्ययावत नसल्यामुळे संबंधित माहितीच्या दृष्टीने प्रशासनाला विविध अडचणींचा सामना करावा लागतो. काही ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवकांच्या बदल्या झाल्यानंतर, त्या ग्रामपंचायतींच्या अभिलेख्यांचे दप्तर नवीन ग्रामसेवकांना देण्यात आले नसल्याने, ग्रामपंचायतींचे कामकाज करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे यासंदर्भात विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या अभिलेख्यांचे दप्तर अद्ययावत करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ५३५ ग्रामपंचायतींच्या गत पाच वर्षातील अभिलेख्यांची (रेकॉर्ड) १५ आॅगस्ट ते १५ सप्टेंबर या महिनाभराच्या कालावधीत तपासणी करण्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना १२ आॅगस्ट रोजी दिला आहे. ग्रामपंचायतींच्या दप्तर तपासणीत आढळून येणाºया त्रुटीचा अहवाल सादर करण्याचेही मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या गत पाच वर्षातील कारभाराची तपासणी करण्यात येणार आहे.

तपासणीसाठी विस्तार अधिकाऱ्यांची नेमणूक!जिल्ह्यातील सातही पंचायत समित्या अंतर्गत ग्रामपंचायतींच्या अभिलेख्यांची तपासणी करण्यासाठी पंचायत समित्यांमधील पंचायत विभागाच्या १४ विस्तार अधिकाºयांची नेमणूक करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिला आहे. त्यानुसार १५ आॅगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत संबंधित विस्तार अधिकाºयांच्या चमूकडून ग्रामपंचायतींची दप्तर तपासणी करण्यात येणार आहे.

टॅग्स :Akolaअकोलाgram panchayatग्राम पंचायत