शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आयात धोरण न बदलल्यास मूग-उडीद डाळीचे भाव तिपटीने वाढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 14:34 IST

- संजय खांडेकर अकोला : ओल्या दुष्काळामुळे मूग-उडीदचे प्रचंड नुकसान झाले असून, अत्यल्प साठा बाजारपेठेत येत आहे. एकीकडे नवीन ...

- संजय खांडेकर

अकोला : ओल्या दुष्काळामुळे मूग-उडीदचे प्रचंड नुकसान झाले असून, अत्यल्प साठा बाजारपेठेत येत आहे. एकीकडे नवीन पीक आले नाही अन् दुसरीकडे सरकारने आयात धोरणात अद्याप बदल केलेला नसल्याने उडीद आणि मूग डाळीचे भाव तिपटीने वाढण्याचे संकेत आहे.परतीच्या पावसाने यंदा उशिरापर्यंत मुक्काम ठोकल्याने तयार झालेले पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले, त्यामुळे यंदा मूग आणि उडीद बाजारपेठेत अत्यल्प आहे. दरम्यान, भारत सरकारने ३१ आॅक्टोबरपर्यंतच धान्याचे इम्पोर्ट (आयात) सुरू ठेवले. आता नव्याने येणारा मूग-उडीदचा विदेशी कोटा घेण्यासाठी कोणतेही नवीन धोरण सरकारने आखलेले नाही. दरवर्षी म्यानमारमधून उडीद आणि आफ्रिकेतून मुगाचा साठा येत असतो, तो आलादेखील; मात्र आलेला साठा पुरेसा नाही. सोबतच यंदा देशांतर्गत पीक नाहीसारखे असल्याने आणि आयात धोरणात बदल होणे गरजेचे आहे. असे न झाल्यास दोन्ही कडधान्याच्या डाळी महाग होण्याचे संकेत आहे. त्याची चाहूल बाजारात जाणवू लागली आहे. बाजारात येत असलेल्या मुगाला ५१०० पासून तर ६३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. उडदाला ४५०० पासून तर ६५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. दोन्ही कडधान्याचे भावही वधारणार असल्याचे संकेत आहेत.-म्यानमार आणि आफ्रिका दोन्ही देशात सध्या मूग-उडीदचे भाव कमी असून, केंद्र शासनाने आयातीचा नवीन कोटा वाढविला पाहिजे, त्यामुळे दोन्ही डाळीचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील, अन्यथा दोनशे रुपयांपर्यंत डाळींचे भाव पोहोचण्याची शक्यता आहे.-वसंत बाछुका,उद्योजक अकोला.मूग-उडीदला मागणी कशासाठी..ईडली, डोसा, पापळ, वडे आदी पदार्थ दररोजच्या खाण्यात हॉटेलींगमध्ये असते. त्यामुळे तूर डाळीप्रमाणेच मूग-उडीदला मोठी मागणी आहे. जर मूग-उडीदच्या डाळीचे भाव वधारले तर त्यापासून तयार होणाºया उपरोक्त पदार्थांचे भावही वधारण्याची शक्यता वर्तविली जात आहे.दोन दिवसांत उडीद डाळीचे भाव वधारलेमागिल काही दिवसांआधीपर्यंत उडीद डाळीचे भाव ८० ते ९२ रुपये किलो प्रमाणे होते; मात्र उडीदमध्ये येत असलेला तुटवडा लक्षात येताच उडीद डाळीचे भाव २० ते २५ रुपये किलो मागे वधारले आहे. शनिवारी उडीद डाळीचे भाव ११० ते १३० रुपयांपर्यंत पोहोचले.

 

टॅग्स :Akolaअकोला