शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

संघर्षाची तयारी असेल तर यश निश्‍चितच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:55 IST

अकोला  :  आव्हाने पेलण्याची क्षमता, परिo्रम, जिद्द, आत्मविश्‍वास, सातत्य, वेळेचा सदूपयोग यासोबतच संघर्ष करण्याची तयारी असेल तर केवळ यूपीएससी, एमपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षाच नव्हे, तर आयुष्याच्या कुठल्याही परीक्षेत तुम्ही उत्तीर्ण होऊ शकता, अशा शब्दात अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी विद्यार्थ्यांना यशाचा ‘पासवर्ड’ दिला. 

ठळक मुद्देजिल्हाधिकार्‍यांनी दिला यशाचा ‘पासवर्ड’ लोकमत स्पर्धा परीक्षा लेखमालेचे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला  :  आव्हाने पेलण्याची क्षमता, परिo्रम, जिद्द, आत्मविश्‍वास, सातत्य, वेळेचा सदूपयोग यासोबतच संघर्ष करण्याची तयारी असेल तर केवळ यूपीएससी, एमपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षाच नव्हे, तर आयुष्याच्या कुठल्याही परीक्षेत तुम्ही उत्तीर्ण होऊ शकता, अशा शब्दात अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी विद्यार्थ्यांना यशाचा ‘पासवर्ड’ दिला. स्थानिक o्री शिवाजी महाविद्यालयाच्या  वसंत सभागृहात ‘लोकमत’ स्पर्धा परीक्षा लेखमालेचे प्रकाशन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. मंचावर श्री. शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष भडांगे, लोकमत अकोला आवृत्तीचे निवासी संपादक रवी टाले, लोकमतचे सहायक महाव्यवस्थापक रमेश डेडवाल प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी तब्बल दीड तास विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. ‘लोकमत’ ने  समाजातील प्रत्येक घटकाचे भान सदैव ठेवले आहे. युवकांना भविष्य घडविण्याच्या दृष्टीने स्पर्धा परीक्षा ही पर्वणी असते; त्यासाठी लोकमत सहाय्यभूत ठरत असल्याबद्दल त्यांनी कौतुक करीत, त्यांचे लोकमतसोबत असलेले ऋणानुबंध उलगडले. यूपीएससी, एमपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रत्येक गुणवंतासाठी यशाचे क्षितिज मोकळे आहे. प्रत्येकाला संधी आहे; मात्र ही संधी हस्तगत करण्यासाठी जिद्द हवी, अभ्यासात सातत्य असावे, मिळालेला प्रत्येक क्षण कसा सत्कारणी लागेल, याचे नियोजन असावे, असे ते म्हणाले. तरुणपणी प्रत्येकाजवळ प्रचंड ऊर्जा असते. या ऊर्जेचा वापर हा सकारात्मक व्हावा. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी या ऊर्जेला साधन म्हणून वापरता आले पाहिजे. चांगला क्लास नाही, मला मार्गदर्शन नाही, अशी ओरड करण्यापेक्षा आहे त्या साधनांचा सर्वाधिक वापर करता आला पाहिजे. सोशल मीडियाचा सकारात्मक वापर केला तर तो खूप महत्त्वाचा ठरतो, असे उदाहरणासह स्पष्ट केले. नव्या काळाशी सुसंगत असे बदल स्वीकारताना आपण स्वत:पासून बदल केला पाहिजे.  अभ्यासाला शिस्त लावा, शिस्तीचे पालन करा, नियोजन करून ते प्रत्यक्षात येईल, यासाठी प्रयत्न करा, यश तुमचेच, असा मूलमंत्र जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी दिला. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न विचारले. प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रश्नाचे त्यांनी समाधान केले. प्रारंभी शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख व ‘लोकमत’चे संस्थापक स्वातंत्र्यसैनिक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. शिवाजी महाविद्यालयाच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हाधिकार्‍यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छ भारत अभियानाची शपथ दिली. कार्यक्रमाला प्रा.डॉ. संजय खडक्कार, प्रा.डॉ. मोहन खडसे, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा.डॉ. संजय तिडके यांच्यासह विद्यार्थी व शिक्षक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. संचालन लोकमतचे मुख्य उपसंपादक राजेश शेगोकार यांनी केले.

‘लोकमत’मधील स्तंभावर आधारित परीक्षेत प्रथम येणार्‍यास मोफत शिक्षणशिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांनी ‘लोकमत’च्या उपक्रमाचे कौतुक करून, हा स्तंभ विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल, असा विश्‍वास व्यक्त केला. या स्तंभामध्ये येणार्‍या माहितीवर आधारित परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेत प्रथम येणार्‍या विद्यार्थ्यास एक वर्षाचे शिक्षण मोफत व रोख रकमेचा पुरस्कार देण्याची घोषणा डॉ. भडांगे यांनी  केली.