शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

लहान विद्यापीठांमुळे गुणवत्तेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 10:28 IST

अमरावती विद्यापीठांतर्गत वाढती महाविद्यालयांची संख्या लक्षात घेता शैक्षणिक गुणवत्तेसाठी या विद्यापीठाचे विभाजन करण्याची गरज आहे.

- राजेश शेगोकार लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शैक्षणिक गुणवत्तावाढीचा निकष डोळ्यासमोर ठेवून केंद्र शासनाने १९९२ मध्ये प्रा.यशपाल कपूर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीने दिलेल्या अहवालात लहान विद्यापीठांमुळे शैक्षणिक गुणवत्ता वृद्धींगत होते, अशी शिफारस केली होती. या शिफारशीचा विचार केला तर अमरावती विद्यापीठांतर्गत वाढती महाविद्यालयांची संख्या लक्षात घेता शैक्षणिक गुणवत्तेसाठी या विद्यापीठाचे विभाजन करण्याची गरज आहे.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात सद्यस्थितीत ३८३ महाविद्यालये असून, यामध्ये अमरावती १२०, यवतमाळ ८२, अकोला ६१, वाशिम ३५, बुलडाण्याच्या ८५ महाविद्यालयांचा समावेश आहे. विद्यापीठातील एकूण महाविद्यालयांच्या तुलनेत पश्चिम वºहाडात सर्वाधिक १८१ महाविद्यालये असल्याने विद्यापीठाला या महाविद्यालयांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे शक्य होताना दिसत नाही. दुसरीकडे वाढता प्रवास खर्च लक्षात घेता पश्चिम वºहाडातील विद्यार्थ्यांना विद्यापीठात धाव घेणे आर्थिकदृष्या परवडत नाही. त्यामुळे लहान विद्यापीठ ही संकल्पना अतिशय उपयुक्त ठरू शकते. प्रा.यशपाल समितीने केंद्र शासनाला दिलेल्या अहवालात यासंदर्भात स्पष्ट शिफारस केली असून, विद्यापीठांची व्याप्ती लहान असल्यास गुणवत्तेत सातत्य राखून सुधारणा करता येते, असे नमूद केले आहे. राष्टÑीय उच्चस्तर शिक्षा अभियान अर्थात ‘रूषा’ या संस्थेनेही लहान विद्यापीठांची पाठराखण केली आहे. विद्यापीठांशी संलग्नीत महाविद्यालयांची संख्या वाढली तर गुणवत्तेमध्ये घसरण होते, असा इशारा या संस्थेने दिला आहे. अमरावती विद्यापीठाची व्याप्ती व वाढता पसारा लक्षात घेता या विद्यापीठाचे विभाजन करून पश्चिम वºहाडासाठी स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करणे गरजेचे आहे.केवळ एका जिल्ह्यासाठी सोलापुरात विद्यापीठपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे केवळ एका जिल्ह्यासाठी तयार करण्यात आलेले विद्यापीठ आहे. केवळ राजकीय इच्छाशक्तीमुळे हे विद्यापीठ होऊ शकले. हीच इच्छाशक्ति गडचिरोली आणि चंद्रपूर या अवघ्या दोन जिल्ह्यांच्या गोंडवाना विद्यापीठासाठीसुद्धा दृष्टीस पडली. पश्चिम वºहाडात दिग्गज राजकारणी असतानाही दोन दशकांपासून विद्यापीठाचे उपकेंद्रही आणता आले नाही, त्यामुळे राजकीय नेतृत्वाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहेच, सोबतच आता उस्मानाबादच्या निमित्ताने स्वतंत्र विद्यापीठाचीच मागणी रेटून धरण्याचीही संधी आहे.

टॅग्स :Akolaअकोलाuniversityविद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्र