शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

चिखलगावात अवैध दारू विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:14 IST

थंडीचा जोर वाढल्याने आजार बळावले खानापूर: गत दिवसांपासून खानापूर परिसरात थंडीचा जोर वाढला आहे. कडाक्याची थंडी पडत असल्याने, नागरिकांना ...

थंडीचा जोर वाढल्याने आजार बळावले

खानापूर: गत दिवसांपासून खानापूर परिसरात थंडीचा जोर वाढला आहे. कडाक्याची थंडी पडत असल्याने, नागरिकांना शेकोटीसह ऊबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. तसेच सर्दी, खोकला, ताप, दमा आजारांनी डोके वर काढले आहे.

रस्त्याची दुरुस्ती करा, अन्यथा आंदोलन

बोरगाव मंजू: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाची दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे निर्माण झाले आहेत. खड्ड्यांमुळे दररोज किरकोळ अपघात घडत आहेत. रस्त्याची महामार्ग प्राधिकरणाने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

कपाशी पिकाचे सर्वेक्षण करण्याची मागणी

माना: परिसरात कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात बोंडअळी व बोंडसळचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. यंदाचे वर्ष नापिकीचे गेल्यामुळे आर्थिकदृष्ट्या शेतकरी खचला आहे. बोंडअळी आलेल्या कपाशी पिकाचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव, तरीही बेफिकिरी!

चोहोट्टा बाजार: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही नागरिक मात्र बेफिकीर आहेत. आठवडी बाजारात गावाेगावचे नागरिक खरेदीसाठी गर्दी करतात. परंतु कोणतीही खबरदारी घेताना दिसत नाहीत. ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस कर्मचारी ढिम्म आहेत. कारवाईसाठी कोणीही पुढे येत नाही.

वन्य प्राण्यांचा धुडगूस, हरभरा पीक धोक्यात

अडगाव: वन्य प्राणी शेतातील हरभरा पिकात धुडगूस घालून पीक उदध्वस्त करीत आहेत. हरभरा पिकामध्ये शिरून वन्य प्राणी पीक फस्त करीत आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. वन्य प्राण्यांचा वन विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मुख्य मार्गावरचे अतिक्रमण काढण्याची मागणी

अकोट: शहरातील अकोला नाकापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतच्या रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले. रस्त्यावर दुकाने थाटल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे. नगर परिषदेने अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्याची नागरिकांनी केली आहे.

पूर्णा नदीतून अवैध रेतीचे उत्खनन

म्हैसांग: परिसरातील कट्यार, वडद, कपिलेश्वर, वीरवाडा, म्हैसांग आदी गावांमधून जाणाऱ्या पूर्णा नदी पात्रातून रेती माफिया दिवसरात्र रेतीचे अवैध उत्खनन करीत आहेत. याकडे तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.

हरभरा पिकाला पाणी देण्याची लगबग

आपातापा: मूग, उडीद, सोयाबीनच्या पिकाने धोका दिल्याने, यंदा शेतकऱ्यांना हरभरा पिकाकडून अपेक्षा आहेत. हरभरा पिकाचे उत्पादन वाढण्यासाठी शेतकरी पूर्णा नदीतून, शेततळ्यांमधून पाणी देण्यावर देत आहेत. शेतांमध्ये स्प्रिंकलर लावलेले दिसून येत आहेत.

रानडुकरांपासून पिकांचे संरक्षण

पिंजर: कपाशी, हरभरा, तूर पिकांचे रानडूकर, हरिणांपासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी आता नवीन शक्कल लढविली आहे. वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतातील धुऱ्यांवर साड्यांचे कुंपण घातल्याचे चित्र परिसरात दिसत आहेत.