शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

  भाजीपाल्याला महागाईचा तडका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 16:48 IST

लॉकडाऊनमुळे आधीच्या तुलनेत भाजीपाल्यांची आवक कमी झाल्याने दर ४० ते ५० टक्क्यांनी वाढले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : तीन दिवसांच्या लॉकडाऊननंतर मंगळवारी बाजारपेठ खुली होताच भाजीबाजारात प्रचंड गर्दी उसळली होती. अनेक भाज्यांची कमी झालेली आवक अन् ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता भाजीपाल्याचे दर महागले होते. दरवाढीच्या या तडक्यामुळे ग्राहकांना मात्र भुर्दंड बसलाजिल्ह्यात २४ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाल्यावर घरपोच भाजीपाला ही संकल्पना चांगलीच लोकप्रिय झाली होती; मात्र तरीही बाजारातील गर्दी कमी होत नव्हती. त्यामुळे मनपाने भाजी बाजार बंद करून फिरत्या विक्रेत्यांना परवानगी दिली होती. त्यावेळीही भाजीपाल्याचे भाव अटोक्यात होते; मात्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर भाजीपाल्याच्या भावात आलेली तेजी आजतागायत कायम आहे. यंदा पावसानेही सुरुवातीपासूनच चांगली हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांसह भाजीपाल्याचीही लागवड केली. उत्पादन चांगले आल्याने मे आणि जून महिन्यात बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होत होती. त्यामुळे दर स्थिर होते. गेल्या तीन आठवड्यांपासून सततचे ढगाळ हवामान आणि वारंवार होणाºया पावसामुळे भाजीपाल्याची वाढ खुंटून पिवळा पडला. तसेच मोठ्या शहरांमधील लॉकडाऊनमुळे आधीच्या तुलनेत भाजीपाल्यांची आवक कमी झाल्याने दर ४० ते ५० टक्क्यांनी वाढले आहेत.

लॉकडाऊननंतर मंगळवारी सकाळी भाजी खरेदीसाठी गेलो असता अवघ्या तीन दिवसातच अनेक भाज्यांचे भाव वाढल्याचे दिसून आले. टोमॅटो, बटाटे, पालक, शेवगा यांचे भाव वाढलेले दिसले. टोमॅटोचे भाव वाढूनही क्वालिटी घसरल्याचे दिसून आहे. - रवींद्र भवाने, ग्राहक, उमरी अकोला

कोरोनामुळे बाहेरून येणाºया अनेक भाज्यांची आवक कमी झाली. अकोल्यातील लॉकडाऊनमुळे साठवणूक केलेला माल संपला. नवीन माल आला नाही. त्याचाही परिणाम भावावर झाला आहे.- रणजित सिकची, भाजी विक्रेता

टॅग्स :AkolaअकोलाMarketबाजार