शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

'वान'च्या पाण्यासाठी रक्त सांडावे लागले तरी चालेल - बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 19:24 IST

वान हनुमानसागर धरणातले पाणी शेतकर्‍यांच्या हक्काचे असून, सिंचन सोडून दुसरीकडे जाऊ देणार नाही. सिंचनाला प्राधान्य दिले नाही तर शेतकर्‍यांसाठी रक्त सांडावे लागेल, आंदोलन करावे लागले तरी चालेल, असे खडे बोल आमदार बच्चू कडू यांनी सुनावले.

ठळक मुद्देसिंचनाचा प्रश्न पेटला शेतकर्‍यांसाठी प्रहार करणार आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : वान हनुमानसागर धरणाचे पाणी शहरातील अमृत योजनेला देण्याचा घाट रचला गेला; परंतु शेतकर्‍यांच्या हक्काचे सिंचन सोडून पाणी दुसरीकडे जाऊ देणार नाही. सिंचनाला प्राधान्य दिले नाही तर शेतकर्‍यांसाठी रक्त सांडावे लागेल, आंदोलन करावे लागले तरी चालेल, असे खडे बोल आमदार बच्चू कडू यांनी सुनावले.शेतकर्‍यांच्या सिंचनासाठी महत्त्वपूर्ण धरण हनुमानसागर तेल्हारा व संग्रामपूर तालुक्यातील लाभक्षेत्रातील गावांना वरदान ठरलं. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा धरण १00 टक्के भरले असताना यावर्षी रब्बी सिंचनासाठी पाणी मिळणार असल्याचे संकेत प्राप्त होताच शेतकर्‍यांनी पाण्यासाठी आंदोलन, निवेदन, अधिकार्‍यांच्या भेटी घेतल्या; परंतु मार्ग निघत नव्हता. वान हनुमानसागराचे  पाणी जळगाव जा., संग्रामपूर, शेगाव, तेल्हारा व अकोटसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ८४ खेडी पाणी पुरवठय़ासाठी दिले जात आहे. त्यातच आता पुन्हा अकोला शहरातील अमृत योजनेकरिता पाणी नेण्याचा घाट असल्याने तालुक्यातील १५ हजार हेक्टर शेती वंचित राहणार असल्याचे चित्र आहे. या सर्व प्रकारामुळे मूळ उद्देश असलेल्या सिंचनाला खोडा बसणार आहे. या सर्व प्रकाराने परिसरातील  शेतकरी संघटना, शिवसेना यांनी आंदोलने केली; परंतु तोडगा निघत नव्हता. वानच्या पाण्याचा शेतकरी सिंचनासाठीच वापर व्हावा, याकरिता प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी विभागीय आयुक्त यांची भेट घेऊन शेतकर्‍यांची बाजू मांडली. यावेळी तेल्हारा तालुक्यातील प्रहारचे कार्यक्रर्ते राजेश पाटील, तुषार पुंडकर, विनोद खुमकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शेतकर्‍यांच्यावतीने सविस्तर निवेदन देण्यात आले. आमदार बच्चू कडू यांनी आधी पाणी सिंचनासाठी द्यावे, नंतर शहरातील योजनांना द्यावे, असे होत नसेल तर शेतकर्‍यांसाठी प्रहार संघटना रक्त सांडायचे काम पडल्यास मागे हटणार नाही. त्याकरिता आधी सिंचन नंतर इतर योजना, असे खडे बोल सुनावले. सिंचनासाठी दोन पाणी देण्याचे अधिकारी सांगत असले तरी दोन पाण्यात पीक येत नाही. त्यामुळे सर्वतोपरी शेतकरी सिंचन विचार व्हावा, असे सांगण्यात आले. त्यामुळे येत्या काही दिवसात वानचे पाणी मिळण्याचे दिसते. 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूTelharaतेल्हारा