शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

भारतीय राखीव बटालियन कॅम्प तेल्हारा तालुक्यातच कायम ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 16:05 IST

ठाम आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री डॉक्टर रणजीत पाटील सर बटालियन कॅम्प बचाव कृती समितीला दिले.

-विजय शिंदे

अकोटः भारत राखीव बटालियन कॅम्प अकोट मतदारसंघातील तेल्हारा तालुक्यात तळेगाव वडनेर व मनात्री येथे कायम ठेवण्यात येणार असल्याचे ठाम आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री डॉक्टर रणजीत पाटील बटालियन कॅम्प बचाव कृती समितीला दिले. बटालियन कॅम्प हा तेल्हारा तालुक्यातच कायम राहावा या मागणी वर चर्चा करण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्यासह बटालियन बचाव कृती समितीचे शिष्टमंडळ १३ ऑगस्ट रोज मुंबईला दाखल झाले. मुंबई पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी बटालियन बचाव कृती समितीची मुख्यमंत्र्यांसोबत भेट घालून दिली. यावेळी झालेल्या बैठकीत डॉक्टर पाटील यांनी बटालियन कॅम्प बचाव समितीच्या निवेदनासोबत तेल्हारा तालुक्यातून हा कॅम्प स्थलांतरित केल्याने जनतेमध्ये असलेला असंतोष मुख्यमंत्र्यां समोर मांडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांच्या भावना ऐकून घेतल्या त्यानंतर डॉ. रणजीत पाटील यांच्याशी कृती समितीच्या समक्ष चर्चा करून भारतीय राजीव बटालियन कॅम्प हा तेल्हारा तालुक्यातील राहणार असल्याचे या बैठकीत सांगितले. तेल्हारा तालुक्यातील तळेगाव वडनेर व मनात्री येथे २०१६ मध्ये मंजूर करण्यात आला होता. या कॅम्प करीता आवश्यक सर्व नाहरकत प्रमाणपत्र घेण्यात आली होती.२०० एकर जागा सुद्धा उपलब्ध करण्यात आली होती. परंतु नुकत्याच मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत तालुक्यातील बटालियन अकोला तालुक्यातील शिसा उदेगाव, हिगंणा शिवारात जागा उपलब्ध करून मंजुरात देण्यात आली. या निर्णयामुळे अकोट मतदारसंघातील अकोट-तेल्हारा तालुक्यामध्ये चांगलाच रोष निर्माण झाला होता. अकोट-तेल्हारा तालुक्यातील सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी एकत्र येऊन बटालियन कँम्प तेल्हारा तालुक्यात कायम ठेवण्याची मागणी लावून धरली. बटालियन कॅम्प बचाव कृती समिती तयार करण्यात आली होती. बटालियन कॅम्प तेल्हारा तालुक्यातील इतरत्र हल्ल्यानंतरही अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी मौनव्रत धारण करून बटालियन कँम्पबाबत आपली भूमिका जनतेसमोर का माध्यमासमोर स्पष्ट केली नव्हती. तर पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनीसुद्धा याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे सांगितले होते. परंतु कृती समितीची मुख्यमंत्र्यांसोबत भेट करून देऊन हा कॅम्प तेल्हारा तालुक्यातच राहणार असे डॉ पाटील यांनी आश्वासित केले होते. पालकमंत्री डॉ रणजीत पाटील यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीला प्रदीप वानखडे , दिलीप बोचे, संजीवनी बिहाडे, रामाभाऊ फाटकर,एकनाथ ताथोड,डाँ विनीत हिंगणकर,भानुदास वाघोडे, चंदू दुबे, गजानन थोरात, देवानंद नागले, शंकर डिघोळे, विलास ताथोड, अंनत मनतकर, रमेश ताथोड, प्रताप शिंदे ,संतोष वाकोडे,विष्णु ताथोड,कैलास मनतकार, निशांत ताथोड, प्रशांत विखे,आशिष ताथोड ,अंनत ताथोड,विठ्ठल सरप, डॉ अशोक बिहाडे यांची उपस्थिती होती.

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हाराDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस