शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

वीज जोडण्यांसाठी अर्जांचा रतीब वाढताच!

By admin | Updated: November 17, 2016 19:24 IST

कृषी पंपांसाठी वीज जोडण्या देण्याला पूर्वीच्या तुलनेत गती आली असली, तरी जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात वीज जोडण्यांसाठी अर्ज येत असल्यामुळे

ऑनलाइन लोकमतअकोला, दि. 17  : कृषी पंपांसाठी वीज जोडण्या देण्याला पूर्वीच्या तुलनेत गती आली असली, तरी जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात वीज जोडण्यांसाठी अर्ज येत असल्यामुळे, महावितरणकडे तब्बल आठ हजारांवर अर्ज प्रलंबित आहेत.

महावितरणकडून जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी वीज जोडण्या देण्यात येतात. जिल्ह्यात आजमितीस ५५ हजारांपेक्षाही अधिक कृषीपंप धारक आहेत. जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून वीज जोडण्यांसाठी अर्ज केले जातात. गत वर्षभरात मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होत आहेत. गत वर्षी महावितरणकडून जिल्ह्यातील ५ हजारापेक्षां अधिक शेतकऱ्यांना कृषीपंपांसाठी वीज जोडण्या देण्यात आल्या.

धडक सिंचन योजनेअंतर्गत मंजुर झालेल्या विहिरींसाठी तातडीने वीज जोडण्या देण्यात आल्या. आता रब्बी हंगामास सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीजेचे गरज भासत आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने वीज जोडण्यांसाठी अर्ज येत आहेत. आज रोजी महावितरणकडे ८५०० अर्ज प्रलंबित आहेत. तेल्हारा, आकोट, बार्शीटाकळी, पातुर या तालुक्यांमध्ये सिंचनाचे क्षेत्र अधिक असल्यामुळे या तालुक्यांमधून वीज जोडण्यांसाठी अर्ज येत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस प्रलंबित अर्जांची संख्या वाढतच आहे.

परिमंडळात दिल्या २५ हजार जोडण्यागत वर्षभरात शेतकऱ्यांना कृषीपंपांसाठी वीज जोडण्या देण्याला गती आली आहे. महावितरणच्या अकोला परिमंडळात येत असलेल्या अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात गत वर्षी तब्बल २५ हजार वीज जोडण्या देण्यात आल्या.