शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

रुग्णसंख्येत वाढ, एसटीची प्रवासीसंख्या जैसे थे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:22 IST

चार ते पाच हजार प्रवाशांचा अपवाद वगळता इतर प्रवासी वाहतूक पूर्ववत सुरू असल्याचे चित्र आहे. एसटीच्या मर्यादित फेऱ्याच रद्द ...

चार ते पाच हजार प्रवाशांचा अपवाद वगळता इतर प्रवासी वाहतूक पूर्ववत सुरू असल्याचे चित्र आहे. एसटीच्या मर्यादित फेऱ्याच रद्द करण्यात आल्याने मागील लॉकडाऊनसारखा यावेळी एसटी महामंडळाला सध्यातरी आर्थिक फटका बसलेला नाही. मात्र, कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, प्रवाशांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याची गरज आहे.

तोंडाला मास्क लावण्यासह सॅनिटायझरच्या वापराकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे. एसटी महामंडळानेही शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याकडे लक्ष पुरविणे गरजेचे आहे.

आंतर जिल्ह्यातही प्रवासी वाहतूक

जिल्ह्यातील सातही आगारांतून जिल्हाबाह्य प्रवासी वाहतूक सुरू आहे. लांब पल्ल्याच्याही बसफेऱ्या धावतात. यामध्ये पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, यवतमाळ, नाशिक, औरंगाबाद आदी बसफेऱ्यांचा समावेश आहे. कोरोनाचा संसर्ग वाढलेल्या ठिकाणाहूनही प्रवासी प्रवास करत आहेत. यामुळे या प्रवासादरम्यान कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ना मास्क, ना फिजिकल डिस्टन्सिंग

कोरोनानंतर काही प्रमाणात बसफेऱ्या कमी केल्या आहेत. प्रवासी वाढल्याने बस भरून धावत आहेत. मात्र, बहुतांश प्रवासी मास्कचा वापर करताना दिसून येत नाहीत, तसेच बसमध्ये गर्दी राहत असल्याने एका सीटवर कधी दोन, तर कधी तीन जण बसून प्रवास करतात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता आहे.

ग्रामीण, तसेच विद्यार्थ्यांसाठीच्या बसफेऱ्या बंदच

‘गाव तेथे एसटी’ अशी राज्य परिवहन महामंडळाने मोहीम राबविली. या मोहिमेंतर्गत जेथे रस्ता असेल, तेथे एसटी धावत होती. मात्र, कोरोनामुळे गत २३ मार्चपासून बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. त्यानंतर, काही प्रमाणात बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या, परंतु अद्यापही ग्रामीण भागातील अनेक बसफेऱ्या बंद आहेत. यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना अत्यावश्यक कामासाठी प्रवास करताना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.