शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

'वान'च्या पाण्यासाठी रक्त सांडावे लागले तरी चालेल - बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 19:24 IST

वान हनुमानसागर धरणातले पाणी शेतकर्‍यांच्या हक्काचे असून, सिंचन सोडून दुसरीकडे जाऊ देणार नाही. सिंचनाला प्राधान्य दिले नाही तर शेतकर्‍यांसाठी रक्त सांडावे लागेल, आंदोलन करावे लागले तरी चालेल, असे खडे बोल आमदार बच्चू कडू यांनी सुनावले.

ठळक मुद्देसिंचनाचा प्रश्न पेटला शेतकर्‍यांसाठी प्रहार करणार आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : वान हनुमानसागर धरणाचे पाणी शहरातील अमृत योजनेला देण्याचा घाट रचला गेला; परंतु शेतकर्‍यांच्या हक्काचे सिंचन सोडून पाणी दुसरीकडे जाऊ देणार नाही. सिंचनाला प्राधान्य दिले नाही तर शेतकर्‍यांसाठी रक्त सांडावे लागेल, आंदोलन करावे लागले तरी चालेल, असे खडे बोल आमदार बच्चू कडू यांनी सुनावले.शेतकर्‍यांच्या सिंचनासाठी महत्त्वपूर्ण धरण हनुमानसागर तेल्हारा व संग्रामपूर तालुक्यातील लाभक्षेत्रातील गावांना वरदान ठरलं. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा धरण १00 टक्के भरले असताना यावर्षी रब्बी सिंचनासाठी पाणी मिळणार असल्याचे संकेत प्राप्त होताच शेतकर्‍यांनी पाण्यासाठी आंदोलन, निवेदन, अधिकार्‍यांच्या भेटी घेतल्या; परंतु मार्ग निघत नव्हता. वान हनुमानसागराचे  पाणी जळगाव जा., संग्रामपूर, शेगाव, तेल्हारा व अकोटसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ८४ खेडी पाणी पुरवठय़ासाठी दिले जात आहे. त्यातच आता पुन्हा अकोला शहरातील अमृत योजनेकरिता पाणी नेण्याचा घाट असल्याने तालुक्यातील १५ हजार हेक्टर शेती वंचित राहणार असल्याचे चित्र आहे. या सर्व प्रकारामुळे मूळ उद्देश असलेल्या सिंचनाला खोडा बसणार आहे. या सर्व प्रकाराने परिसरातील  शेतकरी संघटना, शिवसेना यांनी आंदोलने केली; परंतु तोडगा निघत नव्हता. वानच्या पाण्याचा शेतकरी सिंचनासाठीच वापर व्हावा, याकरिता प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी विभागीय आयुक्त यांची भेट घेऊन शेतकर्‍यांची बाजू मांडली. यावेळी तेल्हारा तालुक्यातील प्रहारचे कार्यक्रर्ते राजेश पाटील, तुषार पुंडकर, विनोद खुमकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शेतकर्‍यांच्यावतीने सविस्तर निवेदन देण्यात आले. आमदार बच्चू कडू यांनी आधी पाणी सिंचनासाठी द्यावे, नंतर शहरातील योजनांना द्यावे, असे होत नसेल तर शेतकर्‍यांसाठी प्रहार संघटना रक्त सांडायचे काम पडल्यास मागे हटणार नाही. त्याकरिता आधी सिंचन नंतर इतर योजना, असे खडे बोल सुनावले. सिंचनासाठी दोन पाणी देण्याचे अधिकारी सांगत असले तरी दोन पाण्यात पीक येत नाही. त्यामुळे सर्वतोपरी शेतकरी सिंचन विचार व्हावा, असे सांगण्यात आले. त्यामुळे येत्या काही दिवसात वानचे पाणी मिळण्याचे दिसते. 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूTelharaतेल्हारा