शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

जिल्ह्यात १५ प्रादेशिक योजनांची कामे निम्म्यावरच; ५२३ गावांतील ग्रामस्थांना पाणी मिळणार कधी?

By संतोष येलकर | Updated: June 25, 2024 16:29 IST

जलजीवन मिशनअंतर्गत दरडोई दर दिवसाला ५५ लीटर पाणी उपलब्ध करून देण्यासह शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आदी संस्था आणि गुरांसाठी पाणी उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

अकोला : ‘जलजीवन मिशन’अंतर्गत जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून सुरू करण्यात आलेली १ हजार २८ कोटी रुपये किमतीची १५ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची कामे अद्याप निम्म्यावरच आहेत. त्यामुळे रेंगाळलेली कामे पूर्ण होणार केव्हा आणि प्रत्यक्षात योजनांद्वारे ५२३ गावांतील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळणार तरी कधी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

जलजीवन मिशनअंतर्गत दरडोई दर दिवसाला ५५ लीटर पाणी उपलब्ध करून देण्यासह शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आदी संस्था आणि गुरांसाठी पाणी उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात ११ नवीन आणि ४ सुधारणात्मक पुनर्जोडणी अशा १५ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची कामे मंजूर करण्यात आली. १ हजार २८ कोटी रुपये अंदाजपत्रकीय किमतीच्या या योजनांची कामे गेल्या मे ते डिसेंबर २०२२ पासून सुरू करण्यात आली. संबंधित योजनांची कामे मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते; मात्र सद्यस्थितीत जिल्ह्यातील या पाणीपुरवठा योजनांची कामे सरासरी ५० टक्क्यापर्यंत पोहोचली असून, उर्वरित ५० टक्के कामे अद्याप बाकी असल्याने, या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण होणार तरी कधी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

कामे सुरू असलेल्या अशा आहेत १५ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना !

बाळापूर ६९ खेडी पाणीपुरवठा योजना.

तेल्हारा ६९ गावे पाणीपुरवठा योजना.

पोपटखेड ९७ गावे पाणीपुरवठा योजना.

अकोट ८४ खेडी पाणीपुरवठा योजना.

लंघापूर ५० गावे पाणीपुरवठा योजना.

लाखपुरी १८ गावे पाणीपुरवठा योजना.

कुरुम आणि दोन गावे पाणीपुरवठा योजना.

पिंजर व दोन गावे पाणीपुरवठा योजना.

धाबा आणि १३ गावे पाणीपुरवठा योजना.

कान्हेरी व १० गावे पाणीपुरवठा योजना.

वाडेगाव आणि २४ गावे पाणीपुरवठा योजना.

खांबोरा ६० खेडी पाणीपुरवठा योजना.

खांबोरा ४ खेडी पाणीपुरवठा योजना.

शिरपूर आणि १२ गावे पाणीपुरवठा योजना.

बागायत पातूर व २ गावे पाणीपुरवठा योजना.जलकुंभ, जलशुद्धीकरण केंद्र उभारणीसाठी कुशल कारागिरांची वानवा !

जिल्ह्यातील १५ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत जलकुंभ व जलशुद्धीकरण केंद्र उभारणीसाठी कुशल कारागीर अपेक्षित प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने, कुशल करागिरांची वानवा असल्याने, योजनांच्या जलकुंभ व जलशुद्धीकरण केंद्रांची कामे रेंगाळली आहेत.

‘डीआय पाइप’चा तुटवडा !

प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या कामांसाठी आवश्यक असलेल्या डीआय पाइपचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नाही. या पाइपचा तुटवडा जाणवत असल्याने पाणीपुरवठा योजनांची रेंगाळत आहेत. 

टॅग्स :Akolaअकोला