शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

पाच झाडे लावून संगोपन केल्यास घरपट्टी माफ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 14:38 IST

पाच झाडे लावून त्यांचे संगोपन करणाऱ्यांना दोन वर्षांची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय राजनापूरच्या ग्रामपंचायतने घेतला आहे.

- पंकज सातपुते लोकमत न्यूज नेटवर्ककुरूम: पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाकडून वृक्षारोपणासह संगोपनासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. वृक्षारोपणासह त्यांचे संगोपन व्हावे, यासाठी मूर्तिजापूर तालुक्यातील राजनापूर खिनखिनी ग्रामपंचायतने अभिनव योजना सुरू केली आहे. पाच झाडे लावून त्यांचे संगोपन करणाऱ्यांना दोन वर्षांची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय राजनापूरच्या ग्रामपंचायतने घेतला आहे. वृक्षारोपण करून पाच वर्षे झाडे जगविणाºया ग्रामस्थांना ग्रामपंचायतचे सर्व दाखले मोफत देण्यात येणार आहेत तसेच त्यांच्या दोन मुलांच्या किंवा मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी ग्रामपंचायत घेणार आहे. महाराष्ट्र शासन वृक्ष लागवडीसाठी लाखो रुपये खर्च करते; परंतु लावण्यात आलेल्या वृक्षांपैकी मोजकेच जगविले जातात. हे सर्व वृक्ष जगविण्याची जबाबदारी सामाजिक वनीकरण विभाग व इतर प्रशासकीय विभागाची असते; परंतु वृक्ष लागवड झाल्यावर त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. याचा अभ्यास केल्यावर मूर्तिजापूर तालुक्यातील राजनापूर ग्रामपंचायतने एक आगळा-वेगळा मार्ग शोधला आहे. हा आगळा-वेगळा उपक्रम वृक्ष लागवडीसाठी रोल मॉडेल ठरणार असून, राजनापूर ग्रामपंचायतने गावातील नागरिकांनी आपल्या परिसरात किंवा रस्त्याच्या कडेला जर पाच झाडे लावली व वृक्ष संगोपन केले तर त्याला दोन वर्षांचा घरकर पूर्ण माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान ग्रामसेवक संदिप गाडेकर यांनी सांगितले की, ग्रामपंचायतने केलेला हा उपक्रम एकदम चांगला आहे. यामुळे गावात हिरवळ राहील, जमिनीची धूप थांबेल. अनियमित पाऊस चांगला पडेल आणि या उपक्रमाने लोकांची सहभागाची भावना वाढेल.

टॅग्स :Akolaअकोलाgram panchayatग्राम पंचायत