शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवा - रणजीत पाटील : जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 15:57 IST

अकोला : सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी ज्ञान-विज्ञान व तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहीजे, असे सांगत शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्यां  विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला पाहीजे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी शुक्रवारी केले.

ठळक मुद्देकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.विलास भाले होते. शेतीला पाणी आणि वीज मिळाल्यास शेतकरी कोणाचाही मोताद राहणार नाही, असही पालकमंत्री डॉ.पाटील यांनी सांगीतले. कृषी विभाग ‘आत्मा’ आणि कृषी विद्यापीठाने प्रयत्न करावे, असेही पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी सांगीतले.

अकोला : सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी ज्ञान-विज्ञान व तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहीजे, असे सांगत शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्यां  विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला पाहीजे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी शुक्रवारी केले.कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विद्यापीठ परिसरात आयोजित जिल्हा कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.विलास भाले होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस.रामामूर्ती, अमरावती विभागीय कृषी सहसंचालक डॉ.सुभाष नागरे, जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ सभापती पुंडलीकराव अरबट, नगरसेवक हरिष आलीमचंदाणी, डॉ.हेमंत बोराडे, डॉ.उमेश ठाकरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड उपस्थित होते.देशाचे पहिले कृषीमंत्री दिवंगत डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी विदर्भातील काळ्या मातीत मोेती पिकविण्याचे स्वप्न पाहीले होते, असे सांगत शेतकऱ्यांच्या हितासाठी संबंधित यंत्रणांकडून जास्तीत -जास्त काम कसे होईल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे पालकमंत्री म्हणाले. निसर्ग जेव्हा साथ देत नाही, तेव्हा खारपानपट्टयात एका पाण्याअभावी शेतकऱ्यां चे पीक जाते, अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी साडेचार हजार कोटींची दिवंगत नानासाहेब देशमुख बळीराजा कृषी संजिवनी योजना मुख्यमंत्र्यांनी सुरु केली असून, शेतीला पाणी आणि वीज मिळाल्यास शेतकरी कोणाचाही मोताद राहणार नाही, असही पालकमंत्री डॉ.पाटील यांनी सांगीतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक सुरेश बाविस्कर यांनी केले.संचालन बाळकृष्ण बिडवई व विकास पल्हाडे यांनी तर आभारप्रदर्शन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी केले.‘सात-बारा’सोबतच जमीन आरोग्य पत्रिका द्या !जमीनीत काय कमी आहे, यासंदर्भात शेतकऱ्यांना माहिती मिळावी, यासाठी दोन वर्षात प्रत्येक शेतकºयाला सात-बारा सोबतच जमीन आरोग्य पत्रिका (सॉईल हेल्थ कार्ड ) देण्यासाठी कृषी विभाग ‘आत्मा’ आणि कृषी विद्यापीठाने प्रयत्न करावे, असेही पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी सांगीतले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola District Agro Festival 2018अकोला जिल्हा कृषी महोत्सव २०१८guardian ministerपालक मंत्री