शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
3
सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
4
आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा
5
दोन वर्षांत १४ लाख पाकिस्तान्यांनी देश सोडला! कारण काय?
6
१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा
7
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
8
दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
9
नवे वर्ष २०२६: आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या वर्षात करा 'हे' ५ उपाय!
10
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
11
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
12
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
13
शिंदेसेनेच्या २, उद्धवसेना, काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द, ७१९ उमेदवार रिंगणात
14
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
15
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
16
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
17
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
18
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
19
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
20
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासक्रमात कवितेचा समावेश; लेखकाला वर्षभरानंतर कळली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 12:44 IST

अकोल्यातील एका कवीने ‘हायकू विद्ये’नुसार लिहिलेली कविता इयत्ता दहावीच्या हिंदी विषयाच्या लोकवाणी पुस्तकामध्ये परस्पर समाविष्ट केल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

अकोला: अभ्याक्रमामध्ये कथा, कवितांचा समावेश करण्यापूर्वी राज्य अभ्यास मंडळाने संबंधित लेखक, कवीला सूचित करून त्यांची परवानगी घेऊनच कथा, कविता प्रकाशित करायला हवी; परंतु राज्य अभ्यास मंडळाने अकोल्यातील एका कवीने ‘हायकू विद्ये’नुसार लिहिलेली कविता इयत्ता दहावीच्या हिंदी विषयाच्या लोकवाणी पुस्तकामध्ये परस्पर समाविष्ट केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, वर्षभरानंतर अकोल्यातील कवीला त्यांची कविता दहावीच्या हिंदी विषयाच्या पुस्तकामध्ये समाविष्ट केल्याचे समजले.अकोल्यातील राम नगरात राहणारे हिंदी कवी अभिषेक ताराचंद जैन यांनी काही वर्षांपूर्वी हिंदीची अत्याधुनिक विद्या हायकूचा वापर करीत,‘ ऐसा भी होता है...’, ही कविता लिहिली. ती लोकप्रिय झाली. त्यामुळे सोशल मीडियावरही ती चांगलीच व्हायरल झाली. त्यानंतर एका पत्रिकेने ही कविता प्रसिद्ध केली. त्यांच्या काही ध्यानी मनी नसताना, चार दिवसांपूर्वी त्यांना ही कविता इयत्ता दहावीच्या हिंदी विषयाच्या लोकवाणी पुस्तकामध्ये त्यांच्या कवितेचा समावेश केला असल्याचे समजले. पुस्तकातील पान क्रमांक २२ वर त्यांची कविता प्रसिद्ध झाल्याचे पाहून, त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. राज्य अभ्यास मंडळाला कोणताही लेख, कविता प्रसिद्ध करण्यापूर्वी किंवा अभ्यासक्रमात समावेश करण्यापूर्वी संबधित लेखक, कवीची परवानगी घेणे आवश्यक आहे; परंतु राज्य मंडळाने कवी अभिषेक जैन यांची कोणतीही परवानगी न घेता, त्यांच्या परिचयासह परस्पर ही कविता हिंदीच्या लोकवाणी पुस्तकामध्ये प्रसिद्ध केली. विशेष म्हणजे, अभिषेक जैन हे कोठे राहणारे आहेत, त्यांचा परिचय काय आहे, हे जाणून न घेता, परस्पर त्यांची कविता प्रसिद्ध करून राज्य अभ्यास मंडळाने उतावळेपणा केला आहे. राज्य अभ्यास मंडळाच्या या प्रकारामुळे कविवर्य अभिषेक जैन हे खऱ्या सन्मानापासून, मानधनापासून वंचित राहिले आहेत. अभ्यास मंडळाने त्यांची माहिती काढून आणि त्यांना कविता समाविष्ट करीत असल्याची माहिती देऊन त्यांची कविता प्रसिद्ध केली असती तर अकोल्यातील या कवीचा खºया अर्थाने सन्मान झाला असता.

जैन यांनी कशी अवगत केली ‘हायकू विद्या’!अभिषेक जैन खासगी नोकरी करतात. मूळचे ते झारखंड राज्यातील गिरीडीह येथील राहणारे आहेत. १२ वर्षांपूर्वी ते अकोल्यात आले. त्यांना कवी लेखनाचा छंद आहे. फेसबुकवर त्यांना हायकू विद्येबाबत वाचायला मिळाले. त्यांची रुची निर्माण झाल्यामुळे त्यांनी हायकू विद्या अवगत केली.

‘हायकू विद्ये’ला प्रथमच हिंदीत स्थानहायकू ही जपानी विद्या आहे. तिचा हिंदी भाषेतही आता वापर होत आहे. राज्य अभ्यास मंडळ पुणे यांनी इयत्ता दहावीच्या हिंदी विषयामध्ये हायकू विद्येला प्रथमच स्थान दिले असल्याची माहिती कवी अभिषेक जैन यांनी दिली.कथा, कविता प्रकाशित करण्यापूर्वी संबंधित लेखकाची परवानगी घेण्यात येते; परंतु अभिषेक जैन यांची माहिती मिळाली नसल्यामुळे आणि त्यांची हायकू विद्येतील कविता दर्जेदार असल्यामुळेच अत्यंत विचारपूर्वक राज्य अभ्यास मंडळाने कवितेचा अभ्यासक्रमात समावेश केला.-प्रा. शारदा बियाणी, सदस्य,राज्य अभ्यास मंडळ(हिंदी विषय)

टॅग्स :Akolaअकोलाliteratureसाहित्यEducation Sectorशिक्षण क्षेत्र