शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

  भाजीपाल्याला महागाईचा तडका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 16:48 IST

लॉकडाऊनमुळे आधीच्या तुलनेत भाजीपाल्यांची आवक कमी झाल्याने दर ४० ते ५० टक्क्यांनी वाढले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : तीन दिवसांच्या लॉकडाऊननंतर मंगळवारी बाजारपेठ खुली होताच भाजीबाजारात प्रचंड गर्दी उसळली होती. अनेक भाज्यांची कमी झालेली आवक अन् ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता भाजीपाल्याचे दर महागले होते. दरवाढीच्या या तडक्यामुळे ग्राहकांना मात्र भुर्दंड बसलाजिल्ह्यात २४ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाल्यावर घरपोच भाजीपाला ही संकल्पना चांगलीच लोकप्रिय झाली होती; मात्र तरीही बाजारातील गर्दी कमी होत नव्हती. त्यामुळे मनपाने भाजी बाजार बंद करून फिरत्या विक्रेत्यांना परवानगी दिली होती. त्यावेळीही भाजीपाल्याचे भाव अटोक्यात होते; मात्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर भाजीपाल्याच्या भावात आलेली तेजी आजतागायत कायम आहे. यंदा पावसानेही सुरुवातीपासूनच चांगली हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांसह भाजीपाल्याचीही लागवड केली. उत्पादन चांगले आल्याने मे आणि जून महिन्यात बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होत होती. त्यामुळे दर स्थिर होते. गेल्या तीन आठवड्यांपासून सततचे ढगाळ हवामान आणि वारंवार होणाºया पावसामुळे भाजीपाल्याची वाढ खुंटून पिवळा पडला. तसेच मोठ्या शहरांमधील लॉकडाऊनमुळे आधीच्या तुलनेत भाजीपाल्यांची आवक कमी झाल्याने दर ४० ते ५० टक्क्यांनी वाढले आहेत.

लॉकडाऊननंतर मंगळवारी सकाळी भाजी खरेदीसाठी गेलो असता अवघ्या तीन दिवसातच अनेक भाज्यांचे भाव वाढल्याचे दिसून आले. टोमॅटो, बटाटे, पालक, शेवगा यांचे भाव वाढलेले दिसले. टोमॅटोचे भाव वाढूनही क्वालिटी घसरल्याचे दिसून आहे. - रवींद्र भवाने, ग्राहक, उमरी अकोला

कोरोनामुळे बाहेरून येणाºया अनेक भाज्यांची आवक कमी झाली. अकोल्यातील लॉकडाऊनमुळे साठवणूक केलेला माल संपला. नवीन माल आला नाही. त्याचाही परिणाम भावावर झाला आहे.- रणजित सिकची, भाजी विक्रेता

टॅग्स :AkolaअकोलाMarketबाजार