शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

पीक कर्जाच्या पुनर्रचनेसाठी मुदत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 15:27 IST

पीक कर्जाच्या पुनर्रचनेसाठी शासनाने ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जाच्या पुनर्रचनेसाठी शासनाने ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ३१ जुलै २०१९ पर्यंत पुनर्घटनेसाठी पात्र असलेल्या २५ हजार ४९२ लाभार्थींपैकी जिल्ह्यातील ८ हजार २७४ शेतकºयांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन झालेले आहे. यासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेमार्फत १५ जुलै ते ३० जुलैपर्यंत पीक कर्ज वाटप पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संपूर्ण जिल्ह्यात १४१ पीक कर्ज वाटप मेळावे घेण्यात आले होते. यात काही कारणामुळे अनेक शेतकºयांना इच्छा असूनही पीक कर्ज पुनर्गठन नाच्या योजनेचा लाभ मुदतीत घेता येऊ शकला नाही.दरम्यान, आजमितीस अकोला जिल्ह्यांमध्ये १७,२१८ शेतक ºयांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन या वाढीव मुदतीत करता येऊ शकेल. यासाठी शेतकºयांनी लेखी संमती संबंधित बँकेला देणे गरजेचे आहे. सर्वात जास्त स्टेट बँक आॅफ इंडियाकडे ८ हजार लाभार्थी आहेत, तसेच सेंट्रल बँक आॅफ इंडिया यांच्यामार्फत ३ हजार शेतकºयांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन होऊ शकते तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अकोला यांच्यामार्फत २ हजार ९५५ तर बँक आॅफ महाराष्ट्र मार्फत १,२८४ शेतकºयांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन होऊ शकते. आतापर्यंत पीक कर्जाच्या पुनर्गठनामध्ये पंजाब नॅशनल बँक, ओरिएन्टल बँक आॅफ कॉमर्स व युनियन बँक आॅफ इंडिया यांनी उल्लेखनीय काम केल्याचे दिसून येत आहे.

मागील वर्षांमध्ये पीक कर्ज घेतलेल्या व काही कारणास्तव सदर पीक कर्जाची परतफेड करू न शकलेल्या या शेतक ºयांना जुन्या कर्जाचे पुनर्गठन केल्यास नवीन कर्ज वाटपसुद्धा मिळू शकते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकºयांनी पीक कर्ज पुनर्गठन योजनेच्या या वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा.- डॉ. प्रवीण लोखंडे,जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अकोला.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरीAkolaअकोला