शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची लागणार होती वर्णी, भाजपासोबतची बोलणी अडली; अखेर छगन भुजबळांनी संधी साधली!
2
“मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा; जागावाटपाची चर्चा नको, मित्रपक्षांवर टीका टाळा”
3
दिल्ली उद्ध्वस्त करण्याची योजना, रावळपिंडीत ट्रेनिंग घेतलं! आयएसआयचे दोन हेर पोलिसांच्या ताब्यात
4
'दाल मे कुछ काला है'; शरद पवार गटाची रूपाली चाकणकर, चित्रा वाघ यांच्यावर खरमरीत टीका
5
मोठी बातमी! अथिया शेट्टीने बॉलिवूडला ठोकला रामराम, आई झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय! चाहत्यांना धक्का
6
अनिल गोटेंनी टाळे ठोकलेल्या खोलीत पैशांचे घबाड सापडले; कुलूप तोडून पोलीस आत गेले... 
7
जगभर विनाश होईल, आर्थिक मंदी येईल...; बाबा वेंगाची भयानक भाकितं, जगाचा अंतही सांगून टाकला!
8
"पती निर्दोष, दोनदा पाकिस्तानला गेला कारण..."; शहजादला अटक होताच ढसाढसा रडली रझिया
9
दीपिका पादुकोणचे नखरेच जास्त! मानधन अन् अटी ऐकून दिग्दर्शकाने 'या' सिनेमातून काढलं
10
माझे लग्न पाकिस्तानात करून द्या, ज्योती मल्होत्राची विनंती; चॅटिंग आणि डायरीच्या नोंदीतील माहिती
11
कान्समध्ये पहिल्यांदाच झळकली मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे, ग्लॅमरस लूकने गाजवलं रेड कार्पेट
12
Supriya Sule : "माणसं सैतानासारखी एवढी निर्दयी कशी वागू शकतात?"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप
13
अमेरिकेतून आले 'निराशेचे' संकेत! सेन्सेक्स-निफ्टी धडाम, 'या' १० शेअर्सचं सर्वाधिक नुकसान
14
धुळ्यात 'रात्रीस खेळ चाले...' : विधिमंडळाच्या आमदारांच्या समितीतील सदस्यांसाठी ठेवले साडेपाच कोटी; रेस्ट हाऊसमध्ये सापडले घबाड!
15
दोघांच्या सहमतीनेच शरीरसंबंध घडले; बलात्कारप्रकरणातून शास्त्रज्ञाची सुटका
16
राष्ट्रवादीची राजेंद्र हगवणेंवर कारवाई; पक्षातून बडतर्फ केलं, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी अजित पवारांनी कारवाईचे दिले आदेश
17
रितेशच्या 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार टीव्ही अभिनेता, 'सुख म्हणजे...' मालिकेत केलंय काम
18
Jyoti Malhotra : ४ वेळा मुंबईला गेलेली ज्योती मल्होत्रा; गर्दीच्या ठिकाणांचे फोटो आणि व्हिडीओ कोणाला पाठवले?
19
अमेरिकेत इस्रायली दुतावासाच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या; ज्यूइश म्युझिअमबाहेर गोळीबार
20
धक्कादायक आकडेवारी! जगातली निम्मी संपत्ती फक्त १% लोकांकडे, भारताचा नंबर कितवा?

राखमिश्रीत दूषित पाणी धरणात सोडणे तत्काळ बंद करा!

By admin | Updated: January 8, 2015 00:49 IST

बळीराम सिरस्कार यांचे मुख्य अभियंत्यांना निर्देश ; घटनास्थळाची पाहणी.

अकोला : पारस येथील वीज निर्मिती प्रकल्पात तयार होणारी ज्वलनशील राख, १६ कोटी रुपये खचरून बांधलेल्या अँश पाँडमध्ये सोडण्याऐवजी, मन नदीवरील धरणात सोडण्यात येत आहे. ही बाब ह्यलोकमतह्णने उजेडात आणताच स्थानिक आमदार बळीराम सिरस्कार यांनी पारस येथील वीज निर्मिती केंद्रात जाऊन दूषित पाणी सोडण्यात येत असलेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी मुख्य अभियंत्यांना पाणी सोडण्याच्या कामात होत असलेल्या निष्काळजीबाबत चांगलेच धारेवर धरले आणि दुषित पाणी धरणात सोडणे बंद करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.बाळापूर तालुक्यातील पारस येथे महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचा वीज निर्मिती प्रकल्प असून, यात दररोज शेकडो टन राख जमा होते. ही राख एका पाइपद्वारे कोळासा परिसरातील मोठय़ा भूखंडावर द्रव रूपात जमा केली जाते. द्रव रूपात असलेली ही राख या ठिकाणी गोळा करून, त्यातील पाणी वेगळे केले जाते. त्यानंतर उरलेल्या राखेची विक्री केली जाते. पाणी वेगळे करून राख साठविण्याकरिता १६ कोटी रुपयांचा अँश पाँड प्रकल्प येथे उभारण्यात आला आहे. त्या अँश पाँडपर्यंत पाइपलाइनद्वारे राख पोहोचविण्याकरिता मनारखेडमध्ये पंप हाऊस बांधण्यात आले आहे; मात्र वीज निर्मिती प्रकल्पातून निघालेली राख अँश पाँडपर्यंत पोहोचतच नाही. हे राखमि२िँं१्रूँं१त दूषित पाणी पंप हाऊसजवळून एका नालीद्वारे थेट मन नदीवर बांधलेल्या धरणात सोडण्यात येते असल्याचे लोकमतने बुधवारच्या अंकात प्रकाशित केले. तसेच या पाण्यात असलेल्या घातक रसायनांमुळे परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य कसे धोक्यात येऊ शकते, याबाबतचा आरोग्य प्रयोगशाळेचा अहवालही प्रसिद्ध केला. प्रकल्पाच्या आत सुरू असलेल्या कामामध्ये होत असलेल्या निष्काळजीपणा लोकमतच्या माध्यमातून उघडकीस आल्यानंतर बुधवारी सकाळीच आमदार सिरस्कार यांनी प्रकल्पावर धाव घेतले. वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता रवींद्र गोहणे यांना सोबत घेऊन त्यांनी धरणात पाणी सोडण्यात येत असलेल्या भागाची पाहणी केली. धरणात पाणी सोडताना होत असलेला निष्काळजीपणा बघून त्यांनी मुख्य अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले. पंप हाऊसचे काम तत्काळ पूर्ण करण्याची सूचना त्यांनी अभियंत्यांना केली. तसेच प्रक्रिया न करता पाणी धरणात सोडले जाणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत त्यांनी मुख्य अभियंत्यांना सूचना केली. वीज निर्मिती केंद्रातील दूषित पाणी धरणात सोडण्यापूर्वी प्रक्रिया होऊनच सोडणे आवश्यक आहे. प्रकल्पाच्या आत कोणते काम सुरू आहे, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष जात नाही. अडचणीच्या ठिकाणी असल्याने त्याकडे सहसा कुणी जाऊन बघत नाही. लोकमतच्या माध्यमातून हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे आता कामाला गती येईल. त्याबाबत अभियंत्यांना सूचना दिली असल्याचे आमदार बळीराम सिरस्कार यांनी सांगीतले.