शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

स्वतंत्र भारत पक्ष लढविणार लोकसभेच्या ४0 जागा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 12:40 IST

स्वतंत्र भारत पक्षाच्यावतीने लोकसभा निवडणुकीत ४0 ठिकाणी उमेदवार रिंगणात उतरविणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी स्पष्ट केले.

अकोला: शेतकरी संघटना ही राजकीय नाही; परंतु शेतकरी संघटनेच्या विचारधारेने काम करणाऱ्या स्वतंत्र भारत पक्षातर्फे लोकसभा निवडणुकीत ४0 उमेदवार उभे करू आणि काही ठिकाणी स्वतंत्रवादी उमेदवारांना समर्थन देऊ, अशी घोषणा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट व स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी मंगळवारी अकोल्यात आयोजीत पत्रपरिषदेत केली.शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्षाची राज्यस्तरीय बैठक मंगळवारी अकोल्यात पार पडली. देशात जातीयवादी, धार्मिकतेचे राजकारण सुरू आहे. शेतकऱ्यांची हेळसांड होत असून, शेतमालाला जाणीवपूर्वक भाव देण्यात येत नाही. केंद्र व राज्य शासनाविषयी शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड रोष आहे. त्यामुळे भाजप व काँग्रेसला सक्षम पर्याय म्हणून स्वतंत्र भारत पक्षाच्यावतीने लोकसभा निवडणुकीत ४0 ठिकाणी उमेदवार रिंगणात उतरविणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी स्पष्ट केले. ज्या ठिकाणी स्वतंत्रवादी विचारांचे उमेदवार उभे असतील तर स्वतंत्र भारत पक्ष त्यांना समर्थन देईल. असे ते म्हणाले.तर आमची वाटचाल ही अर्थवादावर आहे. त्यामुळे जनतेला एक सक्षम पर्याय देण्याची आमची भूमिका आहे. असे माजी आमदार वामनराव चटप यांनी सांगितले. एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी, आम्ही काही पक्षांसोबत आघाडी करण्याची भूमिका मांडली. वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा व बैठकही झाली; परंतु बैठकीत काही तोडगा निघू शकला नाही. विदर्भ निर्माण महामंच आमच्यासोबत आहे. त्यांनी काही उमेदवार दिले आहेत. त्या जागा सोडून आम्ही उमेदवार उभे करू, असेही वामनराव चटप यांनी सांगितले. पत्रपरिषदेला माजी आमदार सरोजताई काशिकर, शेतकरी संघटनेचे प्रवक्ते ललित बहाळे, शैलजा देशपांडे, सीमा नरोडे, सतीश दाणी, डॉ. नीलेश पाटील, पश्चिम विदर्भ प्रमुख धनंजय मिश्रा, जिल्हा प्रमुख अविनाश नाकट, ज्योत्स्ना बहाळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)म्हणून चांगला नेता निवडून येत नाही!राजा मतपेटीतून तयार होतो; परंतु जनता योग्य उमेदवाराला निवडून देत नाही. शेतकरी संघटना, स्वतंंत्र भारत पक्षाकडे अनेक चांगले व योग्य उमेदवार आहेत; परंतु आम्ही मतदारांना पैसा, दारू देऊ शकत नाही. त्यामुळे अनेक चांगले उमेदवार निवडून येत नाहीत, अशी खंतही अनिल घनवट यांनी व्यक्त केली.

जनतेनेच चौकीदार व्हावेदेशाचा चौकीदार ठरविण्याऐवजी, सक्षम व योग्य उमेदवार निवडून द्यावे आणि जनतेनेच चौकीदार व्हावे. भाजप तोडफोडीचे राजकारण करीत आहे. घराणेशाहीला भाजपच प्रोत्साहन देत असून, असे गलिच्छ राजकारण जनतेने ओळखावे. पैसा कमाविण्यासाठी नेते पक्षांतर करतात. नीतीमत्ता ढासळली असून, जनतेने मतपेटीतून अशांना रस्ता दाखवावा, असेही प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी सांगितले.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAkolaअकोला