शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवा - रणजीत पाटील : जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 15:57 IST

अकोला : सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी ज्ञान-विज्ञान व तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहीजे, असे सांगत शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्यां  विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला पाहीजे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी शुक्रवारी केले.

ठळक मुद्देकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.विलास भाले होते. शेतीला पाणी आणि वीज मिळाल्यास शेतकरी कोणाचाही मोताद राहणार नाही, असही पालकमंत्री डॉ.पाटील यांनी सांगीतले. कृषी विभाग ‘आत्मा’ आणि कृषी विद्यापीठाने प्रयत्न करावे, असेही पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी सांगीतले.

अकोला : सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी ज्ञान-विज्ञान व तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहीजे, असे सांगत शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्यां  विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला पाहीजे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी शुक्रवारी केले.कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विद्यापीठ परिसरात आयोजित जिल्हा कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.विलास भाले होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस.रामामूर्ती, अमरावती विभागीय कृषी सहसंचालक डॉ.सुभाष नागरे, जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ सभापती पुंडलीकराव अरबट, नगरसेवक हरिष आलीमचंदाणी, डॉ.हेमंत बोराडे, डॉ.उमेश ठाकरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड उपस्थित होते.देशाचे पहिले कृषीमंत्री दिवंगत डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी विदर्भातील काळ्या मातीत मोेती पिकविण्याचे स्वप्न पाहीले होते, असे सांगत शेतकऱ्यांच्या हितासाठी संबंधित यंत्रणांकडून जास्तीत -जास्त काम कसे होईल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे पालकमंत्री म्हणाले. निसर्ग जेव्हा साथ देत नाही, तेव्हा खारपानपट्टयात एका पाण्याअभावी शेतकऱ्यां चे पीक जाते, अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी साडेचार हजार कोटींची दिवंगत नानासाहेब देशमुख बळीराजा कृषी संजिवनी योजना मुख्यमंत्र्यांनी सुरु केली असून, शेतीला पाणी आणि वीज मिळाल्यास शेतकरी कोणाचाही मोताद राहणार नाही, असही पालकमंत्री डॉ.पाटील यांनी सांगीतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक सुरेश बाविस्कर यांनी केले.संचालन बाळकृष्ण बिडवई व विकास पल्हाडे यांनी तर आभारप्रदर्शन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी केले.‘सात-बारा’सोबतच जमीन आरोग्य पत्रिका द्या !जमीनीत काय कमी आहे, यासंदर्भात शेतकऱ्यांना माहिती मिळावी, यासाठी दोन वर्षात प्रत्येक शेतकºयाला सात-बारा सोबतच जमीन आरोग्य पत्रिका (सॉईल हेल्थ कार्ड ) देण्यासाठी कृषी विभाग ‘आत्मा’ आणि कृषी विद्यापीठाने प्रयत्न करावे, असेही पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी सांगीतले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola District Agro Festival 2018अकोला जिल्हा कृषी महोत्सव २०१८guardian ministerपालक मंत्री