शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
7
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
8
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
9
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
10
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
11
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
12
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
13
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
14
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
15
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
16
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
17
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
18
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
19
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
20
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

राखमिश्रीत दूषित पाणी धरणात सोडणे तत्काळ बंद करा!

By admin | Updated: January 8, 2015 00:49 IST

बळीराम सिरस्कार यांचे मुख्य अभियंत्यांना निर्देश ; घटनास्थळाची पाहणी.

अकोला : पारस येथील वीज निर्मिती प्रकल्पात तयार होणारी ज्वलनशील राख, १६ कोटी रुपये खचरून बांधलेल्या अँश पाँडमध्ये सोडण्याऐवजी, मन नदीवरील धरणात सोडण्यात येत आहे. ही बाब ह्यलोकमतह्णने उजेडात आणताच स्थानिक आमदार बळीराम सिरस्कार यांनी पारस येथील वीज निर्मिती केंद्रात जाऊन दूषित पाणी सोडण्यात येत असलेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी मुख्य अभियंत्यांना पाणी सोडण्याच्या कामात होत असलेल्या निष्काळजीबाबत चांगलेच धारेवर धरले आणि दुषित पाणी धरणात सोडणे बंद करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.बाळापूर तालुक्यातील पारस येथे महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचा वीज निर्मिती प्रकल्प असून, यात दररोज शेकडो टन राख जमा होते. ही राख एका पाइपद्वारे कोळासा परिसरातील मोठय़ा भूखंडावर द्रव रूपात जमा केली जाते. द्रव रूपात असलेली ही राख या ठिकाणी गोळा करून, त्यातील पाणी वेगळे केले जाते. त्यानंतर उरलेल्या राखेची विक्री केली जाते. पाणी वेगळे करून राख साठविण्याकरिता १६ कोटी रुपयांचा अँश पाँड प्रकल्प येथे उभारण्यात आला आहे. त्या अँश पाँडपर्यंत पाइपलाइनद्वारे राख पोहोचविण्याकरिता मनारखेडमध्ये पंप हाऊस बांधण्यात आले आहे; मात्र वीज निर्मिती प्रकल्पातून निघालेली राख अँश पाँडपर्यंत पोहोचतच नाही. हे राखमि२िँं१्रूँं१त दूषित पाणी पंप हाऊसजवळून एका नालीद्वारे थेट मन नदीवर बांधलेल्या धरणात सोडण्यात येते असल्याचे लोकमतने बुधवारच्या अंकात प्रकाशित केले. तसेच या पाण्यात असलेल्या घातक रसायनांमुळे परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य कसे धोक्यात येऊ शकते, याबाबतचा आरोग्य प्रयोगशाळेचा अहवालही प्रसिद्ध केला. प्रकल्पाच्या आत सुरू असलेल्या कामामध्ये होत असलेल्या निष्काळजीपणा लोकमतच्या माध्यमातून उघडकीस आल्यानंतर बुधवारी सकाळीच आमदार सिरस्कार यांनी प्रकल्पावर धाव घेतले. वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता रवींद्र गोहणे यांना सोबत घेऊन त्यांनी धरणात पाणी सोडण्यात येत असलेल्या भागाची पाहणी केली. धरणात पाणी सोडताना होत असलेला निष्काळजीपणा बघून त्यांनी मुख्य अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले. पंप हाऊसचे काम तत्काळ पूर्ण करण्याची सूचना त्यांनी अभियंत्यांना केली. तसेच प्रक्रिया न करता पाणी धरणात सोडले जाणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत त्यांनी मुख्य अभियंत्यांना सूचना केली. वीज निर्मिती केंद्रातील दूषित पाणी धरणात सोडण्यापूर्वी प्रक्रिया होऊनच सोडणे आवश्यक आहे. प्रकल्पाच्या आत कोणते काम सुरू आहे, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष जात नाही. अडचणीच्या ठिकाणी असल्याने त्याकडे सहसा कुणी जाऊन बघत नाही. लोकमतच्या माध्यमातून हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे आता कामाला गती येईल. त्याबाबत अभियंत्यांना सूचना दिली असल्याचे आमदार बळीराम सिरस्कार यांनी सांगीतले.