शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

विवरणपत्र भरले नाही तर होणार दहा हजार दंड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 15:18 IST

अकोला: प्राप्तिकरदात्यांसाठी पुढील ३४ दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. यादरम्यान आपले प्राप्तिकर विवरणपत्र भरले नाही तर किमान ५ हजार रुपये तर कमाल १० हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे, अशी माहिती सीए आशीष बाहेती यांनी दिली आहे.

ठळक मुद्दे २०१८-१९ या निर्धारण वर्षाकरिता ३१ जुलै २०१८ पर्यंत २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे विवरणपत्र दाखल करणे बंधनकारक केले आहे. ३१ जुलैपर्यंत विवरणपत्र भरले नाही तर व्याजासह दंडही भरावा लागणार आहे. नव्या नियमानुसार २०१८-१९ या कर निर्धारण वर्षापासून व्याजासोबतच आर्थिक दंडही आकारण्यात येणार आहे.

अकोला: प्राप्तिकरदात्यांसाठी पुढील ३४ दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. यादरम्यान आपले प्राप्तिकर विवरणपत्र भरले नाही तर किमान ५ हजार रुपये तर कमाल १० हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे, अशी माहिती सीए आशीष बाहेती यांनी दिली आहे. केंद्र सरकारने वर्ष २०१८-१९ या निर्धारण वर्षाकरिता ३१ जुलै २०१८ पर्यंत २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे विवरणपत्र दाखल करणे बंधनकारक केले आहे. हा नियम सर्व करदात्यांना लागू आहे. अपवाद फक्त लेखापरीक्षण करून घ्यावे लागणारे करदाते आहेत. त्यांच्यासाठी ३० सप्टेंबर २०१८ ही शेवटची तारीख आहे. या पूर्वीच्या करनिर्धारण वर्षात उशिरा विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त व्याज आकारले जायचे. ३१ जुलैपर्यंत विवरणपत्र भरले नाही तर व्याजासह दंडही भरावा लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

असा बसेल दंड...३१ जुलै २०१८ पर्यंत विवरणपत्र दाखल केल्यास दंड बसणार नाही; मात्र १ आॅगस्ट २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत दाखल केल्यास ५ हजार दंड, पण जर उत्पन्न ५ लाखांच्या आत असेल तर १००० रुपये दंड लागेल. प्राप्तिकर विवरणपत्र १ जानेवारी २०१९ ते ३१ मार्च २०१९ या दरम्यान दाखल केल्यास १० हजार दंड लागेल. एकूण उत्पन्न पाच लाखापेक्षा जास्त नसेल तर दंड १००० रुपयांपर्यंत मर्यादित राहील. यामुळेच प्राप्तिकर विवरणपत्र ३१ जुलै २०१८ पर्यंत दाखल केले तर दंड बसणार नाही, अशी माहिती सहयोग फायनान्शियल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे संचालक व कर सल्लागार अधिवक्ता आशीष बाहेती यांनी दिली.

आता व्याजासोबत दंडनव्या नियमानुसार २०१८-१९ या कर निर्धारण वर्षापासून व्याजासोबतच आर्थिक दंडही आकारण्यात येणार आहे. उशिरा विवरणपत्र दाखल केल्यास दंड भरावा लागेल. ही तरतूद प्राप्तिकर कायद्यातील कलम २३८ (फ) मध्ये करण्यात आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाIncome Taxइन्कम टॅक्स