शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

पाच झाडे लावून संगोपन केल्यास घरपट्टी माफ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 14:38 IST

पाच झाडे लावून त्यांचे संगोपन करणाऱ्यांना दोन वर्षांची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय राजनापूरच्या ग्रामपंचायतने घेतला आहे.

- पंकज सातपुते लोकमत न्यूज नेटवर्ककुरूम: पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाकडून वृक्षारोपणासह संगोपनासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. वृक्षारोपणासह त्यांचे संगोपन व्हावे, यासाठी मूर्तिजापूर तालुक्यातील राजनापूर खिनखिनी ग्रामपंचायतने अभिनव योजना सुरू केली आहे. पाच झाडे लावून त्यांचे संगोपन करणाऱ्यांना दोन वर्षांची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय राजनापूरच्या ग्रामपंचायतने घेतला आहे. वृक्षारोपण करून पाच वर्षे झाडे जगविणाºया ग्रामस्थांना ग्रामपंचायतचे सर्व दाखले मोफत देण्यात येणार आहेत तसेच त्यांच्या दोन मुलांच्या किंवा मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी ग्रामपंचायत घेणार आहे. महाराष्ट्र शासन वृक्ष लागवडीसाठी लाखो रुपये खर्च करते; परंतु लावण्यात आलेल्या वृक्षांपैकी मोजकेच जगविले जातात. हे सर्व वृक्ष जगविण्याची जबाबदारी सामाजिक वनीकरण विभाग व इतर प्रशासकीय विभागाची असते; परंतु वृक्ष लागवड झाल्यावर त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. याचा अभ्यास केल्यावर मूर्तिजापूर तालुक्यातील राजनापूर ग्रामपंचायतने एक आगळा-वेगळा मार्ग शोधला आहे. हा आगळा-वेगळा उपक्रम वृक्ष लागवडीसाठी रोल मॉडेल ठरणार असून, राजनापूर ग्रामपंचायतने गावातील नागरिकांनी आपल्या परिसरात किंवा रस्त्याच्या कडेला जर पाच झाडे लावली व वृक्ष संगोपन केले तर त्याला दोन वर्षांचा घरकर पूर्ण माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान ग्रामसेवक संदिप गाडेकर यांनी सांगितले की, ग्रामपंचायतने केलेला हा उपक्रम एकदम चांगला आहे. यामुळे गावात हिरवळ राहील, जमिनीची धूप थांबेल. अनियमित पाऊस चांगला पडेल आणि या उपक्रमाने लोकांची सहभागाची भावना वाढेल.

टॅग्स :Akolaअकोलाgram panchayatग्राम पंचायत