शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

स्वतंत्र भारत पक्ष लढविणार लोकसभेच्या ४0 जागा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 12:40 IST

स्वतंत्र भारत पक्षाच्यावतीने लोकसभा निवडणुकीत ४0 ठिकाणी उमेदवार रिंगणात उतरविणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी स्पष्ट केले.

अकोला: शेतकरी संघटना ही राजकीय नाही; परंतु शेतकरी संघटनेच्या विचारधारेने काम करणाऱ्या स्वतंत्र भारत पक्षातर्फे लोकसभा निवडणुकीत ४0 उमेदवार उभे करू आणि काही ठिकाणी स्वतंत्रवादी उमेदवारांना समर्थन देऊ, अशी घोषणा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट व स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी मंगळवारी अकोल्यात आयोजीत पत्रपरिषदेत केली.शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्षाची राज्यस्तरीय बैठक मंगळवारी अकोल्यात पार पडली. देशात जातीयवादी, धार्मिकतेचे राजकारण सुरू आहे. शेतकऱ्यांची हेळसांड होत असून, शेतमालाला जाणीवपूर्वक भाव देण्यात येत नाही. केंद्र व राज्य शासनाविषयी शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड रोष आहे. त्यामुळे भाजप व काँग्रेसला सक्षम पर्याय म्हणून स्वतंत्र भारत पक्षाच्यावतीने लोकसभा निवडणुकीत ४0 ठिकाणी उमेदवार रिंगणात उतरविणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी स्पष्ट केले. ज्या ठिकाणी स्वतंत्रवादी विचारांचे उमेदवार उभे असतील तर स्वतंत्र भारत पक्ष त्यांना समर्थन देईल. असे ते म्हणाले.तर आमची वाटचाल ही अर्थवादावर आहे. त्यामुळे जनतेला एक सक्षम पर्याय देण्याची आमची भूमिका आहे. असे माजी आमदार वामनराव चटप यांनी सांगितले. एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी, आम्ही काही पक्षांसोबत आघाडी करण्याची भूमिका मांडली. वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा व बैठकही झाली; परंतु बैठकीत काही तोडगा निघू शकला नाही. विदर्भ निर्माण महामंच आमच्यासोबत आहे. त्यांनी काही उमेदवार दिले आहेत. त्या जागा सोडून आम्ही उमेदवार उभे करू, असेही वामनराव चटप यांनी सांगितले. पत्रपरिषदेला माजी आमदार सरोजताई काशिकर, शेतकरी संघटनेचे प्रवक्ते ललित बहाळे, शैलजा देशपांडे, सीमा नरोडे, सतीश दाणी, डॉ. नीलेश पाटील, पश्चिम विदर्भ प्रमुख धनंजय मिश्रा, जिल्हा प्रमुख अविनाश नाकट, ज्योत्स्ना बहाळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)म्हणून चांगला नेता निवडून येत नाही!राजा मतपेटीतून तयार होतो; परंतु जनता योग्य उमेदवाराला निवडून देत नाही. शेतकरी संघटना, स्वतंंत्र भारत पक्षाकडे अनेक चांगले व योग्य उमेदवार आहेत; परंतु आम्ही मतदारांना पैसा, दारू देऊ शकत नाही. त्यामुळे अनेक चांगले उमेदवार निवडून येत नाहीत, अशी खंतही अनिल घनवट यांनी व्यक्त केली.

जनतेनेच चौकीदार व्हावेदेशाचा चौकीदार ठरविण्याऐवजी, सक्षम व योग्य उमेदवार निवडून द्यावे आणि जनतेनेच चौकीदार व्हावे. भाजप तोडफोडीचे राजकारण करीत आहे. घराणेशाहीला भाजपच प्रोत्साहन देत असून, असे गलिच्छ राजकारण जनतेने ओळखावे. पैसा कमाविण्यासाठी नेते पक्षांतर करतात. नीतीमत्ता ढासळली असून, जनतेने मतपेटीतून अशांना रस्ता दाखवावा, असेही प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी सांगितले.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAkolaअकोला