शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

बँकेत संयुक्त खाते असेल, तरच मिळतील गणवेशाचे पैसे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:39 IST

अकोला: महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करणे अनिवार्य असले, तरी शासनाच्या क्लिष्ट निकषांमुळे मुख्याध्यापकांच्या नाकीनऊ आले आहेत. बँकेमध्ये विद्यार्थी व त्याच्या आईच्या नावाने संयुक्त खाते उघडल्यानंतर व शालेय गणवेशाच्या खरेदीची पावती सादर केल्यानंतरच मुख्याध्यापकांकडून

ठळक मुद्देविद्यार्थी व त्याच्या आईच्या नावाने हवी नोंदप्रगती अहवाल घेतला का?

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करणे अनिवार्य असले, तरी शासनाच्या क्लिष्ट निकषांमुळे मुख्याध्यापकांच्या नाकीनऊ आले आहेत. बँकेमध्ये विद्यार्थी व त्याच्या आईच्या नावाने संयुक्त खाते उघडल्यानंतर व शालेय गणवेशाच्या खरेदीची पावती सादर केल्यानंतरच मुख्याध्यापकांकडून विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. या प्रकारामुळे अद्यापपर्यंत केवळ १0 ते १२ टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांनी बँकेत खाते उघडल्याची माहिती आहे. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडून विविध सवलती दिल्या जातात. यामध्ये शालेय शुल्क, गणवेश, पुस्तके, दिव्यांग विद्यार्थ्यांना गरजू साहित्य, औषधींचे वितरण आदींचा समावेश आहे. गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी ही भक्कम बाजू असली, तरी दुसरीकडे मूलभूत सुविधांच्या दर्जावर प्रश्नचिन्हं उपस्थित केले जातात. मनपा शाळांप्रती विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी, यासाठी त्यांना शालेय गणवेश, पुस्तकांचे तातडीने वितरण करून मूलभूत सुविधांची पूर्तता होणे अपेक्षित आहे. शासनाचे धोरण पाहता याठिकाणी नेमका उलटा प्रकार होत असल्याचे चित्र समोर येत आहे. चिमुकल्या विद्यार्थ्यांंच्या शालेय गणवेशासाठी सर्व शिक्षा अभियानमधून निधीची तरतूद केली जाते. एका विद्यार्थ्याला दोन गणवेश देण्यासाठी ४00 रुपयांची तरतूद आहे. मात्र ही रक्कम अदा करण्याची पद्धत मुख्याध्यापकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. शालेय गणवेशाचे पैसे हवे असतील, तर बँकेत विद्यार्थी व त्याच्या आईच्या नावाने संयुक्त खाते उघडणे बंधनकारक करण्यात आले आहे. खाते उघडल्यानंतर स्वत:च्या खिशातून चारशे रुपये खर्च करून, त्याची पावती मुख्याध्यापकांना दाखवावी लागेल. त्यानंतरच मुख्याध्यापकांकडून चारशे रुपये खात्यात जमा केले जातील. हा उफराटा प्रकार पाहता मनपा शाळेतील ७ हजार ३00 विद्यार्थ्यांपैकी आजपर्यंंत केवळ दहा ते बारा टक्के विद्यार्थ्यांंनीच बँकेत खाते उघडल्याची माहिती आहे. 

प्रगती अहवाल घेतला का?महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांंना शालेय गणवेश वाटप करणे शिक्षण विभागाला अनिवार्य आहे. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत प्राप्त निधी मुख्याध्यापकांच्या खात्यात कधीचाच वळती करण्यात आला आहे. असे असताना शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांनी संबंधित मुख्याध्यापकांकडून गणवेश वाटपाचा प्रगती अहवाल घेणे अपेक्षित आहे. शिक्षणाधिकार्‍यांचे कामकाज पाहता आजपर्यंंत किती शाळांनी प्रगती अहवाल सादर केला आणि त्यावर शिक्षणाधिकार्‍यांनी काय निर्णय घेतला, याबाबत प्रशासनाने खुलासा करण्याची गरज आहे.