शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

सात-बारावर वारसाची नोंद करता येणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:18 IST

व्याळा : सात-बारावर वारसाची नोंद, तक्रार अर्ज, कर्ज बोजा दाखल करणे, कमी करणे, अज्ञान पालन कर्ता नोंद कमी करणे ...

व्याळा : सात-बारावर वारसाची नोंद, तक्रार अर्ज, कर्ज बोजा दाखल करणे, कमी करणे, अज्ञान पालन कर्ता नोंद कमी करणे आदी नोंदी करण्यासाठी आता नागरिकांना तलाठी कार्यालयात चकरा मारण्याची गरज राहणार नसून, नागरिकांना घरबसल्या नोंदणीसाठी अर्ज करण्याची सुविधा महसूल विभागाने उपलब्ध करून दिली आहे.

त्यासाठी ई हक्क प्रणाली विकसित करण्यात आली आहे. महाभूमी या संकेतस्थळावर नोंदणी करून नागरिकांना अर्ज करता येणार आहे. यापूर्वी विभागाने नागरिकांना सात-बारा डिजिटल उपलब्ध करून देऊन राज्यातील काही बँकांशी करार केला आहे. शेतकरी यांना कर्ज घेण्यासाठी बँकांना सात-बारा, आठ अ देण्याचे काम नाही, तर तो सर्व बँकेतच उपलब्ध होणार आहे. तसेच अनेक कार्यालयात ही सात-बारा लिंक जोडण्यात आल्याने शेतकऱ्यांना सात-बारासाठी चकरा मारायचे काम बंद होणार आहे.

अशी होणार प्रक्रिया...

मृत व्यक्तीनंतर त्याच्या वारसांची नोंद घेण्यासाठी नागरिकांनी महाभूमी या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. हा अर्ज संबंधित गावाच्या तलाठी यांच्याकडे जाईल. तलाठी या अर्जाची ऑनलाईन पडताळणी करतील. ऑनलाईनमुळे तलाठी स्तरावर पेंडन्सी कळणार आहे. आवश्यक कागदपत्रे जोडल्यास पंधरा दिवसात वारस नोंद होईल.

वारस नोंद, तक्रार अर्ज ई हक्क प्रणाली ही सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली असून घरबसल्या ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.

- रामदास जगताप, राज्य समन्वयक, ई फेरफार प्रकल्प