शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

१०० पाणंद रस्त्यांची कामे अपूर्ण; आमदाराने दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यांवर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2022 10:23 IST

MLA Prakash Bharsakale : आमदार प्रकाश भारसाकळे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहाच्या पायऱ्यांवर धरणे दिले.

 अकोला: पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत जिल्ह्यातील अकोट व तेल्हारा तालुक्यात खोदून ठेवलेल्या १०० पाणंद रस्त्यांची कामे अद्याप पूर्ण करण्यात आली नाहीत. त्यामुळे पावसाळा तोंडावर असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी शेतात जाणार कसे आणि पेरणी करणार कसे, असा सवाल उपस्थित करीत पाणंद रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या मागणीसाठी अकोट मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहाच्या पायऱ्यांवर धरणे दिले.

पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेत जिल्ह्यातील अकोट व तेल्हारा या दोन तालुक्यात १०० पाणंद रस्ते कामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्यासाठी संबंधित रस्ते खोदण्यात आले; मात्र खोदून ठेवण्यात आलेल्या या रस्त्यांवर अद्याप मुरुम टाकण्यात आला नाही किंवा खडीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे कठीण झाले आहे. पावसाळा तोंडावर आला असला तरी, पाणंद रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली नसल्याने, पावसाळ्यात शेतकरी शेतात जाणार कसे आणि पेरणी करणार कसे, अशी विचारणा करीत संबंधित पाणंद रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या मागणीसाठी आमदार प्रकाश भारसाकळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहाच्या पायऱ्यांवर धरणे दिल्याचे माहिती कळताच भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, माजी महापाैर विजय अग्रवाल तेजराव पाटील थोरात, प्रशांत कोकाटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून भारसाकळे यांच्या आंदाेलनाला पाठिंबा देत प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला.

 जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनावर आमदारांनी घेतला आक्षेप !

अकोट व तेल्हारा तालुक्यातील खोदून ठेवलेल्या रस्ते कामांच्या मुद्यावर जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी शुक्रवारी बैठक घेतली. त्यामध्ये संबंधित रस्त्यांची कामे पावसाळा संपल्यानंतर सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यावर आ. भारसाकळे यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यानंतर संबंधित रस्त्यांची कामे सुरू करण्याचे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी सांगितले; मात्र कामे पूर्ण करण्याचे कोणतेही नियोजन नसल्याने आ. भारसाकळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहाच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलन सुरू केले. येत्या पंधरा दिवसांत पाणंद रस्त्यांची कामे पूर्ण करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

 

टॅग्स :Prakash Bharsakaleप्रकाश भारसाकळेAkolaअकोला