शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

महागाईची हद्द झाली; खताचे दर अडीचशे रुपयांनी वाढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:20 IST

अकोला : खरीप हंगामाच्या तोंडावर सध्या जिल्ह्यात मशागतीचे कामे सुरू आहेत. गतवर्षी अति पाऊस व परतीच्या पावसामुळे खरीप हंगामाचे ...

अकोला : खरीप हंगामाच्या तोंडावर सध्या जिल्ह्यात मशागतीचे कामे सुरू आहेत. गतवर्षी अति पाऊस व परतीच्या पावसामुळे खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतमालाला मिळणारा कमी भाव, यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच खरीप हंगामाच्या तोंडावर खताचे दर सरासरी २५० रुपयांनी वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस, तूर, सोयाबीन तर रबी हंगामात हरभरा, मूग, ज्वारी, गहू आदी पिके घेतली जातात. जिल्ह्यात बहुतांश जमिनी कोरडवाहू असल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्र खरीप हंगामावरच अवलंबून असते. गतवर्षी मूग, उडदावर आलेल्या व्हायरसमुळे नुकसान झाले. त्यानंतर सततच्या पावसामुळे सोयाबीन, ज्वारीचे व बोंडअळीमुळे कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. असे असतानाही मोठ्या हिमतीने शेतकरी येणाऱ्या खरीप हंगामाच्या तयारीत गुंतला आहे. ग्रामीण भागात नांगरणी, वखरणीची कामे सुरू आहेत. पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने यांत्रिक मशागतही महागली असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तसेच दरवर्षी शेतीची अवजारे, बी-बियाणे आणि रासायनिक खतांच्या किमती वाढत आहेत. यंदा १ मार्चपासून खत उत्पादक कंपन्यांनी खतांच्या दरात प्रति ५० किलोच्या बॅग मागे १७.३४ टक्के वाढ केली आहे. ही वाढ शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी ठरत आहे. उत्पादन खर्चानुसार शेतमालाला हमीभाव मिळत नसल्यानेे शेतकरी संकटात सापडला आहे. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर खताचे दर वाढल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

-------------------------

दरवर्षी महागाई वाढत चालली आहे. असे असतानाही शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेती व्यवसाय तोट्यात गेला आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर खताच्या दरात झालेली वाढ ही शेतकऱ्यांना परवडणारी नाही.

- सुनील घोगरे, शेतकरी, टाकळी खु.

-------------------------------------

पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरचे भाव वाढल्याने सर्वसामान्य त्रस्त असतानाच खताच्या किमती वाढल्या. दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने गोरगरीब नागरिकांनी जगावे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- निखिल दामोदर, शेतकरी, टाकळी खु.

---------------------------------------

खरिपाची पेरणी काही महिन्यांवर असतानाच डीएपी खताच्या दरात झालेली वाढ शेतकऱ्यांच्या हिताची नाही. त्यामुळे शासनाने लक्ष देऊन झालेली दरवाढ कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

-धम्मपाल शिरसाट, शेतकरी, घुसर.

---------------------------------------------------------

इंधन वाढल्याने मशागतही महागली

पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाल्याने ट्रॅक्टरच्या साहाय्याने केली जाणारी मशागतही महागली आहे. सध्या डिझेलचे भाव गगनाला पोहोचल्याने शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. खरीप हंगामाची पेरणी काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना सध्या ग्रामीण भागात नांगरणी, वखरणीची कामे सुरू असून, शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

------------------------------------------

खत आधीचे दर आताचे दर

१०-२६-२६ ११८५ १३८५

१२-३२-१६ १२०० १३७५

डीएपी १२०० १४५०

२०-२०-०-१३ ९५० ११२५