शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
4
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
5
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
6
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
7
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
8
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
9
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
10
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
11
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
12
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
13
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
14
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
15
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
16
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
17
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
18
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
19
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
20
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
Daily Top 2Weekly Top 5

लहान विद्यापीठांमुळे गुणवत्तेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 10:28 IST

अमरावती विद्यापीठांतर्गत वाढती महाविद्यालयांची संख्या लक्षात घेता शैक्षणिक गुणवत्तेसाठी या विद्यापीठाचे विभाजन करण्याची गरज आहे.

- राजेश शेगोकार लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शैक्षणिक गुणवत्तावाढीचा निकष डोळ्यासमोर ठेवून केंद्र शासनाने १९९२ मध्ये प्रा.यशपाल कपूर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीने दिलेल्या अहवालात लहान विद्यापीठांमुळे शैक्षणिक गुणवत्ता वृद्धींगत होते, अशी शिफारस केली होती. या शिफारशीचा विचार केला तर अमरावती विद्यापीठांतर्गत वाढती महाविद्यालयांची संख्या लक्षात घेता शैक्षणिक गुणवत्तेसाठी या विद्यापीठाचे विभाजन करण्याची गरज आहे.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात सद्यस्थितीत ३८३ महाविद्यालये असून, यामध्ये अमरावती १२०, यवतमाळ ८२, अकोला ६१, वाशिम ३५, बुलडाण्याच्या ८५ महाविद्यालयांचा समावेश आहे. विद्यापीठातील एकूण महाविद्यालयांच्या तुलनेत पश्चिम वºहाडात सर्वाधिक १८१ महाविद्यालये असल्याने विद्यापीठाला या महाविद्यालयांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे शक्य होताना दिसत नाही. दुसरीकडे वाढता प्रवास खर्च लक्षात घेता पश्चिम वºहाडातील विद्यार्थ्यांना विद्यापीठात धाव घेणे आर्थिकदृष्या परवडत नाही. त्यामुळे लहान विद्यापीठ ही संकल्पना अतिशय उपयुक्त ठरू शकते. प्रा.यशपाल समितीने केंद्र शासनाला दिलेल्या अहवालात यासंदर्भात स्पष्ट शिफारस केली असून, विद्यापीठांची व्याप्ती लहान असल्यास गुणवत्तेत सातत्य राखून सुधारणा करता येते, असे नमूद केले आहे. राष्टÑीय उच्चस्तर शिक्षा अभियान अर्थात ‘रूषा’ या संस्थेनेही लहान विद्यापीठांची पाठराखण केली आहे. विद्यापीठांशी संलग्नीत महाविद्यालयांची संख्या वाढली तर गुणवत्तेमध्ये घसरण होते, असा इशारा या संस्थेने दिला आहे. अमरावती विद्यापीठाची व्याप्ती व वाढता पसारा लक्षात घेता या विद्यापीठाचे विभाजन करून पश्चिम वºहाडासाठी स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करणे गरजेचे आहे.केवळ एका जिल्ह्यासाठी सोलापुरात विद्यापीठपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे केवळ एका जिल्ह्यासाठी तयार करण्यात आलेले विद्यापीठ आहे. केवळ राजकीय इच्छाशक्तीमुळे हे विद्यापीठ होऊ शकले. हीच इच्छाशक्ति गडचिरोली आणि चंद्रपूर या अवघ्या दोन जिल्ह्यांच्या गोंडवाना विद्यापीठासाठीसुद्धा दृष्टीस पडली. पश्चिम वºहाडात दिग्गज राजकारणी असतानाही दोन दशकांपासून विद्यापीठाचे उपकेंद्रही आणता आले नाही, त्यामुळे राजकीय नेतृत्वाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहेच, सोबतच आता उस्मानाबादच्या निमित्ताने स्वतंत्र विद्यापीठाचीच मागणी रेटून धरण्याचीही संधी आहे.

टॅग्स :Akolaअकोलाuniversityविद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्र