शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

विकासाच्या दृष्टीने स्वतंत्र विदर्भ राज्य गरजेचे - अँड. श्रीहरी अणे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 01:58 IST

अकोला : वेगळय़ा विदर्भाची मागणी ही अलीकडची नसून, अनेक वर्षांपासूनची आहे. निवडणुका आल्या, की वेगळय़ा विदर्भाची मागणी पुढे येते. नंतर मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते; परंतु विकासाच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती होणे गरजेचे आहे. विदर्भ वेगळा झाल्याशिवाय येथील विकासाला गती मिळू शकत नाही, असे मत राज्याचे माजी महाधिवक्ता व विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अँड. श्रीहरी अणे यांनी येथे व्यक्त केले. 

ठळक मुद्देअकोला बार असोसिएशन कार्यालयाला सदिच्छा भेट

लोकमत न्यूज नेवटर्कअकोला : वेगळय़ा विदर्भाची मागणी ही अलीकडची नसून, अनेक वर्षांपासूनची आहे. निवडणुका आल्या, की वेगळय़ा विदर्भाची मागणी पुढे येते. नंतर मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते; परंतु विकासाच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती होणे गरजेचे आहे. विदर्भ वेगळा झाल्याशिवाय येथील विकासाला गती मिळू शकत नाही, असे मत राज्याचे माजी महाधिवक्ता व विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अँड. श्रीहरी अणे यांनी येथे व्यक्त केले. अकोला बार असोसिएशनच्या कार्यालयाला त्यांनी गुरुवारी दुपारी  सदिच्छा भेट दिली. यावेळी बार असोसिएशनतर्फे आयोजित छोटेखानी कार्यक्रमात त्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विचारपीठावर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.झेड. ख्वाजा, ज्येष्ठ विधिज्ञ अँड. बी.के. गांधी, अकोला बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. सत्यनारायण जोशी, उपाध्यक्ष अँड. गजानन खाडे, जिल्हा सरकारी वकील अँड. राजेश्‍वर देशपांडे आदी होते.  यावेळी अँड. जोशी यांनी श्रीहरी अणे यांचे स्वागत केले. अँड. अणे यांनी, तेलंगणा, छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड यांची निर्मिती मोठय़ा राज्यांमधूनच झाली. मोठय़ा राज्यांमध्ये समाविष्ट असल्यामुळे हे छोटे भाग विकासापासून वंचित होते; परंतु या सर्व लहान राज्याची निर्मिती झाल्यानंतर, त्यांचा झपाट्याने विकास झाला. विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा झाल्याशिवाय आमची प्रगती होणार नाही. विदर्भावर सातत्याने अन्याय होत आला, असे अँड. श्रीहरी अणे म्हणाले. विदर्भ राज्यात मोठी खनिज संपत्ती, नैसर्गिक संपत्ती आहे; परंतु त्याचा वाटाही महाराष्ट्र विदर्भाला देत नाही. निवडणुका आल्या की राजकीय पक्ष वेगळय़ा विदर्भाची भूमिका मांडतात आणि निवडणुका संपल्या की वेगळय़ा विदर्भाचा मुद्दा विसरतात. विदर्भाचा विकास साधायचा असेल, तर वेगळय़ा राज्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणूनच आपण वेगळय़ा विदर्भ राज्य निर्मितीसाठी जनजागृती करण्यासाठी दौरा करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे संचालन बार असोसिएशनचे वरिष्ठ सचिव अँड. अनुप देशमुख यांनी केले. आभार सचिव मो. इलियास शेखानी यांनी मानले. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरShrihri Anneश्रीहरी अणे