शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

मालमत्ता कर वसुलीतून ४८ कोटींचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:54 IST

सुधारित दरवाढ केल्यानंतर सर्वसाधारण सभेने वाढीव रकमेतून ५0 रुपये कमी केल्यामुळे कर स्वरूपातील उत्पन्नाची गाडी ४८ कोटींवर येऊन ठेपली असल्याची माहिती महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 

ठळक मुद्देमनपा आयुक्तांची पत्रकार परिषदेत माहितीयापुढे ऑनलाइन भरणा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नवीन प्रभाग वगळता शहरातील मालमत्तांच्या पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नागरिकांचे आक्षेप निकाली काढण्यात आले. पुनर्मूल्यांकनामुळे ३१ हजार मालमत्तांवर कधीही कर लागू नसल्याचे समोर आले. सुधारित दरवाढ केल्यानंतर सर्वसाधारण सभेने वाढीव रकमेतून ५0 रुपये कमी केल्यामुळे कर स्वरूपातील उत्पन्नाची गाडी ४८ कोटींवर येऊन ठेपली असल्याची माहिती महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मनपाच्या उत्पन्न वाढीसाठी मालमत्तांच्या पुनर्मूल्यांकनाची गरज असल्याचे समोर आले. त्यासाठी ‘जीआयएस’ प्रणालीचा वापर केल्यामुळे यापूर्वी कधीही कर लागू नसलेल्या तब्बल ३१ हजार मालमत्ता उघडकीस आल्या. मनपाला मालमत्ता करापासून अवघे १८ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होत असे. त्यामध्ये भरीव वाढ झाल्याचे मनपा आयुक्त अजय लहाने यांनी सांगितले. नवीन प्रभाग वगळून शहरात १ लाख ५ हजार १६७ मालमत्तांची नोंदणी झाली आहे. सुधारित दरानुसार ७१ कोटी ५0 लाख रुपये मिळतील, असा प्रशासनाचा अंदाज होता. सर्वसाधारण सभेने वाढीव ९0 रुपये दर रकमेतून थेट ५0 रुपये कमी केल्यामुळे उत्पन्नाचा आलेख घसरला. सर्वसाधारण सभेच्या निर्णयामुळे उत्पन्नाचा आकडा ५९ कोटींवर आला असून, शिक्षण उपकर व रोहयो करापोटी शासनाकडे ११ कोटी रुपये जमा करावे लागतील. यामुळे मनपाच्या तिजोरीत ४८ कोटींची भर पडणार आहे. नवीन प्रभागात मालमत्तांच्या पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निश्‍चितच मनपाच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार असल्याचा विश्‍वास आयुक्त लहाने यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला उपायुक्त समाधान सोळंके, सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले उपस्थित होत्या. 

यापुढे ऑनलाइन भरणामालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी पावती पुस्तकाचा वापर बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यानंतर ऑनलाइन प्रणालीद्वारे तसेच पॉस मशीनद्वारे थेट घरबसल्या कराचा भरणा करता येईल. शहरातील कोणत्याही मालमत्ताधारकाची माहिती अकोलेकरांना संगणकावर उपलब्ध असेल. यामुळे लपवाछपवीला आपसूकच आळा बसणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. 

स्वच्छतेसाठी पुन्हा अभियानशहर हगणदरीमुक्त झाल्यानंतर राज्य शासनाच्या चमूने तपासणी केली होती. जानेवारी महिन्यात स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवले जाणार असून, या कालावधीत केंद्र शासनाद्वारे तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी उपायुक्त समाधान सोळंके यांनी केले.