शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

दुष्काळसदृश परिस्थितीत मजुरांच्या हाताला कामांची मागणी वाढली

By संतोष येलकर | Updated: May 4, 2024 14:53 IST

जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या कामांवर १० हजार मजुरांची उपस्थिती

अकोला : दुष्काळसदृश परिस्थिती आणि पिकांची उलंगवाडी झाल्याने तापत्या उन्हाच्या दिवसांत शेतीची कामे नसल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मजुरांच्या हाताला कामांची मागणी वाढली आहे. त्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात सद्य:स्थितीत सुरू असलेल्या १ हजार ७२० कामांवर १० हजार ३५ मजुरांची उपस्थिती असल्याचे वास्तव आहे.

गेल्या पावसाळ्यात पर्जन्यमान कमी झाल्यामुळे गेल्या ऑगस्टमध्येच शासन निर्णयानुसार जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. शेतातील कोरडवाहू पिकांची दोन महिन्यांपूर्वीच उलंगवाडी झाल्याने, शेतीची कामेही थांबली आहेत. त्यामुळे तापत्या उन्हाळ्यात ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळेनासे झाले आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या कामांसाठी मजुरांकडून होणाऱ्या मागणीत वाढ झाली असून, सद्य:स्थितीत जिल्ह्यातील विविध भागांत सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांवरील मजुरांना रोजगाराचा आधार मिळाला आहे.

१,७२० कामांवर १०,०३५ मजूर !तालुका कामे मजूर उपस्थितीअकोला ३९४ २९३६अकोट २५९ १०२०बाळापूर १७८ ७९३बार्शिटाकळी २५० १६२८मूर्तिजापूर २८५ १७०८पातूर २१६ १३८३तेल्हारा १३८ ५६७

महिनाभरात ६,८३५ मजुरांची वाढली उपस्थिती !जिल्ह्यातील रोहयो कामांवर गेल्या ८ एप्रिलपर्यत ३ हजार २०० मजुरांची उपस्थिती होती. त्यानंतर ३ मे पर्यंत जिल्ह्यातील रोहयो कामांवरील मजुरांची उपस्थिती १० हजार ३५ इतकी झाल्याने, महिनाभरात ६ हजार ८३५ मजुरांची उपस्थिती वाढल्याचे चित्र आहे.

अशी आहेत सुरू कामे!रोहयोअंतर्गत जिल्ह्यात सध्या घरकुल, सिंचन विहिरी, पाणंद रस्ते, गुरांचे गोठे, रोपवाटिका, वृक्ष संगोपन आदी कामे सुरू आहेत.

मागणी येताच कामे उपलब्ध करून द्या; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश !रोहयोअंतर्गत जिल्ह्यात गावपातळीवर मजुरांकडून कामांची मागणी प्राप्त होताच तातडीने कामे उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जिल्ह्यातील तहसीलदार व पंचायत समितींच्या गटविकास अधिकाऱ्यांना २ मे रोजी आढावा बैठकीत दिले. तालुकास्तरावरील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन रोहयो कामांची गती वाढविण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.