शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

भारतीय राखीव बटालियन कॅम्प तेल्हारा तालुक्यातच कायम ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 16:05 IST

ठाम आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री डॉक्टर रणजीत पाटील सर बटालियन कॅम्प बचाव कृती समितीला दिले.

-विजय शिंदे

अकोटः भारत राखीव बटालियन कॅम्प अकोट मतदारसंघातील तेल्हारा तालुक्यात तळेगाव वडनेर व मनात्री येथे कायम ठेवण्यात येणार असल्याचे ठाम आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री डॉक्टर रणजीत पाटील बटालियन कॅम्प बचाव कृती समितीला दिले. बटालियन कॅम्प हा तेल्हारा तालुक्यातच कायम राहावा या मागणी वर चर्चा करण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्यासह बटालियन बचाव कृती समितीचे शिष्टमंडळ १३ ऑगस्ट रोज मुंबईला दाखल झाले. मुंबई पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी बटालियन बचाव कृती समितीची मुख्यमंत्र्यांसोबत भेट घालून दिली. यावेळी झालेल्या बैठकीत डॉक्टर पाटील यांनी बटालियन कॅम्प बचाव समितीच्या निवेदनासोबत तेल्हारा तालुक्यातून हा कॅम्प स्थलांतरित केल्याने जनतेमध्ये असलेला असंतोष मुख्यमंत्र्यां समोर मांडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांच्या भावना ऐकून घेतल्या त्यानंतर डॉ. रणजीत पाटील यांच्याशी कृती समितीच्या समक्ष चर्चा करून भारतीय राजीव बटालियन कॅम्प हा तेल्हारा तालुक्यातील राहणार असल्याचे या बैठकीत सांगितले. तेल्हारा तालुक्यातील तळेगाव वडनेर व मनात्री येथे २०१६ मध्ये मंजूर करण्यात आला होता. या कॅम्प करीता आवश्यक सर्व नाहरकत प्रमाणपत्र घेण्यात आली होती.२०० एकर जागा सुद्धा उपलब्ध करण्यात आली होती. परंतु नुकत्याच मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत तालुक्यातील बटालियन अकोला तालुक्यातील शिसा उदेगाव, हिगंणा शिवारात जागा उपलब्ध करून मंजुरात देण्यात आली. या निर्णयामुळे अकोट मतदारसंघातील अकोट-तेल्हारा तालुक्यामध्ये चांगलाच रोष निर्माण झाला होता. अकोट-तेल्हारा तालुक्यातील सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी एकत्र येऊन बटालियन कँम्प तेल्हारा तालुक्यात कायम ठेवण्याची मागणी लावून धरली. बटालियन कॅम्प बचाव कृती समिती तयार करण्यात आली होती. बटालियन कॅम्प तेल्हारा तालुक्यातील इतरत्र हल्ल्यानंतरही अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी मौनव्रत धारण करून बटालियन कँम्पबाबत आपली भूमिका जनतेसमोर का माध्यमासमोर स्पष्ट केली नव्हती. तर पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनीसुद्धा याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे सांगितले होते. परंतु कृती समितीची मुख्यमंत्र्यांसोबत भेट करून देऊन हा कॅम्प तेल्हारा तालुक्यातच राहणार असे डॉ पाटील यांनी आश्वासित केले होते. पालकमंत्री डॉ रणजीत पाटील यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीला प्रदीप वानखडे , दिलीप बोचे, संजीवनी बिहाडे, रामाभाऊ फाटकर,एकनाथ ताथोड,डाँ विनीत हिंगणकर,भानुदास वाघोडे, चंदू दुबे, गजानन थोरात, देवानंद नागले, शंकर डिघोळे, विलास ताथोड, अंनत मनतकर, रमेश ताथोड, प्रताप शिंदे ,संतोष वाकोडे,विष्णु ताथोड,कैलास मनतकार, निशांत ताथोड, प्रशांत विखे,आशिष ताथोड ,अंनत ताथोड,विठ्ठल सरप, डॉ अशोक बिहाडे यांची उपस्थिती होती.

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हाराDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस