शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

शेतक-यांच्या ‘पॅकेज’ची अंमलबजावणी गतिमान होणार!

By admin | Updated: August 27, 2015 23:58 IST

वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनच्या अधिकारात वाढ, विदर्भ-मराठवाड्यातील १४ जिल्हय़ांचा समावेश.

अतुल जयस्वाल/अकोला: दुष्काळ व नापिकीच्या झळा सहन कराव्या लागत असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा मुद्दा गंभीर बनला असून, राज्य शासनाकडून शेतकर्‍यांसाठी जारी करण्यात आलेल्या विशेष पॅकेजची अंमलबजावणी प्रभावी व तातडीने होत नसल्याचे आरोप आहेत. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांना गती मिळावी, यासाठी गठित करण्यात आलेल्या वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अधिकार व मनुष्यबळ वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. विदर्भ व मराठवाड्यातील १४ जिल्हय़ांसाठी सदर मिशनची पुनर्रचना करण्याचा आदेश शासनाने २४ ऑगस्ट रोजी निर्गमित केला आहे. गत काही वर्षात राज्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या प्रकरणांची दखल घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी व शेती पिकांसाठी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासनाने जाहीर केलेल्या विशेष पॅकेज व इतर उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी वर्ष २00५ मध्ये वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची स्थापना करण्यात आली. तथापि, या मिशनला प्राप्त अधिकार र्मयादित असल्याचे व मनुष्यबळ अपुरे असल्याने मिशनच्या कामास र्मयादा पडत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यानुषंगाने सदर मिशनचे कामकाज अधिक प्रभावी व जलद गतीने पार पाडण्यासाठी शासनाने मिशनची पुनर्रचना केली आहे. औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व व नागपूर विभागातील वर्धा असे एकूण १४ जिल्हे या मिशनच्या कार्यक्षेत्रात आहेत. विदर्भ जनआंदोलन समिती या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या अध्यक्षतेखालील या मिशनमध्ये अन्य आठ सदस्यांचा समावेश आहे. मिशनच्या अध्यक्षांना राज्यमंत्र्यांचा दर्जा देण्यात आला आहे. मिशनचे मुख्यालय हे अमरावती येथे राहणार आहे. राज्यातील ६0 लाख शेतकर्‍यांच्या कल्याणासाठीच्या उपाययोजनांची शिफारस करणे, तसेच या योजनांची अंमलबजावणी सुनिश्‍चित व्हावी, यावर लक्ष ठेवण्याचे अधिकार या मिशनला आहेत. या कामांचा घेणार आढावा कार्यक्षेत्रातील सर्व शेतकर्‍यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत आहे की नाही, याचा सदर मिशनकडून आढावा घेतला जाणार आहे. गरजू शेतकर्‍यांना अन्न सुरक्षा व राजीव गांधी जीवनदायी योजना, आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांच्या मुलांना मोफत शिक्षणाची योजना, शेती विकासासंदर्भात सर्व विभागांकडील शासकीय योजना, शेतकरी आत्महत्या संबंधातील अस्तित्वात असलेल्या सर्व शासन निर्णयांची संबंधित विभागाकडून अंमलबजावणी होत आहे की नाही, याची समांतर समीक्षा व आढावा घेऊन मिशनचे अध्यक्ष महिन्यातून एकदा मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर करतील.