शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

भाजीपाल्यावर महागाईचा तडका; सामान्यांच्या खिशाला कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 11:06 IST

Inflation on vegetables Akola Market भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने दर ४० ते ५० टक्क्यांनी वाढले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :जिल्ह्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर भाजीपाल्याच्या भावात आलेली तेजी आजतागायत कायम आहे. कांदा, बटाट्यांमध्ये भावाची स्पर्धा होत असून, तूर डाळीने शंभरी ओलांडून दीड शतकाकडे वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे.२४ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाल्यावर घरपोच भाजीपाला ही संकल्पना चांगलीच लोकप्रिय झाली होती; आता कोरोनाचे संकट कायम असतानाही अनलॉकमुळे पुन्हा बाजारातील गर्दी वाढू लागली. सकस आहारावर भर देण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन लक्षात घेता भाजीपाल्याची मागणी वाढली आहे. मे आणि जून महिन्यात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होत होती. त्यामुळे दर स्थिर होते. गेल्या तीन महिन्यांपासून सततचे ढगाळ हवामान आणि वारंवार होणाऱ्या पावसामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने दर ४० ते ५० टक्क्यांनी वाढले आहेत. त्यातही सप्टेंबरचा शेवट व आॅक्टोबरचा पहिला पंधरवडा भाजीपाल्यासाठी तेजीचा ठरला आहे, तर कोथिंबीरचाही रूबाब दीडशेच्या घरात आहे.व्यापाऱ्यांकडील साठा संपला. शेतकºयांकडे तूर नाही. सरकारने नाफेडद्वारे खरेदी केलेली तूर सध्या बाजारात येत आहे. सरकारनेच किमतीवर नियंत्रण आणले पाहिजे. किमती वाढल्या तर काळाबाजार वाढेल.-वसंत बाछुका, व्यापारी.भाजीपाल्याच्या भावात आलेली तेजी ग्राहकांना भुर्दंड देणारी आहे. पंधरा दिवसांपूर्वीचे भाव आणि आताचे भाव याचे कुठेही तुलनाच होत नाही, कांदे, बटाटे, कोथिंबीर, टमाटे यांच्या भावातील वाढ आश्चर्यकारक आहे.-प्रशांत सोळंके, ग्राहकआयात बंद, नवी तूर येण्यास उशीरडाळींची आयात बंद असून, सध्या नवी तूर बाजारात येण्यास उशीर आहे, त्यामुळे उपलब्ध साठा पाहता भाव वाढले आहेत. सध्या तूर डाळीचे भाव १३५ ते १४५ रुपये प्रति किलो झाले आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाMarketबाजार