शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बेफिकिरी वाढली...कोरोनाही वाढला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 12:04 IST

रस्ते, बाजारपेठा, बसस्थानकांवर नागरिकांची मोठी गर्दी होत असून, कोविड प्रतिबंधात्मक नियमांना बगल दिल्या जात असल्याने संपर्कातून संसर्ग वाढत आहे.

अकोला : ‘अनलॉक’च्या या प्रक्रियेत कोरोनाही ‘अनलॉक’ झाला असून, अकोलेकरांंच्या बेफिकिरीमुळे या अत्यंत घातक विषाणूचा संसर्ग होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रस्ते, बाजारपेठा, बसस्थानकांवर नागरिकांची मोठी गर्दी होत असून, कोविड प्रतिबंधात्मक नियमांना बगल दिल्या जात असल्याने संपर्कातून संसर्ग वाढत आहे.कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या नियमांमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता आणली जात असून, हळूहळू अनेक क्षेत्र खुली होत आहेत. ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत अनलॉक-४ सुरू झाला असून, यामध्ये अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. आतापर्यंत बंद असलेली एसटीची प्रवासी वाहतूक सेवाही बहाल करण्यात आली असून, आंतरजिल्हा प्रवासासाठी आवश्यक असलेली ई-पासची अटही रद्द करण्यात आली आहे. या विविध सवलती दिल्या जात असताना नागरिकांनी मास्क परिधान करणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे यासारख्या कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे; परंतु अनलॉकच्या प्रक्रियेत नागरिक अधिक बेफिकीर झाल्याचे चित्र अकोला शहरासह ग्रामीण भागात दिसून येत आहे. यामुळे आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सहा दिवसांत १३ मृत्यू व ५७६ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडाही हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. वाढत्या रुग्णांचा भार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयावर येत आहे. या ठिकाणी अपुºया मनुष्यबळामुळे रुग्णसेवा प्रभावित होत आहे.ना मास्क...ना फिजिकल डिस्टन्सिंगएकीकडे अकोल्यात कोरोना थैमान घालत आहे, तर दुसरीकडे नागरिकांची बेफिकिरी वाढली आहे. शहरातील बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी होत असून, फिजिकल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडत आहे. मास्क वापरण्याकडेही नागरिकांचे दुर्लक्ष होत आहे. बसस्थानक, दुकानांमध्ये अनेक जण बिनधास्तपणे विनामास्क वावरत असल्याचे दिसून येत आहे. या बेफिकिरीमुळे कोरोना संसर्गाचा वेग वाढत आहे.कारवाईचा धाकही संपला!कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर मनपा व जिल्हा प्रशासनाने काही दिवसांपूर्वी मास्कचा वापर न करणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणे व रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला होता. यासाठी पथकही गठित करण्यात आले होते. नियमांचे उल्लंघन करणाºयांना मोठा दंड आकारण्यात येत होता. आता मात्र ही कारवाईच गुंडाळण्यात आली आहे. कारवाईचा धाकच नसल्याने नागरिकांकडून नियमांची पायमल्ली होत आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला