शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्या ‘पॅकेज’ची अंमलबजावणी गतिमान होणार!

By admin | Updated: August 27, 2015 23:58 IST

वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनच्या अधिकारात वाढ, विदर्भ-मराठवाड्यातील १४ जिल्हय़ांचा समावेश.

अतुल जयस्वाल/अकोला: दुष्काळ व नापिकीच्या झळा सहन कराव्या लागत असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा मुद्दा गंभीर बनला असून, राज्य शासनाकडून शेतकर्‍यांसाठी जारी करण्यात आलेल्या विशेष पॅकेजची अंमलबजावणी प्रभावी व तातडीने होत नसल्याचे आरोप आहेत. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांना गती मिळावी, यासाठी गठित करण्यात आलेल्या वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अधिकार व मनुष्यबळ वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. विदर्भ व मराठवाड्यातील १४ जिल्हय़ांसाठी सदर मिशनची पुनर्रचना करण्याचा आदेश शासनाने २४ ऑगस्ट रोजी निर्गमित केला आहे. गत काही वर्षात राज्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या प्रकरणांची दखल घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी व शेती पिकांसाठी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासनाने जाहीर केलेल्या विशेष पॅकेज व इतर उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी वर्ष २00५ मध्ये वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची स्थापना करण्यात आली. तथापि, या मिशनला प्राप्त अधिकार र्मयादित असल्याचे व मनुष्यबळ अपुरे असल्याने मिशनच्या कामास र्मयादा पडत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यानुषंगाने सदर मिशनचे कामकाज अधिक प्रभावी व जलद गतीने पार पाडण्यासाठी शासनाने मिशनची पुनर्रचना केली आहे. औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व व नागपूर विभागातील वर्धा असे एकूण १४ जिल्हे या मिशनच्या कार्यक्षेत्रात आहेत. विदर्भ जनआंदोलन समिती या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या अध्यक्षतेखालील या मिशनमध्ये अन्य आठ सदस्यांचा समावेश आहे. मिशनच्या अध्यक्षांना राज्यमंत्र्यांचा दर्जा देण्यात आला आहे. मिशनचे मुख्यालय हे अमरावती येथे राहणार आहे. राज्यातील ६0 लाख शेतकर्‍यांच्या कल्याणासाठीच्या उपाययोजनांची शिफारस करणे, तसेच या योजनांची अंमलबजावणी सुनिश्‍चित व्हावी, यावर लक्ष ठेवण्याचे अधिकार या मिशनला आहेत. या कामांचा घेणार आढावा कार्यक्षेत्रातील सर्व शेतकर्‍यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत आहे की नाही, याचा सदर मिशनकडून आढावा घेतला जाणार आहे. गरजू शेतकर्‍यांना अन्न सुरक्षा व राजीव गांधी जीवनदायी योजना, आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांच्या मुलांना मोफत शिक्षणाची योजना, शेती विकासासंदर्भात सर्व विभागांकडील शासकीय योजना, शेतकरी आत्महत्या संबंधातील अस्तित्वात असलेल्या सर्व शासन निर्णयांची संबंधित विभागाकडून अंमलबजावणी होत आहे की नाही, याची समांतर समीक्षा व आढावा घेऊन मिशनचे अध्यक्ष महिन्यातून एकदा मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर करतील.